शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

धनगरवाडा, विनोबाग्राम येथील जमिनींची तातडीने मोजणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : वनविभागाने धनगरवाडा व विनोबाग्राममधील जमिनी येथील शेतकऱ्यांना दिली असताना पुन्हा वनविभागाच्या नावे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा

: वनविभागाने धनगरवाडा व विनोबाग्राममधील जमिनी येथील शेतकऱ्यांना दिली असताना पुन्हा वनविभागाच्या नावे या जमिनी कशा नोंद झाल्या, याबाबत पंधरा दिवसांत योग्य कागदपत्रे दाखवावीत. सध्या असणाऱ्या या जमिनींची तातडीने मोजणी करावी, असा आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

तहसील कार्यालयात धनगरवाडा व विनोबाग्राम येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत वन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत मंत्री पाटील बोलत होते.

यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, युवा नेते विराज नाईक, प्रांताधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार गणेश शिंदे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संचालक समाधान चव्हाण, उपवनसंरक्षक विजय माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, जमिनी दिल्याचे शेतकऱ्यांकडे पुरावे आहेत, मात्र या जमिनी पुन्हा वनविभागाने परत घेतल्या याचे पुरावे नाहीत. शेतकऱ्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा तलाठी मंडळींनी घेतला तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे. येथील नागरिकांनी मोजणीसाठी पैसे भरले आहेत. ती तातडीने मोजणी करा. तीन पिढ्या या जमिनी हे शेतकरी कसत आहेत. त्यांनी अतिक्रमण केलेल्या जमिनी हे शेतकरी मागत नाहीत तर हक्काच्या जमिनी मागत आहेत. वनविभागाने मन मोठे करून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

आमदार मानसिंगराव नाईक यांनी यावेळी कोणत्या आधारे जमिनी वनविभागाच्या नावे झाल्या ते दाखवा असे विचारून या चुका अशिक्षित नागरिकांच्या आहेत काय , या सर्व जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात आहेत. शेती करतात त्यांना त्यांचा हक्क मिळवून दिलाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली.

सरपंच वसंत पाटील, बाबूराव डोईफोडे यांनी, १५० वर्षे झाली आमच्या तीन पिढ्या संपल्या आहेत. आतातरी आम्हाला न्याय द्या. या जमिनी वनविभागाच्या नावे असल्याने शेती विकसित करणे, घर बांधणे, शेती कर्ज या शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. तसेच वन्यप्राण्यांनी शेतीचे नुकसान केल्यास नुकसानभरपाई मिळत नाही, असेही सांगितले.

चौकट

आमदारांनी घेतले वन अधिकाऱ्यांना फैलावर

आमदार नाईक यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या जमिनी कोण कसतो ते सांगा असे विचारले असता, अधिकाऱ्यांनी वनविभागाकडे जमिनी असल्याचे खोटे उत्तर दिले. आ. नाईक यांनी या बैठकीतूनच पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासह त्या गावाला भेट देऊ या का, मग कळेल सत्य काय ते, असा जाब विचारला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने मान खाली घालून शब्द माघारी घेतले.