शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील प्रादेशिक योजनांचा प्रश्न विधानसभेत

By admin | Updated: August 20, 2016 00:24 IST

सुधीर गाडगीळांनी लक्ष वेधले : वीज पुरवठा खंडित होण्याबाबतची माहिती शासनाने मागविली

सांगली : जिल्ह्यातील ११ प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांचा वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. हा प्रश्न सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभेत मांडला असून प्रादेशिक योजनांचे वीज बिल औद्योगिकऐवजी कृषिपंपाच्या दराने आकारावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. या प्रश्नाची शासनाने दखल घेतली असून जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून या योजनांच्या सद्य:स्थितीची माहिती मागविली आहे.कासेगाव, जुनेखेड-नवेखेड, वाघोली, तुंग, नांद्रे-वसगडे, येळावी, पेड, मणेराजुरी, कवठेमहांकाळ-विसापूर, कुंडल, रायगाव या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना जुन्या आहेत. या योजनांचा देखभाल, दुरूस्तीचा खर्च मोठ्याप्रमाणात वाढला आहे. पाईपलाईनला गळती असल्यामुळे नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. काही भागामध्ये तर नियमित पाणी येतच नाही. यामुळे नागरिक प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांना कंटाळले आहेत. या योजनाच बंद करून नवीन योजनांना मंजुरी देण्याचीही मागणी होत आहे. अकरा प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांद्वारे १२४ गावांतील ३ लाख ५२ हजार ८१४ नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, कासेगाव, कुंडल, येळावी ही मोठी गावे आहेत. योजनांना महावितरण कंपनीकडून औद्योगिक दराने विद्युत बिल आकारले जात आहे. यामुळे वसूल होणारी पाणीपट्टी आणि वीज बिलाच्या रकमेचा ताळमेळ जमत नाही. यातूनच थकीत वीज बिलामुळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांचा वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे. या प्रश्नावर आ. गाडगीळ यांनी विधानसभेत आवाज उठविला.प्रादेशिक पाणीपुरवठा योजना वारंवार बंद पडत आहेत, त्याची कारणे काय आहेत? वीज पुरवठ्याची औद्योगिक दराऐवजी कृषी पंपाच्या दराने आकारणी का होत नाही? जुन्या पाणी योजना दुरुस्तीसाठी शासन कोणत्या उपाययोजना करणार आहे?, या प्रश्नांकडे आ. गाडगीळ यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. गाडगीळ यांच्या प्रश्नानंतर शासनाने जिल्हा परिषदेकडून प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांच्या वस्तुस्थितीचा अहवाल मागविला आहे. (प्रतिनिधी)तीन योजनांचे चालूचे ४५ लाखांचे वीजबिल थकीतजिल्हा परिषदेकडील प्रादेशिक योजनेतून पाणी पुरवठा होणाऱ्या तीन योजनांचे वीज कनेक्शन थकीत वीजबिलावरून तोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील येळावी, मणेराजुरी व कवठेमहांकाळ प्रादेशिक योजनांची वीज तोडण्यात आली असून यामुळे ४४ गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. ४५ लाखांच्या चालू थकबाकीपोटी ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील येळावी प्रादेशिक योजनेतून ९ गावांना, मणेराजुरी योजनेतून १९, तर कवठेमहांकाळ योजनेतून १६ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. थकबाकीमुळेच बुधवारी योजनेचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. यामुळे ४४ गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.