शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दडवून ठेवलेल्या विचारांची राज्यात उबळ

By admin | Updated: December 5, 2015 00:21 IST

जयंत पाटील : येडेमच्छिंद्र येथे नाना पाटील यांच्या पुतळा सुशोभिकरणाचे उद्घाटन

शिरटे : क्रांतिसिंह नाना पाटील यांची कर्मभूमी राज्यव्यापी होती. आयुष्यभर धर्मनिरपेक्ष विचारसरणी जोपासताना त्यांनी जातीय विचारसरणीला कधीही खत-पाणी घातले नाही. धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या नेत्यांच्या होणाऱ्या हत्येला एक अर्थ असून, दडवून ठेवलेल्या विचारांची उबळ आता सर्वत्र येत आहे. हत्या करणाऱ्या या विचारांच्या विरोधात आता लढा उभारण्याची गरज असल्याचे मत माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले.येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे उद्योजक सर्जेराव यादव यांनी स्वखर्चातून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळा व परिसराच्या केलेल्या सुशोभिकरणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी खासदार विश्वासराव पाटील, मोहनराव कदम, अरुण लाड, अ‍ॅड. सुभाष पाटील, गौरव नायकवडी, अलकाताई पुजारी, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सुश्मिता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.जयंत पाटील व मान्यवरांच्याहस्ते उद्योजक सर्जेराव यादव व त्यांच्या पत्नी माधुरीताई यादव यांचा सत्कार करण्यात आला. सर्जेराव यादव प्रतिष्ठानच्यावतीने हौसाताई पाटील यांच्यावतीने अ‍ॅड. सुभाष पाटील, क्रांतिमाता कुसूमताई नायकवडी यांच्यावतीने सरपंच गौरव नायकवडी, माजी जिल्हा परिषद सदस्या अलकाताई पुजारी, सरपंच संजय पाटील, उपसरपंच मनीषा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.अ‍ॅड. संग्राम पाटील यांनी प्रास्ताविक केले. गोपाल पाटसुपे यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच संजय पाटील यांनी आभार मानले.यावेळी हणमंतराव पाटील, दिलीपराव देसाई, बबनराव सावंत, रमेश पाटील, महिपती पाटील, अजित पाटील, बाबूराव पाटील, अंजनाताई पाटील, सर्जेराव पाटील, विश्वास खंडागळे, अभिमन्यू पाटील, युवराज पाटील, शरद साळुंखे, आनंद पाटील, संदीप स्वामी, दिलीप पाटील, सुरेश पाटील, प्रताप पाटील, सुभाष चव्हाण, शरद पाटील, हौसेराव पाटील, शिवाजी पाटील, दिनकर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)क्रांतिसिंहांची प्रेरणा : युवकांना मार्गदर्शक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यामुळे वाळव्याची ओळख देशभरात पोहोचली. त्यांच्याच प्रेरणेतून नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड यांच्या नेतृत्वाखली स्वातंत्र्यसैनिकांची आख्खी पिढी पारतंत्र्यात स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतर सर्वसामान्यांच्या हितासाठी लढत राहिली. यातूनच क्रांतिसिंहांचे विचार उमटत राहिले. भावी पिढ्यांना त्यांचे विचार मार्गदर्शक आहेत, अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.