शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

दडवून ठेवलेल्या विचारांची राज्यात उबळ

By admin | Updated: December 5, 2015 00:21 IST

जयंत पाटील : येडेमच्छिंद्र येथे नाना पाटील यांच्या पुतळा सुशोभिकरणाचे उद्घाटन

शिरटे : क्रांतिसिंह नाना पाटील यांची कर्मभूमी राज्यव्यापी होती. आयुष्यभर धर्मनिरपेक्ष विचारसरणी जोपासताना त्यांनी जातीय विचारसरणीला कधीही खत-पाणी घातले नाही. धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या नेत्यांच्या होणाऱ्या हत्येला एक अर्थ असून, दडवून ठेवलेल्या विचारांची उबळ आता सर्वत्र येत आहे. हत्या करणाऱ्या या विचारांच्या विरोधात आता लढा उभारण्याची गरज असल्याचे मत माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले.येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे उद्योजक सर्जेराव यादव यांनी स्वखर्चातून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळा व परिसराच्या केलेल्या सुशोभिकरणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी खासदार विश्वासराव पाटील, मोहनराव कदम, अरुण लाड, अ‍ॅड. सुभाष पाटील, गौरव नायकवडी, अलकाताई पुजारी, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सुश्मिता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.जयंत पाटील व मान्यवरांच्याहस्ते उद्योजक सर्जेराव यादव व त्यांच्या पत्नी माधुरीताई यादव यांचा सत्कार करण्यात आला. सर्जेराव यादव प्रतिष्ठानच्यावतीने हौसाताई पाटील यांच्यावतीने अ‍ॅड. सुभाष पाटील, क्रांतिमाता कुसूमताई नायकवडी यांच्यावतीने सरपंच गौरव नायकवडी, माजी जिल्हा परिषद सदस्या अलकाताई पुजारी, सरपंच संजय पाटील, उपसरपंच मनीषा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.अ‍ॅड. संग्राम पाटील यांनी प्रास्ताविक केले. गोपाल पाटसुपे यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच संजय पाटील यांनी आभार मानले.यावेळी हणमंतराव पाटील, दिलीपराव देसाई, बबनराव सावंत, रमेश पाटील, महिपती पाटील, अजित पाटील, बाबूराव पाटील, अंजनाताई पाटील, सर्जेराव पाटील, विश्वास खंडागळे, अभिमन्यू पाटील, युवराज पाटील, शरद साळुंखे, आनंद पाटील, संदीप स्वामी, दिलीप पाटील, सुरेश पाटील, प्रताप पाटील, सुभाष चव्हाण, शरद पाटील, हौसेराव पाटील, शिवाजी पाटील, दिनकर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)क्रांतिसिंहांची प्रेरणा : युवकांना मार्गदर्शक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यामुळे वाळव्याची ओळख देशभरात पोहोचली. त्यांच्याच प्रेरणेतून नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड यांच्या नेतृत्वाखली स्वातंत्र्यसैनिकांची आख्खी पिढी पारतंत्र्यात स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतर सर्वसामान्यांच्या हितासाठी लढत राहिली. यातूनच क्रांतिसिंहांचे विचार उमटत राहिले. भावी पिढ्यांना त्यांचे विचार मार्गदर्शक आहेत, अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.