शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

एलबीटीचा प्रश्न आता न्यायालयात

By admin | Updated: December 17, 2014 22:56 IST

सत्ताधाऱ्यांच्या हालचाली : कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू

सांगली : एलबीटीच्या वसुलीसाठी महापालिकेने कडक पावले उचलली असताना आता मुख्यमंत्र्यांनीच व्यापाऱ्यांवरील कारवाईला ब्रेक लावल्याने, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह सर्वच राजकीय पक्षांत खळबळ उडाली आहे. सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळवही केली जात आहे. दुसरीकडे सांगलीच्या न्यायालयात दाखल झालेल्या फौजदारीतही सत्ताधारी नगरसेवकांनी थर्ड पार्टी म्हणून सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता एलबीटीचा तिढा न्यायालयातही गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात महापालिका प्रशासनाने न्यायालयात फौजदारी दाखल केली आहे. त्यामध्ये थर्ड पार्टी म्हणून आपण न्यायालयात जाणार असल्याची माहिती माजी नगरसेवक हणमंत पवार यांनी दिली. महापालिका हद्दीत दीड वर्षापूर्वी एलबीटीची अंमलबजावणी सुरू झाली. तेव्हापासून या कराला व्यापाऱ्यांनी विरोध करीत असहकाराची भूमिका घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेने एलबीटीच्या वसुलीसाठी कठोर पावले उचलली. कायद्यानुसार व्यापाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याची प्रक्रिया वेग घेत असतानाच व्यापाऱ्यांनी बेमुदत उपोषण करून हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात नेला. मुख्यमंत्र्यांनी काल व्यापाऱ्यांवर कारवाई करू नये, असे आदेश दिल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाला ब्रेक लागणार असल्याचा मुद्दा उपस्थित करीत सत्ताधारी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. गटनेते किशोर जामदार यांनी शासनाने कारवाई थांबविण्याचे आदेश दिले असतील तर त्याविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला . त्यात आता ज्येष्ठ नगरसेवक हणमंत पवार यांनीही उडी घेतली आहे. ते म्हणाले, ५३ व्यापाऱ्यांविरोधात आतापर्यंत मनपा प्रशासनाने थेट न्यायालयात धाव घेतली आहे. एलबीटीची नोंदणी न करता करावर बहिष्कार टाकून येथील व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या तसेच शासनाच्या विरोधात भूमिका जाहीर केली आहे, तर एलबीटी भरणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने मनपाने फौजदारी दाखल करण्याचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर हणमंत पवार म्हणाले की, मनपा प्रशासनाने ज्या व्यापाऱ्यांवर फौजदारी दाखल केली आहे, त्यांचे दावे मागे घेणार नाही. परंतु एलबीटीची वसुली करु नये असे आदेश आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे ऐकिवात आहे. जर असे असेल, तर एलबीटी कराचे जे १३० कोटी रुपये थकित आहेत, त्यांच्या वसुलीचे काय होणार? हा प्रश्न आहे. थकित वसुलीमुळे मनपाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. पैसे नसल्याने अनेक विकासकामे ठप्प झाली आहेत. याकडेही शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांकडून वसुली करायची नसेल, तर थकित वसुलीचे पैसे प्रशासनाने मनपा प्रशासनाला देणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात मनपास १०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची वेळ येईल असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) फौजदारीचे काय होणार? महापालिकेने आतापर्यंत ५३ व्यापाऱ्यांवर फौजदारी दाखल केली आहे. आता शासनानेच कारवाई थांबविण्याचे आदेश दिल्याने फौजदारी दाखल झालेल्या व्यापाऱ्यांचे काय होणार? याची उत्सुकता लागली आहे. कृती समितीने व्यापाऱ्यांवरील फौजदारी मागे घ्यावी, यासाठी आता प्रयत्न चालविले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते असल्याने याबाबत योग्य निर्णय होईल, अशी आशा व्यापाऱ्यांना आहे.