शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

राज्यकर्त्यांमुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित: पुरुषोत्तम खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 23:56 IST

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात व मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांत एकवाक्यता दिसत नाही. त्यातच या आंदोलनामुळे मराठा समाजाविषयी इतर समाजात द्वेष निर्माण झाला आहे. मराठा विरूध्द मराठे वाद तर राज्याला कदापी परवडणारा नसून आजवरच्या राज्यकर्त्यांमुळेच आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहिल्याची टीका मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर ...

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात व मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांत एकवाक्यता दिसत नाही. त्यातच या आंदोलनामुळे मराठा समाजाविषयी इतर समाजात द्वेष निर्माण झाला आहे. मराठा विरूध्द मराठे वाद तर राज्याला कदापी परवडणारा नसून आजवरच्या राज्यकर्त्यांमुळेच आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहिल्याची टीका मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी सांगलीत केली.मराठा सेवा संघाच्यावतीने आयोजित जनसंवाद दौºयानिमित्त सांगलीत आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत खेडेकर बोलत होते. आरक्षण हे छोटेसे साधन असून अंतिम साध्य नसल्याचे सांगत, जे आंदोलन सुरू आहे, त्याला नेतृत्व मिळाले तरच आंदोलन यशस्वी होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.खेडेकर पुढे म्हणाले की, गेल्या वर्षभरात राज्यभर झालेल्या मराठा क्रांती मोर्चांपासून सेवा संघ दूर राहिला आहे. त्यानंतर निघालेल्या प्रतिमोर्चावेळी थोडी जरी गडबड झाली असती, तर वेगळे चित्र निर्माण झाले असते. सध्या तर दंगली निर्माण व्हाव्यात असेच वातावरण निर्माण केले जात आहे. सोशल मीडियावर हे वातावरण अधिक असल्याने मराठा समाजाने सावध भूमिका घ्यावी.आरक्षण मिळवायचेच असेल, तर त्याचा घटनात्मक पातळीवर विचार करून मगच लढा उभा करायला हवा आणि ओबीसींमध्येच अ ब क ड असे विभाग करून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाला पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी राजेंद्रसिंह पाटील, किरण पाटील, नितीन चव्हाण, उत्तमराव माने, रमेश गुजर, आशा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.खेडेकर य् मोर्चेकºयांत एकवाक्यता नाहीाांनी मराठा क्रांती मोर्चाबद्दल नाराजी व्यक्त केली. मोर्चेकºयांत कोणतीही एकवाक्यता नसल्याने अत्यंत साध्या मागणीसाठी हे मोर्चे झाले. समाजापुढे अनेक प्रश्न असतानाही, सध्या आरक्षणाभोवतीच फिरायला लावण्यात येत आहे. यातून इतर समाजाच्या मनात मराठा समाजाबद्दल तिटकारा, द्वेष निर्माण झाला असून, क्रांती मोर्चाने केलेल्या मागण्या कागदावरच राहिल्या असून इतर प्रश्न बाजूला पडले आहेत, असे ते म्हणाले.