शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
8
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
9
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
10
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
11
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
12
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
13
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
14
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
15
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
16
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
17
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
18
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
19
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
20
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द

खिलार पशुधनाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: July 10, 2014 23:17 IST

दुष्काळाचा परिणाम : संगोपनाचा खर्च आवाक्याबाहेर; शर्यत बंद झाल्यानेही अडचणी...

अविनाश बाड ल्ल आटपाडीअत्यंत चिवट, देखण्या आणि प्रचंड रोगप्रतिकारशक्ती असलेल्या माणदेशी खिलार पशुधनावर गेली तीन-चार वर्षे भीषण दुष्काळाने घाला घातला आहे. न्यायालयाने बैलांच्या शर्यतीवर बंदी घातल्याने शर्यतीच्या खोंडांची पैदास आणि संगोपन करणारे शेतकरी आगीतून फुफाट्यात पडले आहेत.देखणी खिलार गाय आणि देखणी खोंडं हे माणदेशाचं वैभव आहे. जातीवंत देखणी, चपळ, काटक, रूबाबदार खिलार खोंडं जगाच्या पाठीवर फक्त माणदेशातच पहायला मिळतात. दुभत्या म्हैशी आणि संकरित गार्इंच्या दुधाच्या मागे लागल्याने माणदेशाचं हे वैभव आता लोप पावत चाललं आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या खिलार जनावरांचं संगोपन करणं परवडत नाही. गाईचे दूध संकरित गाईच्या दुधाच्या तुलनेत खूपच कमी प्रमाणात निघते. त्या दुधामध्ये, दुधापासून तयार केलेल्या तुपामध्ये खूप गुणधर्म असले तरी, दूध उत्पादनाचे प्रमाण कमी असते. याशिवाय यांत्रिकीकरणामुळे शेतीच्या कामासाठी बैलजोडी वापरण्याचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. त्यामुळे शेतीकामासाठी विकल्या जाणाऱ्या बैलजोडीला कमी किंमत मिळत आहे.शर्यतीसाठी कुठेही जे बैल वापरले जातात, त्या सर्व बैलजोड्या माणदेशी खिलार असतात. अत्यंत देखणी आणि चपळ असलेली खिलार खोंडे एक ते दीड लाख रुपयांपर्यंत शौकीन खरेदी करतात. या भागातील पशुपालकांना शर्यतीचा मोठा आधार होता. या जातीच्या गाईमध्ये मोठा भाकडकाळ असतो. अत्यल्प प्रमाणात दूध निघते. त्यामुळे हा वाण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. संपूर्ण राज्यात शर्यतीसाठी सांगली, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी खोंडांची पैदास करतात. गुणवत्तेच्या जोरावर कॅनडा आणि श्रीलंकेतही माणदेश खिलार पोहोचला आहे. युरोपीय देशांनी खिलार जनावरांच्या रक्तातील प्रचंड रोगप्रतिकारक शक्तीचा उपयोग स्थानिक जनावरांसाठी कसा करता येईल, यासाठी संशोधन सुरू केले आहे.आपल्याकडे मात्र आता हा काटक जनावरांचा वाण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ही जनावरं टिकली तर इथला शेतकरी टिकेल. शेतकऱ्यांच्या जीवनाचा कणा असणारे खिलार जनावर सध्या धोक्यात आहे. खिलार जनावरांच्या संगोपनासाठी आता शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.