शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
3
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
4
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
5
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
6
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
7
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
8
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
9
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
10
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
11
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
12
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
13
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
14
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
15
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
16
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
17
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
18
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
19
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
20
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक

रेबीज रोगाचे दहा वर्षांत समूळ उच्चाटन शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:30 IST

सांगली : रेबीज अत्यंत घातक आणि भीतीदायक असा हा विषाणूजन्य रोग हजारो वर्षांपासून सर्व जगाला घाबरवून टाकणारा रोग ...

सांगली : रेबीज अत्यंत घातक आणि भीतीदायक असा हा विषाणूजन्य रोग हजारो वर्षांपासून सर्व जगाला घाबरवून टाकणारा रोग आहे. याचे उच्चाटन आपल्याला २०३० पर्यंत करणे शक्य आहे, असे प्रतिपादन पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय ढोके यांनी केले. ब्ल्यू क्रॉस वेल्फेअर फौंडेशन आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व पशुपालक आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. विजय ढोके बोलत होते. कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून प्रादेशिक सहआयुक्त डॉ. संतोष पंचपोर होते.

विजय ढोके म्हणाले की, जगात मोठ्या प्रमाणात कुत्र्यापासूनच या रोगाचा प्रसार होतो. जगातील सर्वात गंभीर असा हा प्राणिजन्य आजार आहे. कुत्र्याबरोबरच मांजर, कोल्हे, वटवाघूळ यासह ज्या प्राण्यांना त्यांच्याकडून चावे होतात, ते सर्व या रोगामुळे संक्रमित होतात. जगात वर्षाला ७० हजार लोक या रोगामुळे मृत्युमुखी पडतात. भारतात प्रतिवर्षी २० हजार लोकांना याची लागण होते आणि शेवट मृत्यू होतो. या रोगाच्या प्रतिबंधक लसीच्या संशोधनानंतर अमेरिकेने मानवातील मृत्यूचे प्रमाण प्रतिवर्षी दोनपर्यंत खाली आणले आहे. आपल्या देशातही लसीकरण केल्यानंतर रेबीज रोगाचे येत्या दहा वर्षांत सहज समूळ उच्चाटन करणे शक्य आहे.

डॉ. संतोष पंचपोर म्हणाले, रेबीजची लागण झाल्यावर मृत्यू हा ठरलेला आहे. रेबीज लस व इम्युनोग्लोब्युलीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असूनदेखील आजही आपण या रोगावर नियंत्रण मिळवू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी सर्व स्तरावर प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. एकूणच रेबीज या रोगाविषयी रोगउत्पत्ती, निदान, प्रतिबंध याविषयी चर्चा होणे आवश्यक आहे. राज्यातील महानगरपालिका, मोठ्या नगरपालिकासुद्धा आजही कुत्र्यांच्या निर्बीजीकरण याबाबत किती उदासीन आहेत हे आपण पाहतो. आरोग्य विभागात रेबीज रोगाविषयी एकूणच उदासीनता ही काळजी वाढवणारी आहे.

ब्ल्यू क्रॉस वेल्फेअर फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटराव घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सचिन वंजारी यांनी आभार मानले.