शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

आर. आर. पाटील झाले पोलिसांच्या गराड्यातून मुक्त

By admin | Updated: May 25, 2014 00:47 IST

जनतेशी संवाद : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम?

 कवठेमहांकाळ : गेली चार-साडेचार वर्षे मागेपुढे शासकीय वाहनांचा ताफा आणि पोलिसांच्या संरक्षणात वावरत असलेले गृहमंत्री आर आर. पाटील लोकसभा निवडणूक निकालानंतर पोलिसांच्या गराड्यातून मुक्त झाले. आज (शनिवारी) पोलीस बंदोबस्ताला फाटा देत ते थेट शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचले. शेतकर्‍यांना आबांशी थेट संवाद साधता आला. निवडणुकीच्या निकालाची ही किमया असावी, अशी चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात सुरू झाली आहे. गृहमंत्री पाटील यांचा दौरा म्हटले की मागेपुढे पोलीस गाड्यांचा ताफा ठरलेलाच. मात्र शनिवारी आबांचा दौरा पोलिसांच्या बंदोबस्तातून मुक्त झाला. कवठेमहांकाळतालुक्यातील एक आणि सांगलीतून आलेली एक अशा दोन पोलीस वाहनांशिवाय कोणतेही वाहन दौर्‍यात दिसले नाही. शिवाय दौर्‍यात एकही पोलीस गणवेशात दिसला नाही. त्यामुळे मळणगावपासून रांजणीपर्यंतच्या दौर्‍यात आबांना शेतकरी आणि सामान्य माणसांशी थेट संवाद साधता आला. गोरगरिबांच्या सुख-दु:खाचे चार शब्दही त्यांच्या कानावर पडले. मळणगाव येथील अग्रणी नदी परिसरातील शेतकर्‍यांनी या पाण्यामुळे आम्ही सुखी झालो, असे सांगितले. पाणी येणार की नाही, याची शाश्वती नव्हती; पण तुमच्यामुळे कडक उन्हातही कृष्णेचे पाणी नाले आणि अग्रणी नदीतून वहात आले, अशा भावना हिंगणगाव येथील शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या. मळणगावपासून सुरू झालेल्या या दौर्‍याची सांगता रांजणीजवळ झाली. रांजणीतील शेतकरी म्हैसाळच्या पाण्याची वाट बघत होते. आम्हाला पाणी मिळाले पाहिजे, पाणी आले तरच आमची शेती वाचणार आहे, आम्हाला पाणी कधी मिळणार, अशी विचारणा त्यांनी आबांना केली. धुळगावच्या बंधार्‍यात पाणी आले आहे, तुमच्याकडे यायला फारसा वेळ लागणार नाही, सर्व ताकद वापरून पाणी देईन, अशी हमी आबांनी दिली. लोकसभा निवडणुकीत तासगाव-कवठेमहांकाळमध्ये काँग्रेसची पीछेहाट झाल्याने आबांना धक्का बसला आहे. त्यामुळे पोलिसांच्या गराड्यातून बाजूला होऊन जनतेत मिसळले पाहिजे, असा संदेश या निवडणुकीने दिल्याचे बोलले जाते. (वार्ताहर)