शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

चांदोली अभयारण्य कुंपणाचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वारणावती : गव्यांच्या कळपाने चांदोली अभयारण्य परिसरातील दहा किलोमीटरवरील शेतातील पिके उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वारणावती : गव्यांच्या कळपाने चांदोली अभयारण्य परिसरातील दहा किलोमीटरवरील शेतातील पिके उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. एकीकडे गवे पिकांचे नुकसान करत आहेत; तर दुसरीकडे बिबटे शेळ्या-मेंढ्या फस्त करीत आहेत. यामुळे उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न ग्रामस्थांपुढे निर्माण झाला आहे. तातडीने अभयारण्याभोवताली कुंपण घालणे गरजेचे आहे. अन्यथा परिसरातील शेतकरी उद्ध्वस्त होईल. मानव व जंगली प्राण्यांचा संघर्ष निर्माण होईल.

वानरांचा कळप शिवारातील पिकांचे नुकसान करतात. माणसाच्या अंगावर धावून जातात. एकटा माणूस किंवा महिला शेतात जाण्यास घाबरत आहेत. पिकांचे होणारे नुकसान पाहून शेतकरी हतबल होत आहे. तर दुसरीकडे बिबटे, तरस शेळ्या-मेंढ्यांवर हल्ले करीत आहेत.

गव्यांच्या कळपाने उभी पिके उद्ध्वस्त होतात. यामुळे डोंगरकपारीतील शेती पिकाविना ओस पडली आहे. तर बिबट्यांच्या दहशतीमुळे काही शेतकऱ्यांनी जनावरे पाळणे बंद केले आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अभयारण्याला कुंपण घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कोट

डोंगरकपारीतील शेतकऱ्यांची तटपुंजी शेती आहे. उदरनिर्वाहाचे साधन नाही. चांदोली अभयारण्यातील हिंस्र प्राण्यांची दहशत व वानरे, मोर, गवे यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पिकांचे होणारे नुकसान यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा. अन्यथा संघर्ष करावा लागेल.

- बाळासाहेब नायकवडी,

उपसभापती, शिराळा

१) फोटो-१९वारणावती१

फोटो ओळ : चांदोली अभयारण्याला कुंपण नसल्याने वन्यप्राण्यांकडून पिके उद्ध्वस्त केली जात आहेत.