शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

सांगली, कुपवाडला शुद्ध पाणीपुरवठा

By admin | Updated: April 12, 2017 23:42 IST

हारुण शिकलगार : जयश्रीताई पाटील यांच्याहस्ते उद्या प्रारंभ

सांगली : महापालिकेच्या माळबंगला येथील ३६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचा विस्तार करून ५६ एमएलडीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या योजनेतून सांगली व कुपवाड या दोन शहरांना पूर्वीपेक्षा शुद्ध व स्वच्छ पाणी मिळणार आहे. या प्रकल्पाचा प्रारंभ १४ एप्रिलरोजी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महापौर हारूण शिकलगार यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली. ते म्हणाले की, काँग्रेसच्या सत्ताकाळात २००६ मध्ये सांगली व कुपवाड शहरासाठी सुधारित पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. वारणा उद््भव निश्चित करून पाणी योजना आखण्यात आली. या योजनेचा प्रारंभ माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. त्यानंतर सत्तेवर आलेल्या विकास महाआघाडीने या योजनेत काही बदल केले. पण सुधारित आराखड्याला शासनाची मंजुरी घेऊन कामाला सुरूवात केली. पाण्याची टाकी, जलवाहिन्या टाकण्यासह माळबंगला येथील ५६ व ७० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम सुरू होते. त्यातील ५६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी अंदाजे तीन कोटी रुपये खर्च झाले आहेत. पूर्वीच्या ३६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात आली आहे. पाणी शुद्ध व स्वच्छ देण्यासाठी काही उपांगामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. शिवाय काही नवीन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. दोन क्लेरिप्लोक्युलेटर्सची क्षमता वाढविल्याने पाणी शुद्ध होण्याचे प्रमाण वाढणार आहे. या प्रकल्पातून सांगली व कुपवाड या दोन शहरांना शुद्ध पाणी मिळणार आहे. त्याचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिलपासून करीत आहोत, असेही शिकलगार यांनी सांगितले. माळबंगला येथील दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रांचे काम पूर्ण झाल्यानंतर हिराबाग वॉटर वर्क्स येथील जलशुद्धीकरण केंद्र बंद करावे, असा प्रस्ताव होता. पण आम्ही हिराबागचे केंद्र बंद करणार नाही. माळबंगला येथील काम पूर्ण झाल्यानंतर हिराबाग जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे कामही हाती घेणार आहोत. भविष्यात सांगली शहर अंकली, धामणीपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे या केंद्राची गरज भासणार आहे. त्यामुळे हिराबाग वॉटर वर्क्स बंद करण्याचा प्रश्नच उद््भवत नाही, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)