शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

रेबीज रोगाचे दहा वर्षांत समूळ उच्चाटन शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:30 IST

सांगली : रेबीज अत्यंत घातक आणि भीतीदायक असा हा विषाणूजन्य रोग हजारो वर्षांपासून सर्व जगाला घाबरवून टाकणारा रोग ...

सांगली : रेबीज अत्यंत घातक आणि भीतीदायक असा हा विषाणूजन्य रोग हजारो वर्षांपासून सर्व जगाला घाबरवून टाकणारा रोग आहे. याचे उच्चाटन आपल्याला २०३० पर्यंत करणे शक्य आहे, असे प्रतिपादन पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय ढोके यांनी केले. ब्ल्यू क्रॉस वेल्फेअर फौंडेशन आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व पशुपालक आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. विजय ढोके बोलत होते. कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून प्रादेशिक सहआयुक्त डॉ. संतोष पंचपोर होते.

विजय ढोके म्हणाले की, जगात मोठ्या प्रमाणात कुत्र्यापासूनच या रोगाचा प्रसार होतो. जगातील सर्वात गंभीर असा हा प्राणिजन्य आजार आहे. कुत्र्याबरोबरच मांजर, कोल्हे, वटवाघूळ यासह ज्या प्राण्यांना त्यांच्याकडून चावे होतात, ते सर्व या रोगामुळे संक्रमित होतात. जगात वर्षाला ७० हजार लोक या रोगामुळे मृत्युमुखी पडतात. भारतात प्रतिवर्षी २० हजार लोकांना याची लागण होते आणि शेवट मृत्यू होतो. या रोगाच्या प्रतिबंधक लसीच्या संशोधनानंतर अमेरिकेने मानवातील मृत्यूचे प्रमाण प्रतिवर्षी दोनपर्यंत खाली आणले आहे. आपल्या देशातही लसीकरण केल्यानंतर रेबीज रोगाचे येत्या दहा वर्षांत सहज समूळ उच्चाटन करणे शक्य आहे.

डॉ. संतोष पंचपोर म्हणाले, रेबीजची लागण झाल्यावर मृत्यू हा ठरलेला आहे. रेबीज लस व इम्युनोग्लोब्युलीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असूनदेखील आजही आपण या रोगावर नियंत्रण मिळवू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी सर्व स्तरावर प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. एकूणच रेबीज या रोगाविषयी रोगउत्पत्ती, निदान, प्रतिबंध याविषयी चर्चा होणे आवश्यक आहे. राज्यातील महानगरपालिका, मोठ्या नगरपालिकासुद्धा आजही कुत्र्यांच्या निर्बीजीकरण याबाबत किती उदासीन आहेत हे आपण पाहतो. आरोग्य विभागात रेबीज रोगाविषयी एकूणच उदासीनता ही काळजी वाढवणारी आहे.

ब्ल्यू क्रॉस वेल्फेअर फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटराव घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सचिन वंजारी यांनी आभार मानले.