शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

शर्यत बंदी विरोधातील मोर्चा अडवला

By admin | Updated: April 16, 2015 00:05 IST

घटनास्थळी निवेदन स्वीकारले : जिल्ह्यातील शर्यत शौकिनांचा सहभाग

सांगली : बैलगाडी शर्यतीवरील बंदीमुळे जातीवंत बैलांच्या प्रजाती नष्ट होत असून, ग्रामीण भागातील उत्सवामधील शेतकऱ्यांचा मनोरंजनाचा खेळ नष्ट होत आहे. यासाठी शर्यतीवर असलेली बंदी उठवण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी सांगलीत बैलगाडीसह मोर्चा काढण्यात आला. मोर्चा सुरुवातीलाच पोलिसांनी अडवून त्याला परवानगी नाकारली. मोर्चामुळे होणारी वाहतुकीची कोंडी व विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे ही परवानगी नाकारल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, विश्रामबाग चौकातच जिल्हा प्रशासनाकडून निवेदन स्वीकारण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व शिराळा ग्रामपंचायतीचे सदस्य प्रसाद धर्माधिकारी यांनी केले. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवून शर्यतीसाठी परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी विश्रामबाग चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. यासाठी संपूर्ण सांगली जिल्ह्याबरोबर कर्नाटक, महाराष्ट्र सीमेवरील शर्यतशौकीन, बैलगाडीचालक, मालक आदी मोठ्यासंख्येने आले होते. सुमारे चारशेहून अधिक बैलगाडीचालक बैलगाडीसह मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच पोलिसांनी सकाळी अकरा वाजता विश्रामबाग चौकातच मोर्चा अडवला. पोलीस उपाधीक्षक प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक धनंजय भांगे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू मोरे आदींनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. विश्रामबाग चौक ते पुष्कराज चौक रस्त्याची दुरुस्ती सुरु असून, एकेरी वाहतूक सुरू आहे. त्याचबरोबर विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिताही सुरू आहे. शहरामध्ये मोर्चामुळे वाहतुकीची कोंडी होणार असून, मोर्चा स्थगित करण्यात यावा, अशी सूचना करण्यात आली. काही वेळ झालेल्या वादावादीनंतर विश्रामबाग चौकातच जिल्हा प्रशासनाने निवेदन स्वीकारावे, असे ठरले. त्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने तहसीलदार किशोर घाटगे यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बैलगाडी शर्यत बंदीमुळे जातीवंत बैलांच्या प्रजाती नष्ट होण्याची भीती आहे. ग्रामीण भागातील उत्सव, उरूस, यात्रामधील मनोरंजनाचा खेळ बंद होत आहे. अनाधिकालापासून चालत आलेल्या चाली, रूढी बंद होत आहेत. यासाठी शर्यत संहिता बनवून बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यात यावी.आंदोलनामध्ये धनाजी पाटील, विजय शिंदे, जयपाल कोळी, पप्पू संकपाळ, दिलीप बंडगर, भारत गायकवाड, शहाजी दुधाळ, चारुदत्त चौगुले, बाळासाहेब डुबल आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)सांगलीत तीन तास वाहतुकीची कोंडी मोर्चासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शर्यतशौकीन बैलगाडीसह आले होते. बैलगाड्यांची रांग विश्रामबाग चौक ते लक्ष्मी मंदिर चौकापर्यंत लागली होती. यामुळे या रस्त्यावर सुमारे तीन तास वाहतुकीची कोंडी होती. सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत बैलगाड्या थांबून होत्या. मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर दुपारी बैलगाडीचालक परतले.