शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

एलबीटीचा प्रश्न आता न्यायालयात

By admin | Updated: December 17, 2014 22:56 IST

सत्ताधाऱ्यांच्या हालचाली : कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू

सांगली : एलबीटीच्या वसुलीसाठी महापालिकेने कडक पावले उचलली असताना आता मुख्यमंत्र्यांनीच व्यापाऱ्यांवरील कारवाईला ब्रेक लावल्याने, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह सर्वच राजकीय पक्षांत खळबळ उडाली आहे. सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळवही केली जात आहे. दुसरीकडे सांगलीच्या न्यायालयात दाखल झालेल्या फौजदारीतही सत्ताधारी नगरसेवकांनी थर्ड पार्टी म्हणून सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता एलबीटीचा तिढा न्यायालयातही गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात महापालिका प्रशासनाने न्यायालयात फौजदारी दाखल केली आहे. त्यामध्ये थर्ड पार्टी म्हणून आपण न्यायालयात जाणार असल्याची माहिती माजी नगरसेवक हणमंत पवार यांनी दिली. महापालिका हद्दीत दीड वर्षापूर्वी एलबीटीची अंमलबजावणी सुरू झाली. तेव्हापासून या कराला व्यापाऱ्यांनी विरोध करीत असहकाराची भूमिका घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेने एलबीटीच्या वसुलीसाठी कठोर पावले उचलली. कायद्यानुसार व्यापाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याची प्रक्रिया वेग घेत असतानाच व्यापाऱ्यांनी बेमुदत उपोषण करून हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात नेला. मुख्यमंत्र्यांनी काल व्यापाऱ्यांवर कारवाई करू नये, असे आदेश दिल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाला ब्रेक लागणार असल्याचा मुद्दा उपस्थित करीत सत्ताधारी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. गटनेते किशोर जामदार यांनी शासनाने कारवाई थांबविण्याचे आदेश दिले असतील तर त्याविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला . त्यात आता ज्येष्ठ नगरसेवक हणमंत पवार यांनीही उडी घेतली आहे. ते म्हणाले, ५३ व्यापाऱ्यांविरोधात आतापर्यंत मनपा प्रशासनाने थेट न्यायालयात धाव घेतली आहे. एलबीटीची नोंदणी न करता करावर बहिष्कार टाकून येथील व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या तसेच शासनाच्या विरोधात भूमिका जाहीर केली आहे, तर एलबीटी भरणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने मनपाने फौजदारी दाखल करण्याचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर हणमंत पवार म्हणाले की, मनपा प्रशासनाने ज्या व्यापाऱ्यांवर फौजदारी दाखल केली आहे, त्यांचे दावे मागे घेणार नाही. परंतु एलबीटीची वसुली करु नये असे आदेश आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे ऐकिवात आहे. जर असे असेल, तर एलबीटी कराचे जे १३० कोटी रुपये थकित आहेत, त्यांच्या वसुलीचे काय होणार? हा प्रश्न आहे. थकित वसुलीमुळे मनपाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. पैसे नसल्याने अनेक विकासकामे ठप्प झाली आहेत. याकडेही शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांकडून वसुली करायची नसेल, तर थकित वसुलीचे पैसे प्रशासनाने मनपा प्रशासनाला देणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात मनपास १०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची वेळ येईल असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) फौजदारीचे काय होणार? महापालिकेने आतापर्यंत ५३ व्यापाऱ्यांवर फौजदारी दाखल केली आहे. आता शासनानेच कारवाई थांबविण्याचे आदेश दिल्याने फौजदारी दाखल झालेल्या व्यापाऱ्यांचे काय होणार? याची उत्सुकता लागली आहे. कृती समितीने व्यापाऱ्यांवरील फौजदारी मागे घ्यावी, यासाठी आता प्रयत्न चालविले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते असल्याने याबाबत योग्य निर्णय होईल, अशी आशा व्यापाऱ्यांना आहे.