शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पर्युषण पर्वाला सुंदर परंपरेचा साज

By admin | Updated: August 29, 2016 23:14 IST

उत्साहात पर्वारंभ : गणपती पेठेतील मंदिराची शतकाकडे वाटचाल

सांगली : आध्यात्मिक ऊर्जा वाढविण्यासाठी, क्षमा करण्यासाठी आणि क्षमा मागण्यासाठी जैन धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या पर्युषण पर्वाची सांगलीतील परंपरा सुंदर गोष्टींनी सजली आहे. मुख्य मंदिरासह पाच ठिकाणी स्थापन झालेल्या मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून सुंदर आरास व धार्मिक कार्यक्रमांची वेगळी परंपरा जपण्यात आली आहे. त्यामुळे येथील या सणाला पाच मंदिरांच्या माध्यमातून पंचरत्नांचा साज चढला आहे. सोमवारी जैन धर्मिय श्वेतांबर पंथियांच्या आठ दिवस चालणाऱ्या पर्युषण पर्वास सुरुवात झाली. विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पर्व सुरू झाले आहे. सांगलीतील पद्मा थिएटरसमोर श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ देहरासर ट्रस्टचे अमिझरा पार्श्वनाथ देहरासर हे मंदिर ६८ वर्षांपूर्वी उभारण्यात आले. हे मुख्य मंदिर आहे. याठिकाणी रत्नजडीत आरास करण्यात येते. हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. गणपती पेठेतील गोडीजी पार्श्वनाथ मंदिर व्यापाऱ्यांनी उभारलेले आहे. लवकरच या मंदिराच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. सांगलीतील हे सर्वात जुने मंदिर आहे. रतनशीनगरमध्ये आदिनाथ देहरासर, जवाहर सोसायटीतील धर्मनाथ मंदिर आणि त्रिकोणी बागेजवळील भगवान महावीर मंदिर अशा पाच मंदिरांची सांगलीला मोठी पंरपरा आहे. या पाचही मंदिरांमध्ये एकेक दिवस वैशिष्ट्यपूर्ण आरास करून धार्मिक कार्यक्रम होत असतात. जप, तप, संगीतमय धार्मिक कार्यक्रम यांची रेलचेल या दिवसांमध्ये असते. पुरुषांसोबत महिलाही मोठ्या उत्साहाने या मंदिरांमधील धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. पर्वकाळात दररोज सायंकाळी प्रतिक्रमण (क्षमा मागणे), रात्री भावना (भक्तिसंध्या) असे कार्यक्रम याठिकाणी होत असतात. पर्युषण पर्व काळात महावीरांचे सैनिक ज्यांना वीरसैनिक म्हटले जाते, ते व्याख्यानासाठी येत असतात. त्यांच्यामार्फत धर्मआराधना केली जाते. सांगली शहरात व जिल्ह्यात श्वेतांबर जैन समाज शेकडो वर्षांपासून आहे. त्यामुळे तितक्या वर्षांची परंपरा या पर्युषण पर्वाला लाभली आहे. तरीही मंदिरांमध्ये कार्यक्रमांच्या माध्यमातून सुमारे १०० वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा जपतानाच त्यास अधिक व्यापकता देण्यात येत आहे. (प्रतिनिधी)सणाचा मुख्य उद्देश...हा सण साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आत्म्याची शुद्धी करून योग्य उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करणे हा आहे. पूजा-अर्चा, आरती, त्याग, तपस्या आणि उपवास करून अधिकाधिक वेळ संताच्या सान्निध्यात घालविला जातो. गणेश चतुर्थी किंवा ऋषीपंचमीच्या दिवशी संवत्सरी पर्व साजरे केले जाते. त्या दिवशी लोक उपवास करून पापाला झिडकारून आणि भविष्यात त्यापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा करतात.