शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दुराव्यामुळे प्रश्न तयार होतात

By admin | Updated: March 21, 2017 23:38 IST

जयंत पाटील : महापौरांसोबत रंगला कलगीतुरा, महावीर उद्यानातील कामाचे लोकार्पण

सांगली : महापालिकेच्या महावीर उद्यानातील विकास कामांच्या उद्घाटनावेळी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील व काँग्रेसचे महापौर हारूण शिकलगार यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला. महापौर शिकलगार यांनी जिल्हा परिषद निवडीचा संदर्भ देत, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची मागणी केली, तर जयंतरावांनी काँग्रेस-राष्ट्रवादीतील दुराव्यामुळेच काही प्रश्न तयार होत असल्याचे सांगत, जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी न झाल्याचे शल्य अप्रत्यक्षपणे बोलून दाखविले. नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, अंजना कुंडले यांच्या प्रभागातील महावीर उद्यानात आकर्षक विद्युत दिवे, साऊंड सिस्टिम व मुलांची खेळणी अशी तब्बल २० लाखांची कामे पूर्ण करण्यात आली असून, मंगळवारी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते या कामांचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसचे महापौर हारूण शिकलगार व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आले होते. सुरुवातीला उद्यानाच्या विकासाचे श्रेय कुणाचे? यावरून महापौरांनी राष्ट्रवादीला छेडले. ते म्हणाले की, मदनभाऊ पाटील यांनी या उद्यानाच्या जागेबाबत निर्णय घेतला. त्यानंतर सुरेश पाटील महापौर असताना २० लाख रुपयांची तरतूद करून विकासाची सुरूवात झाली, हे सांगताना त्यांनी विकासाचे श्रेय जयंतरावांना दिले. महाआघाडीच्या काळात उद्यानात मोठी कामे झाल्याचेही कबूल केले. त्यानंतर महापौरांनी आपला मोर्चा आगामी महापालिकेच्या निवडणुकीकडे वळविला. त्यासाठी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीचा संदर्भ दिला. शिकलगार म्हणाले की, गेल्या काही निवडणुकांत काय घडले, हे साऱ्यांनाच माहीत आहे. आजच अध्यक्ष निवडीचा निकाल लागला आहे. त्यातून तरी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे, असे सूचित करतानाच त्यांनी, अप्रत्यक्षपणे आगामी निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीचे संकेत दिले. हे सांगताना त्यांनी आपल्या महापौर पदावरही टिपणी केली. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सारेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. मीच केवळ काँग्रेसचा दिसतो. त्यामुळे माझे महापौरपद संकटात येते की काय, असे म्हणत त्यांनी जयंतरावांकडे कटाक्ष टाकला. महापौरांच्या भाषणानंतर जयंत पाटील यांनी सुरुवातीला उद्यान विकासाबाबत भूमिका मांडली. त्यांनाही महापौरांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देण्याचा मोह आवरला नाही. जिल्हा परिषद निवडणूक आणि त्यानंतर मंगळवारी झालेल्या अध्यक्ष निवडीवर अप्रत्यक्ष भाष्य करीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील दुराव्यामुळेच काही प्रश्न तयार झाल्याचे सांगितले. जाता जाता महापौरांचे कौतुक करीत त्यांनी पदभार हाती घेतल्यापासून काही चांगली कामे केली आहेत. त्यांच्या चांगला कामाच्या पाठीशी राष्ट्रवादीचे नगरसेवक राहतील, असेही आश्वासित केले. (प्रतिनिधी)