शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

आर. आर. पाटील झाले पोलिसांच्या गराड्यातून मुक्त

By admin | Updated: May 25, 2014 00:47 IST

जनतेशी संवाद : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम?

 कवठेमहांकाळ : गेली चार-साडेचार वर्षे मागेपुढे शासकीय वाहनांचा ताफा आणि पोलिसांच्या संरक्षणात वावरत असलेले गृहमंत्री आर आर. पाटील लोकसभा निवडणूक निकालानंतर पोलिसांच्या गराड्यातून मुक्त झाले. आज (शनिवारी) पोलीस बंदोबस्ताला फाटा देत ते थेट शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचले. शेतकर्‍यांना आबांशी थेट संवाद साधता आला. निवडणुकीच्या निकालाची ही किमया असावी, अशी चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात सुरू झाली आहे. गृहमंत्री पाटील यांचा दौरा म्हटले की मागेपुढे पोलीस गाड्यांचा ताफा ठरलेलाच. मात्र शनिवारी आबांचा दौरा पोलिसांच्या बंदोबस्तातून मुक्त झाला. कवठेमहांकाळतालुक्यातील एक आणि सांगलीतून आलेली एक अशा दोन पोलीस वाहनांशिवाय कोणतेही वाहन दौर्‍यात दिसले नाही. शिवाय दौर्‍यात एकही पोलीस गणवेशात दिसला नाही. त्यामुळे मळणगावपासून रांजणीपर्यंतच्या दौर्‍यात आबांना शेतकरी आणि सामान्य माणसांशी थेट संवाद साधता आला. गोरगरिबांच्या सुख-दु:खाचे चार शब्दही त्यांच्या कानावर पडले. मळणगाव येथील अग्रणी नदी परिसरातील शेतकर्‍यांनी या पाण्यामुळे आम्ही सुखी झालो, असे सांगितले. पाणी येणार की नाही, याची शाश्वती नव्हती; पण तुमच्यामुळे कडक उन्हातही कृष्णेचे पाणी नाले आणि अग्रणी नदीतून वहात आले, अशा भावना हिंगणगाव येथील शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या. मळणगावपासून सुरू झालेल्या या दौर्‍याची सांगता रांजणीजवळ झाली. रांजणीतील शेतकरी म्हैसाळच्या पाण्याची वाट बघत होते. आम्हाला पाणी मिळाले पाहिजे, पाणी आले तरच आमची शेती वाचणार आहे, आम्हाला पाणी कधी मिळणार, अशी विचारणा त्यांनी आबांना केली. धुळगावच्या बंधार्‍यात पाणी आले आहे, तुमच्याकडे यायला फारसा वेळ लागणार नाही, सर्व ताकद वापरून पाणी देईन, अशी हमी आबांनी दिली. लोकसभा निवडणुकीत तासगाव-कवठेमहांकाळमध्ये काँग्रेसची पीछेहाट झाल्याने आबांना धक्का बसला आहे. त्यामुळे पोलिसांच्या गराड्यातून बाजूला होऊन जनतेत मिसळले पाहिजे, असा संदेश या निवडणुकीने दिल्याचे बोलले जाते. (वार्ताहर)