शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पर्युषण पर्वाला सुंदर परंपरेचा साज

By admin | Updated: August 29, 2016 23:14 IST

उत्साहात पर्वारंभ : गणपती पेठेतील मंदिराची शतकाकडे वाटचाल

सांगली : आध्यात्मिक ऊर्जा वाढविण्यासाठी, क्षमा करण्यासाठी आणि क्षमा मागण्यासाठी जैन धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या पर्युषण पर्वाची सांगलीतील परंपरा सुंदर गोष्टींनी सजली आहे. मुख्य मंदिरासह पाच ठिकाणी स्थापन झालेल्या मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून सुंदर आरास व धार्मिक कार्यक्रमांची वेगळी परंपरा जपण्यात आली आहे. त्यामुळे येथील या सणाला पाच मंदिरांच्या माध्यमातून पंचरत्नांचा साज चढला आहे. सोमवारी जैन धर्मिय श्वेतांबर पंथियांच्या आठ दिवस चालणाऱ्या पर्युषण पर्वास सुरुवात झाली. विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पर्व सुरू झाले आहे. सांगलीतील पद्मा थिएटरसमोर श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ देहरासर ट्रस्टचे अमिझरा पार्श्वनाथ देहरासर हे मंदिर ६८ वर्षांपूर्वी उभारण्यात आले. हे मुख्य मंदिर आहे. याठिकाणी रत्नजडीत आरास करण्यात येते. हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. गणपती पेठेतील गोडीजी पार्श्वनाथ मंदिर व्यापाऱ्यांनी उभारलेले आहे. लवकरच या मंदिराच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. सांगलीतील हे सर्वात जुने मंदिर आहे. रतनशीनगरमध्ये आदिनाथ देहरासर, जवाहर सोसायटीतील धर्मनाथ मंदिर आणि त्रिकोणी बागेजवळील भगवान महावीर मंदिर अशा पाच मंदिरांची सांगलीला मोठी पंरपरा आहे. या पाचही मंदिरांमध्ये एकेक दिवस वैशिष्ट्यपूर्ण आरास करून धार्मिक कार्यक्रम होत असतात. जप, तप, संगीतमय धार्मिक कार्यक्रम यांची रेलचेल या दिवसांमध्ये असते. पुरुषांसोबत महिलाही मोठ्या उत्साहाने या मंदिरांमधील धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. पर्वकाळात दररोज सायंकाळी प्रतिक्रमण (क्षमा मागणे), रात्री भावना (भक्तिसंध्या) असे कार्यक्रम याठिकाणी होत असतात. पर्युषण पर्व काळात महावीरांचे सैनिक ज्यांना वीरसैनिक म्हटले जाते, ते व्याख्यानासाठी येत असतात. त्यांच्यामार्फत धर्मआराधना केली जाते. सांगली शहरात व जिल्ह्यात श्वेतांबर जैन समाज शेकडो वर्षांपासून आहे. त्यामुळे तितक्या वर्षांची परंपरा या पर्युषण पर्वाला लाभली आहे. तरीही मंदिरांमध्ये कार्यक्रमांच्या माध्यमातून सुमारे १०० वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा जपतानाच त्यास अधिक व्यापकता देण्यात येत आहे. (प्रतिनिधी)सणाचा मुख्य उद्देश...हा सण साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आत्म्याची शुद्धी करून योग्य उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करणे हा आहे. पूजा-अर्चा, आरती, त्याग, तपस्या आणि उपवास करून अधिकाधिक वेळ संताच्या सान्निध्यात घालविला जातो. गणेश चतुर्थी किंवा ऋषीपंचमीच्या दिवशी संवत्सरी पर्व साजरे केले जाते. त्या दिवशी लोक उपवास करून पापाला झिडकारून आणि भविष्यात त्यापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा करतात.