शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धनगरवाडा, विनोबाग्राम येथील जमिनींची तातडीने मोजणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : वनविभागाने धनगरवाडा व विनोबाग्राममधील जमिनी येथील शेतकऱ्यांना दिली असताना पुन्हा वनविभागाच्या नावे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा

: वनविभागाने धनगरवाडा व विनोबाग्राममधील जमिनी येथील शेतकऱ्यांना दिली असताना पुन्हा वनविभागाच्या नावे या जमिनी कशा नोंद झाल्या, याबाबत पंधरा दिवसांत योग्य कागदपत्रे दाखवावीत. सध्या असणाऱ्या या जमिनींची तातडीने मोजणी करावी, असा आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

तहसील कार्यालयात धनगरवाडा व विनोबाग्राम येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत वन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत मंत्री पाटील बोलत होते.

यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, युवा नेते विराज नाईक, प्रांताधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार गणेश शिंदे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संचालक समाधान चव्हाण, उपवनसंरक्षक विजय माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, जमिनी दिल्याचे शेतकऱ्यांकडे पुरावे आहेत, मात्र या जमिनी पुन्हा वनविभागाने परत घेतल्या याचे पुरावे नाहीत. शेतकऱ्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा तलाठी मंडळींनी घेतला तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे. येथील नागरिकांनी मोजणीसाठी पैसे भरले आहेत. ती तातडीने मोजणी करा. तीन पिढ्या या जमिनी हे शेतकरी कसत आहेत. त्यांनी अतिक्रमण केलेल्या जमिनी हे शेतकरी मागत नाहीत तर हक्काच्या जमिनी मागत आहेत. वनविभागाने मन मोठे करून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

आमदार मानसिंगराव नाईक यांनी यावेळी कोणत्या आधारे जमिनी वनविभागाच्या नावे झाल्या ते दाखवा असे विचारून या चुका अशिक्षित नागरिकांच्या आहेत काय , या सर्व जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात आहेत. शेती करतात त्यांना त्यांचा हक्क मिळवून दिलाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली.

सरपंच वसंत पाटील, बाबूराव डोईफोडे यांनी, १५० वर्षे झाली आमच्या तीन पिढ्या संपल्या आहेत. आतातरी आम्हाला न्याय द्या. या जमिनी वनविभागाच्या नावे असल्याने शेती विकसित करणे, घर बांधणे, शेती कर्ज या शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. तसेच वन्यप्राण्यांनी शेतीचे नुकसान केल्यास नुकसानभरपाई मिळत नाही, असेही सांगितले.

चौकट

आमदारांनी घेतले वन अधिकाऱ्यांना फैलावर

आमदार नाईक यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या जमिनी कोण कसतो ते सांगा असे विचारले असता, अधिकाऱ्यांनी वनविभागाकडे जमिनी असल्याचे खोटे उत्तर दिले. आ. नाईक यांनी या बैठकीतूनच पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासह त्या गावाला भेट देऊ या का, मग कळेल सत्य काय ते, असा जाब विचारला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने मान खाली घालून शब्द माघारी घेतले.