शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

सांगलीतील प्रादेशिक योजनांचा प्रश्न विधानसभेत

By admin | Updated: August 20, 2016 00:24 IST

सुधीर गाडगीळांनी लक्ष वेधले : वीज पुरवठा खंडित होण्याबाबतची माहिती शासनाने मागविली

सांगली : जिल्ह्यातील ११ प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांचा वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. हा प्रश्न सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभेत मांडला असून प्रादेशिक योजनांचे वीज बिल औद्योगिकऐवजी कृषिपंपाच्या दराने आकारावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. या प्रश्नाची शासनाने दखल घेतली असून जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून या योजनांच्या सद्य:स्थितीची माहिती मागविली आहे.कासेगाव, जुनेखेड-नवेखेड, वाघोली, तुंग, नांद्रे-वसगडे, येळावी, पेड, मणेराजुरी, कवठेमहांकाळ-विसापूर, कुंडल, रायगाव या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना जुन्या आहेत. या योजनांचा देखभाल, दुरूस्तीचा खर्च मोठ्याप्रमाणात वाढला आहे. पाईपलाईनला गळती असल्यामुळे नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. काही भागामध्ये तर नियमित पाणी येतच नाही. यामुळे नागरिक प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांना कंटाळले आहेत. या योजनाच बंद करून नवीन योजनांना मंजुरी देण्याचीही मागणी होत आहे. अकरा प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांद्वारे १२४ गावांतील ३ लाख ५२ हजार ८१४ नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, कासेगाव, कुंडल, येळावी ही मोठी गावे आहेत. योजनांना महावितरण कंपनीकडून औद्योगिक दराने विद्युत बिल आकारले जात आहे. यामुळे वसूल होणारी पाणीपट्टी आणि वीज बिलाच्या रकमेचा ताळमेळ जमत नाही. यातूनच थकीत वीज बिलामुळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांचा वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे. या प्रश्नावर आ. गाडगीळ यांनी विधानसभेत आवाज उठविला.प्रादेशिक पाणीपुरवठा योजना वारंवार बंद पडत आहेत, त्याची कारणे काय आहेत? वीज पुरवठ्याची औद्योगिक दराऐवजी कृषी पंपाच्या दराने आकारणी का होत नाही? जुन्या पाणी योजना दुरुस्तीसाठी शासन कोणत्या उपाययोजना करणार आहे?, या प्रश्नांकडे आ. गाडगीळ यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. गाडगीळ यांच्या प्रश्नानंतर शासनाने जिल्हा परिषदेकडून प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांच्या वस्तुस्थितीचा अहवाल मागविला आहे. (प्रतिनिधी)तीन योजनांचे चालूचे ४५ लाखांचे वीजबिल थकीतजिल्हा परिषदेकडील प्रादेशिक योजनेतून पाणी पुरवठा होणाऱ्या तीन योजनांचे वीज कनेक्शन थकीत वीजबिलावरून तोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील येळावी, मणेराजुरी व कवठेमहांकाळ प्रादेशिक योजनांची वीज तोडण्यात आली असून यामुळे ४४ गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. ४५ लाखांच्या चालू थकबाकीपोटी ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील येळावी प्रादेशिक योजनेतून ९ गावांना, मणेराजुरी योजनेतून १९, तर कवठेमहांकाळ योजनेतून १६ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. थकबाकीमुळेच बुधवारी योजनेचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. यामुळे ४४ गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.