शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

वायरमन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: December 16, 2014 00:02 IST

राजापुरातील घटना : ठोस उपाययोजना करण्याची गरज

तासगाव : राजापूर (ता. तासगाव) येथे विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करताना एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना पहिलीच नाही, यापूर्वीही अनेक वायरमन धक्क्याने मृत झाले आहेत. एकूणच अशा स्वरुपाच्या जोखमीच्या कामाबाबत वीज वितरण कंपनीने ठोस उपाययोजना राबवण्याची आवश्यकता आहे.राजापूरमध्ये विजेच्या धक्क्याने मृत झालेले मदतनीस अशोक सुतार हे जरी वीज वितरणचे अधिकृत कर्मचारी नसले, तरी आज त्यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंब अडचणीत आले आहे. त्यांच्या मृत्यूप्रकरणी राजापूर ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर वीज वितरण कंपनीच्या दोघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आंदोलन मिटले. कारवाई झाली, आंदोलन झाले; पण पुढे काय? असे प्रकार अधिकृत कर्मचाऱ्यांच्याबाबतीतही झालेले आहेत. त्यांना नियमाप्रमाणे भरपाईही मिळते; पण खरी कहाणी तिथूनच सुरू होते. माणूस गेल्यानंतर कुटुंबाची होणारी अडचण कशी दूर होणार, हा प्रश्नच आहे. तासगाव तालुक्यातील राजापूरच्या घटनेने हे चर्चेत आले आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक गावात वीज वितरण कंपनीचा अधिकृत वायरमन असतोच. गाव लोकसंख्येने, क्षेत्राने मोठे असल्यास वायरमनची संख्याही वाढते. संबंधित वायरमनची तांत्रिक अडचण असल्यास मदतनीस म्हणून काम करणारेही आहेत. वीज वितरण कंपनीने वास्तविक अशा स्वरुपाच्या जोखीम असलेल्या कामांसाठी अधिकृत कर्मचारी नियुक्त केले पाहिजेत. ते प्रशिक्षितही असले पाहिजेत. त्यांची सुरक्षितता याला प्राधान्य दिले पाहिजे, अशी सर्वसामान्यांच्यात चर्चा आहे.प्रत्यक्षात काम करणारे तसेच त्यासाठी आवश्यक असणारी मदत कार्यालय स्तरातून करणारे हे दोन्हीही तितकेच महत्त्वाचे घटक आहेत. तासगाव तालुक्यात यापूर्वीही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तालुक्यात सध्या वीज वितरण कंपनीचे तीन विभाग आहेत. तासगाव ग्रामीण व सावळज या तीन विभागांद्वारे सर्व काम चालते. एकूणच अशा घटनांबाबत आता तरी वीज वितरण कंपनीने सावध व सतर्क होणे गरजेचे आहे. कर्मचारी अधिकृत असो अगर अनधिकृत असो, खांब तर वीज वितरणचाच आहे. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी गावपातळीवर काम करणाऱ्या वायरमनना सूचना देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)पस्तीसजणांवर गुन्हे दाखलराजापूर (ता. तासगाव) येथे विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करताना मदतनीस अशोक बबन सुतार यांच्या झालेल्या मृत्यूनंतर तासगावात रविवारी राजापूर ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोकोप्रकरणी सुमारे ३५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तासगाव पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल केला.