शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

सांगलीतील प्रादेशिक योजनांचा प्रश्न विधानसभेत

By admin | Updated: August 20, 2016 00:24 IST

सुधीर गाडगीळांनी लक्ष वेधले : वीज पुरवठा खंडित होण्याबाबतची माहिती शासनाने मागविली

सांगली : जिल्ह्यातील ११ प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांचा वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. हा प्रश्न सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभेत मांडला असून प्रादेशिक योजनांचे वीज बिल औद्योगिकऐवजी कृषिपंपाच्या दराने आकारावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. या प्रश्नाची शासनाने दखल घेतली असून जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून या योजनांच्या सद्य:स्थितीची माहिती मागविली आहे.कासेगाव, जुनेखेड-नवेखेड, वाघोली, तुंग, नांद्रे-वसगडे, येळावी, पेड, मणेराजुरी, कवठेमहांकाळ-विसापूर, कुंडल, रायगाव या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना जुन्या आहेत. या योजनांचा देखभाल, दुरूस्तीचा खर्च मोठ्याप्रमाणात वाढला आहे. पाईपलाईनला गळती असल्यामुळे नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. काही भागामध्ये तर नियमित पाणी येतच नाही. यामुळे नागरिक प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांना कंटाळले आहेत. या योजनाच बंद करून नवीन योजनांना मंजुरी देण्याचीही मागणी होत आहे. अकरा प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांद्वारे १२४ गावांतील ३ लाख ५२ हजार ८१४ नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, कासेगाव, कुंडल, येळावी ही मोठी गावे आहेत. योजनांना महावितरण कंपनीकडून औद्योगिक दराने विद्युत बिल आकारले जात आहे. यामुळे वसूल होणारी पाणीपट्टी आणि वीज बिलाच्या रकमेचा ताळमेळ जमत नाही. यातूनच थकीत वीज बिलामुळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांचा वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे. या प्रश्नावर आ. गाडगीळ यांनी विधानसभेत आवाज उठविला.प्रादेशिक पाणीपुरवठा योजना वारंवार बंद पडत आहेत, त्याची कारणे काय आहेत? वीज पुरवठ्याची औद्योगिक दराऐवजी कृषी पंपाच्या दराने आकारणी का होत नाही? जुन्या पाणी योजना दुरुस्तीसाठी शासन कोणत्या उपाययोजना करणार आहे?, या प्रश्नांकडे आ. गाडगीळ यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. गाडगीळ यांच्या प्रश्नानंतर शासनाने जिल्हा परिषदेकडून प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांच्या वस्तुस्थितीचा अहवाल मागविला आहे. (प्रतिनिधी)तीन योजनांचे चालूचे ४५ लाखांचे वीजबिल थकीतजिल्हा परिषदेकडील प्रादेशिक योजनेतून पाणी पुरवठा होणाऱ्या तीन योजनांचे वीज कनेक्शन थकीत वीजबिलावरून तोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील येळावी, मणेराजुरी व कवठेमहांकाळ प्रादेशिक योजनांची वीज तोडण्यात आली असून यामुळे ४४ गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. ४५ लाखांच्या चालू थकबाकीपोटी ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील येळावी प्रादेशिक योजनेतून ९ गावांना, मणेराजुरी योजनेतून १९, तर कवठेमहांकाळ योजनेतून १६ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. थकबाकीमुळेच बुधवारी योजनेचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. यामुळे ४४ गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.