शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

राज्यकर्त्यांमुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित: पुरुषोत्तम खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 23:56 IST

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात व मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांत एकवाक्यता दिसत नाही. त्यातच या आंदोलनामुळे मराठा समाजाविषयी इतर समाजात द्वेष निर्माण झाला आहे. मराठा विरूध्द मराठे वाद तर राज्याला कदापी परवडणारा नसून आजवरच्या राज्यकर्त्यांमुळेच आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहिल्याची टीका मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर ...

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात व मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांत एकवाक्यता दिसत नाही. त्यातच या आंदोलनामुळे मराठा समाजाविषयी इतर समाजात द्वेष निर्माण झाला आहे. मराठा विरूध्द मराठे वाद तर राज्याला कदापी परवडणारा नसून आजवरच्या राज्यकर्त्यांमुळेच आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहिल्याची टीका मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी सांगलीत केली.मराठा सेवा संघाच्यावतीने आयोजित जनसंवाद दौºयानिमित्त सांगलीत आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत खेडेकर बोलत होते. आरक्षण हे छोटेसे साधन असून अंतिम साध्य नसल्याचे सांगत, जे आंदोलन सुरू आहे, त्याला नेतृत्व मिळाले तरच आंदोलन यशस्वी होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.खेडेकर पुढे म्हणाले की, गेल्या वर्षभरात राज्यभर झालेल्या मराठा क्रांती मोर्चांपासून सेवा संघ दूर राहिला आहे. त्यानंतर निघालेल्या प्रतिमोर्चावेळी थोडी जरी गडबड झाली असती, तर वेगळे चित्र निर्माण झाले असते. सध्या तर दंगली निर्माण व्हाव्यात असेच वातावरण निर्माण केले जात आहे. सोशल मीडियावर हे वातावरण अधिक असल्याने मराठा समाजाने सावध भूमिका घ्यावी.आरक्षण मिळवायचेच असेल, तर त्याचा घटनात्मक पातळीवर विचार करून मगच लढा उभा करायला हवा आणि ओबीसींमध्येच अ ब क ड असे विभाग करून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाला पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी राजेंद्रसिंह पाटील, किरण पाटील, नितीन चव्हाण, उत्तमराव माने, रमेश गुजर, आशा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.खेडेकर य् मोर्चेकºयांत एकवाक्यता नाहीाांनी मराठा क्रांती मोर्चाबद्दल नाराजी व्यक्त केली. मोर्चेकºयांत कोणतीही एकवाक्यता नसल्याने अत्यंत साध्या मागणीसाठी हे मोर्चे झाले. समाजापुढे अनेक प्रश्न असतानाही, सध्या आरक्षणाभोवतीच फिरायला लावण्यात येत आहे. यातून इतर समाजाच्या मनात मराठा समाजाबद्दल तिटकारा, द्वेष निर्माण झाला असून, क्रांती मोर्चाने केलेल्या मागण्या कागदावरच राहिल्या असून इतर प्रश्न बाजूला पडले आहेत, असे ते म्हणाले.