शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

चांदोली अभयारण्य कुंपणाचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वारणावती : गव्यांच्या कळपाने चांदोली अभयारण्य परिसरातील दहा किलोमीटरवरील शेतातील पिके उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वारणावती : गव्यांच्या कळपाने चांदोली अभयारण्य परिसरातील दहा किलोमीटरवरील शेतातील पिके उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. एकीकडे गवे पिकांचे नुकसान करत आहेत; तर दुसरीकडे बिबटे शेळ्या-मेंढ्या फस्त करीत आहेत. यामुळे उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न ग्रामस्थांपुढे निर्माण झाला आहे. तातडीने अभयारण्याभोवताली कुंपण घालणे गरजेचे आहे. अन्यथा परिसरातील शेतकरी उद्ध्वस्त होईल. मानव व जंगली प्राण्यांचा संघर्ष निर्माण होईल.

वानरांचा कळप शिवारातील पिकांचे नुकसान करतात. माणसाच्या अंगावर धावून जातात. एकटा माणूस किंवा महिला शेतात जाण्यास घाबरत आहेत. पिकांचे होणारे नुकसान पाहून शेतकरी हतबल होत आहे. तर दुसरीकडे बिबटे, तरस शेळ्या-मेंढ्यांवर हल्ले करीत आहेत.

गव्यांच्या कळपाने उभी पिके उद्ध्वस्त होतात. यामुळे डोंगरकपारीतील शेती पिकाविना ओस पडली आहे. तर बिबट्यांच्या दहशतीमुळे काही शेतकऱ्यांनी जनावरे पाळणे बंद केले आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अभयारण्याला कुंपण घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कोट

डोंगरकपारीतील शेतकऱ्यांची तटपुंजी शेती आहे. उदरनिर्वाहाचे साधन नाही. चांदोली अभयारण्यातील हिंस्र प्राण्यांची दहशत व वानरे, मोर, गवे यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पिकांचे होणारे नुकसान यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा. अन्यथा संघर्ष करावा लागेल.

- बाळासाहेब नायकवडी,

उपसभापती, शिराळा

१) फोटो-१९वारणावती१

फोटो ओळ : चांदोली अभयारण्याला कुंपण नसल्याने वन्यप्राण्यांकडून पिके उद्ध्वस्त केली जात आहेत.