शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

आर. आर. पाटील झाले पोलिसांच्या गराड्यातून मुक्त

By admin | Updated: May 25, 2014 00:47 IST

जनतेशी संवाद : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम?

 कवठेमहांकाळ : गेली चार-साडेचार वर्षे मागेपुढे शासकीय वाहनांचा ताफा आणि पोलिसांच्या संरक्षणात वावरत असलेले गृहमंत्री आर आर. पाटील लोकसभा निवडणूक निकालानंतर पोलिसांच्या गराड्यातून मुक्त झाले. आज (शनिवारी) पोलीस बंदोबस्ताला फाटा देत ते थेट शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचले. शेतकर्‍यांना आबांशी थेट संवाद साधता आला. निवडणुकीच्या निकालाची ही किमया असावी, अशी चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात सुरू झाली आहे. गृहमंत्री पाटील यांचा दौरा म्हटले की मागेपुढे पोलीस गाड्यांचा ताफा ठरलेलाच. मात्र शनिवारी आबांचा दौरा पोलिसांच्या बंदोबस्तातून मुक्त झाला. कवठेमहांकाळतालुक्यातील एक आणि सांगलीतून आलेली एक अशा दोन पोलीस वाहनांशिवाय कोणतेही वाहन दौर्‍यात दिसले नाही. शिवाय दौर्‍यात एकही पोलीस गणवेशात दिसला नाही. त्यामुळे मळणगावपासून रांजणीपर्यंतच्या दौर्‍यात आबांना शेतकरी आणि सामान्य माणसांशी थेट संवाद साधता आला. गोरगरिबांच्या सुख-दु:खाचे चार शब्दही त्यांच्या कानावर पडले. मळणगाव येथील अग्रणी नदी परिसरातील शेतकर्‍यांनी या पाण्यामुळे आम्ही सुखी झालो, असे सांगितले. पाणी येणार की नाही, याची शाश्वती नव्हती; पण तुमच्यामुळे कडक उन्हातही कृष्णेचे पाणी नाले आणि अग्रणी नदीतून वहात आले, अशा भावना हिंगणगाव येथील शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या. मळणगावपासून सुरू झालेल्या या दौर्‍याची सांगता रांजणीजवळ झाली. रांजणीतील शेतकरी म्हैसाळच्या पाण्याची वाट बघत होते. आम्हाला पाणी मिळाले पाहिजे, पाणी आले तरच आमची शेती वाचणार आहे, आम्हाला पाणी कधी मिळणार, अशी विचारणा त्यांनी आबांना केली. धुळगावच्या बंधार्‍यात पाणी आले आहे, तुमच्याकडे यायला फारसा वेळ लागणार नाही, सर्व ताकद वापरून पाणी देईन, अशी हमी आबांनी दिली. लोकसभा निवडणुकीत तासगाव-कवठेमहांकाळमध्ये काँग्रेसची पीछेहाट झाल्याने आबांना धक्का बसला आहे. त्यामुळे पोलिसांच्या गराड्यातून बाजूला होऊन जनतेत मिसळले पाहिजे, असा संदेश या निवडणुकीने दिल्याचे बोलले जाते. (वार्ताहर)