शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

ऊसदरप्रश्नी जयंतरावांचे मौन, राजू शेट्टी शांतच...

By admin | Updated: December 22, 2014 00:17 IST

शेतकऱ्यांना चिंता : राजारामबापू साखर कारखान्याच्या ऊस दराकडे जिल्ह्याचे लक्ष

अशोक पाटील / इस्लामपूरगळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी पहिला हप्ता कमाल ३५०० व किमान २६०० रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर पश्चिम महाराष्ट्रातील साखरसम्राटांचे नेते जयंत पाटील यांनी ऊस उत्पादकाला किमान ३ हजार रुपये दर मिळाला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली होती. तरीसुध्दा राज्यातील साखरसम्राटांनी ताकदीप्रमाणे १७०० ते २६०० रुपयांपर्यंत दर जाहीर केले आहेत. याचा ऊस उत्पादकाला टनामागे ७०० ते ८०० रुपयांचा फटका बसत आहे. यावर जयंत पाटील यांनी मौन पाळले असून, खा. राजू शेट्टीही दिल्लीतच ठाण मांडून आहेत.आघाडी काँग्रेसच्या काळात गत गळीत हंगामापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी ऊस दरासाठी थेट बारामती व कऱ्हाड येथे आंदोलन केले होते. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी जयंत पाटील यांनी ताकद पणाला लावली होती. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील सदाशिवराव मंडलिक यांनी या आंदोलनाची कोंडी फोडली होती. याचा परिणाम हातकणंगले मतदारसंघातील निवडणुकीवर झाला. ऊस उत्पादकांनी शेट्टींना ताकद दिली. यामागे काँग्रेस नेत्यांचाही हात होता.केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे शेट्टी ऊस उत्पादकांना न्याय देतील, अशीच भावना शेतकरी व्यक्त करत होते. परंतु गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला, तरी अद्याप दराबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही. जयंत पाटील यांनीही मौन पाळले आहे. त्यातच राजू शेट्टीही दिल्लीत जाऊन बसले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी कारखान्यांनी दर जाहीर केले आहेत. तेही एफआरपीपेक्षा कमी आहेत. यावर कोणताही शेतकरी संघटनेचा नेता बोलण्यास तयार नाही.सध्या जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजारामबापू सहकारी साखर कारखान्यासह इतर तीन युनिट कार्यरत आहेत. येथे मोठ्याप्रमाणात उसाचे गाळप सुरू आहे. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांनी २५०० ते २६०० रुपये दर जाहीर केले आहेत. सांगली जिल्ह्यातील काही कारखान्यांनी १९०० रुपये दर दिला आहे. त्यामुळे जयंतराव त्यांच्या कारखान्याचा किती दर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २५०० रुपये एफआरपी निश्चित झालेली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच साखर कारखान्यांनी २५०० व त्याच्या वर दर देणे बंधनकारक आहे. जे दर देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कारवाई न झाल्यास सांगलीत मोर्चा काढणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साखरसम्राटांची हुकूमशाही मोडून काढली पाहिजे.- सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.जयंत पाटील दरासंबंधी काहीच बोलत नाहीत. परंतु त्यांच्या कारखान्यांनी २५०० च्या पुढे दर दिला पाहिजे. शेतकरी संघटनेची ताकद काँग्रेसच्या जिवावर आहे. त्यांना आंदोलनावेळी सर्वच पक्षांनी मदत केली आहे. यावेळी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून शेतकऱ्यांचे नेते अज्ञातवासात गेले आहेत. गतवर्षी बारामती, इंदापूर, कऱ्हाड येथे ठिय्या मांडला होता. आता त्यांना मुख्यमंत्र्यांचे नागपूर आणि सहकारमंत्र्यांचे कोल्हापूर का दिसत नाही.- जितेंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य, काँग्रेस.