शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

राज्यकर्त्यांमुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित: पुरुषोत्तम खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 23:56 IST

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात व मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांत एकवाक्यता दिसत नाही. त्यातच या आंदोलनामुळे मराठा समाजाविषयी इतर समाजात द्वेष निर्माण झाला आहे. मराठा विरूध्द मराठे वाद तर राज्याला कदापी परवडणारा नसून आजवरच्या राज्यकर्त्यांमुळेच आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहिल्याची टीका मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर ...

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात व मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांत एकवाक्यता दिसत नाही. त्यातच या आंदोलनामुळे मराठा समाजाविषयी इतर समाजात द्वेष निर्माण झाला आहे. मराठा विरूध्द मराठे वाद तर राज्याला कदापी परवडणारा नसून आजवरच्या राज्यकर्त्यांमुळेच आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहिल्याची टीका मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी सांगलीत केली.मराठा सेवा संघाच्यावतीने आयोजित जनसंवाद दौºयानिमित्त सांगलीत आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत खेडेकर बोलत होते. आरक्षण हे छोटेसे साधन असून अंतिम साध्य नसल्याचे सांगत, जे आंदोलन सुरू आहे, त्याला नेतृत्व मिळाले तरच आंदोलन यशस्वी होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.खेडेकर पुढे म्हणाले की, गेल्या वर्षभरात राज्यभर झालेल्या मराठा क्रांती मोर्चांपासून सेवा संघ दूर राहिला आहे. त्यानंतर निघालेल्या प्रतिमोर्चावेळी थोडी जरी गडबड झाली असती, तर वेगळे चित्र निर्माण झाले असते. सध्या तर दंगली निर्माण व्हाव्यात असेच वातावरण निर्माण केले जात आहे. सोशल मीडियावर हे वातावरण अधिक असल्याने मराठा समाजाने सावध भूमिका घ्यावी.आरक्षण मिळवायचेच असेल, तर त्याचा घटनात्मक पातळीवर विचार करून मगच लढा उभा करायला हवा आणि ओबीसींमध्येच अ ब क ड असे विभाग करून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाला पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी राजेंद्रसिंह पाटील, किरण पाटील, नितीन चव्हाण, उत्तमराव माने, रमेश गुजर, आशा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.खेडेकर य् मोर्चेकºयांत एकवाक्यता नाहीाांनी मराठा क्रांती मोर्चाबद्दल नाराजी व्यक्त केली. मोर्चेकºयांत कोणतीही एकवाक्यता नसल्याने अत्यंत साध्या मागणीसाठी हे मोर्चे झाले. समाजापुढे अनेक प्रश्न असतानाही, सध्या आरक्षणाभोवतीच फिरायला लावण्यात येत आहे. यातून इतर समाजाच्या मनात मराठा समाजाबद्दल तिटकारा, द्वेष निर्माण झाला असून, क्रांती मोर्चाने केलेल्या मागण्या कागदावरच राहिल्या असून इतर प्रश्न बाजूला पडले आहेत, असे ते म्हणाले.