शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

ग्रामपंचायतीतही जगतापांना धक्का

By admin | Updated: July 30, 2015 00:30 IST

बाजार समितीकडे लक्ष : सुरेश शिंदे, विक्रम सावंत यांच्या आक्रमकतेने कार्यकर्ते रिचार्ज

जयवंत आदाटे-जत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपाठोपाठ जत तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला समाधानकारक यश मिळाले आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्ते पक्षाच्या प्रवाहात सक्रिय सहभागी होऊ लागले आहेत. बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे व जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत यांनी आमदार विलासराव जगताप यांना हा दुसरा धक्का दिला आहे. त्यामुळे आगामी बाजार समिती निवडणुकीत काय होणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक निकाल अनपेक्षित लागला. आमदार विलासराव जगताप विधानसभा निवडणूक निकालानंतर गाफील राहिले. त्याचा फायदा विक्रम सावंत यांना मिळाला. त्यामुळे ते विजयी झाले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षाला उटगी, शेडशाळ, सिध्दनाथ, सिंगणहळ्ळी या गावांत एकहाती सत्ता मिळाली आहे. भाजपला तेथे एकही जागा मिळाली नाही. मेंढेगिरी, शेगाव, सनमडी, मायथळ, भिवर्गी, वळसंग, उटगी या गावांत भाजपचे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते व पंचायत समिती सदस्य आणि बाजार समितीचे माजी सभापती तेथील स्थानिक रहिवासी होते. गावातील स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यापेक्षा जत पंचायत समितीत येऊन ठाण मांडून बसणे, त्यांना राजकीयदृष्ट्या सोयीचे वाटत होते. आम्ही ग्रामीण भागातील कार्यकर्ते नसून शहरी भागातील नेतेच आहोत, अशा अविर्भावात ते वागत होते. त्याचा फटका आमदार विलासराव जगताप यांना बसला आहे. तिकोंडी व धावडवाडी या दोन गावात भाजपला काठावरचे बहुमत मिळाले आहे. ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर होत नाहीत. स्थानिक राजकारण, तेथील प्रलंबित प्रश्न यावर जादा भर दिला जातो. परंतु काही गावांतील अपवाद वगळता काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही गावात भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यासोबत युती करून ग्रामपंचायत निवडणूक लढविली नाही. अटी-तटीच्या लढती होऊन चुरशीने मतदान झाले. त्यानंतर निवडणूक निकाल बाहेर पडले आहेत. भिवर्गी, शेगाव, उटगी, सनमडी, मायथळ, गुगवाड ही तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावे आहेत. या ग्रामपंचायती आता काँग्रेस पक्षाच्या नियंत्रणाखाली आल्या आहेत. अल्पावधित भाजपला उतरती कळा का लागली आहे, यामागील नेमके कारण काय आहे, असा प्रश्न नागरिकांतून आता उपस्थित होऊ लागला आहे. अल्पावधित बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंतुष्ट कार्यकर्ते आणि उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालेले उमेदवार यांची चाचपणी करण्यास सुरेश शिंदे आणि विक्रम सावंत व माजी आमदार उमाजी सनमडीकर यांनी सुरुवात केली आहे. जिल्हा बँक व ग्रामपंचायत निवडणुकीत सलग दोनवेळा विजय मिळाल्यामुळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आता रिचार्ज झाले आहेत. आमदार विलासराव जगताप यांनी मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी नवीन उमेदवारांना संधी दिली आहे. याशिवाय विरोधकांची चाल ओळखून त्यांनी सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. परंतु निवडणूक निकालानंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर जत तालुक्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे. ५जगतापच टार्गेट...जिल्हा मध्यवर्ती बँकेचे राजकीय वातावरण शांत होत नाही तोपर्यंतच तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. पुत्र मनोज जगताप यांच्या अनपेक्षित पराभवामुळे जगताप यांनी ग्रामपंचायतींच्या मैदानातून वचपा काढण्याची तयारी चालविली होती. मात्र माजी आमदार उमाजी सनमडीकर, सुरेश शिंदे व विक्रम सावंत यांनी आणि काँग्रेसच्या इतर मान्यवरांनी एकत्रितपणे प्रत्येक गावात जाऊन काँग्रेस पक्षाची भूमिका पटवून देण्यात यश मिळविले. याशिवाय निवडणुकीदरम्यान आमदार विलासराव जगताप यांनाच मुख्य टार्गेट केले. त्यामुळे ते विजयी झाले होते. काँग्रेस पक्षाला उटगी, शेडशाळ, सिध्दनाथ, सिंगणहळ्ळी या गावांत एकहाती सत्ता मिळाली आहे. भाजपला तेथे एकही जागा मिळाली नाही. हाय प्रोफाईल राजकारणाचा फटकाविलासराव जगताप यांच्या विधानसभेतील विजयानंतर भाजपवासी झालेले अनेक कार्यकर्ते सोयीनुसार भूमिका बदलत राहिले. परिणामी सामान्यांशी असलेली त्यांची नाळ तुटली. त्यांच्या हाय प्रोफाईल राजकारणाचा आणि समाजकारणाचा ग्रामीण भागातील नागरिकांना कंटाळा आला होता. त्यांनी त्यांची नाराजी मतपेटीतून उघड केली आहे.