शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

गुणनियंत्रण अधिकाऱ्यांच्या बदलीचा ठराव

By admin | Updated: February 11, 2016 00:31 IST

तासगाव पंचायत समिती सभा : चारा छावण्या सुरु करण्याची मागणी; कृृषी विभागाचा वादग्रस्त कारभार

तासगाव : तासगाव पंचायत समितीकडील गुणनियंत्रण अधिकाऱ्यांचा कार्यभार प्रभारी असल्यामुळे कामे मार्गी लागत नाहीत. याबाबत लोकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांची बदली करण्याचा ठराव पंचायत समितीच्या सभेत घेण्यात आला. तसेच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे तातडीने चारा छावण्या सुरु कराव्यात, या माणगीचा ठरावदेखील करण्यात आला.सभापती सुनीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची सभा झाली. यावेळी उपसभापती अशोक घाईल, गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्यासह सर्व पंचायत समितीचे सदस्य, अधिकारी उपस्थित होते. तासगाव पंचायत समितीच्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांबाबत औषध विक्रेते, नागरिकांच्या तक्रारी होत्या. विटा पंचायत समितीत शिल्लक राहिलेले औषध फवारणी पंप तासगाव तालुक्यातील कृषी विक्रेत्यांना सक्तीने विकण्यात आले होते. याबाबत ‘लोकमत’मधून बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. या बातमीची दखल घेत पंचायत समितीच्या सदस्यांनी सभेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार होत असल्याची टीका सदस्य चंद्रकांत पाटील यांनी केली. चुकीचे प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन गुणनियंत्रण अधिकाऱ्यांच्या बदलीचा ठराव यावेळी घेण्यात आला. तसेच पूर्णवेळ गुणनियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या मागणीचाही ठराव यावेळी घेण्यात आला.तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे तातडीने चारा छावण्या सुरु कराव्यात, असा ठरावही यावेळी करण्यात आला. पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे मागणी असेल त्या ठिकाणी तातडीने टँकर उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणीही यावेळी सदस्यांनी केली. प्रादेशिक पाणी योजनेच्या पाणीपट्टीची एकूण मागणी आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने, या योजनांसाठीचे वीज बिल व्यावसायिक पध्दतीने आकारणी होत आहे. त्यामुळे वाढीव रक्कम शासनाने भरावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.ज्ञानरचनावादासाठी शासनाकडून मदत द्या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतून ज्ञानरचनावादी शिक्षण पध्दतीचा अवलंब केला जात आहे. विद्यार्थ्यांसाठी ही शिक्षण पध्दती उपयोगी आहे. मात्र काही शाळा जुन्या आणि अपुऱ्या वर्गखोल्या असल्यामुळे त्यांना चांगली सुविधा देता येत नाही. त्यामुळे अशा शाळांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.चारा छावण्या, टँकर सुरु करातासगाव तालुक्यात सध्या भीषण टंचाईची परिस्थिती आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तातडीने चारा छावण्या सुरु कराव्यात, या मागणीचा ठराव तासगाव पंचायत समितीच्या सभेत घेण्यात आला. तसेच मागणी असेल त्या ठिकाणी तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्याच्या मागणीचा ठराव सभेत करण्यात आला