शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

सांगली, कुपवाडला शुद्ध पाणीपुरवठा

By admin | Updated: April 12, 2017 23:42 IST

हारुण शिकलगार : जयश्रीताई पाटील यांच्याहस्ते उद्या प्रारंभ

सांगली : महापालिकेच्या माळबंगला येथील ३६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचा विस्तार करून ५६ एमएलडीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या योजनेतून सांगली व कुपवाड या दोन शहरांना पूर्वीपेक्षा शुद्ध व स्वच्छ पाणी मिळणार आहे. या प्रकल्पाचा प्रारंभ १४ एप्रिलरोजी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महापौर हारूण शिकलगार यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली. ते म्हणाले की, काँग्रेसच्या सत्ताकाळात २००६ मध्ये सांगली व कुपवाड शहरासाठी सुधारित पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. वारणा उद््भव निश्चित करून पाणी योजना आखण्यात आली. या योजनेचा प्रारंभ माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. त्यानंतर सत्तेवर आलेल्या विकास महाआघाडीने या योजनेत काही बदल केले. पण सुधारित आराखड्याला शासनाची मंजुरी घेऊन कामाला सुरूवात केली. पाण्याची टाकी, जलवाहिन्या टाकण्यासह माळबंगला येथील ५६ व ७० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम सुरू होते. त्यातील ५६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी अंदाजे तीन कोटी रुपये खर्च झाले आहेत. पूर्वीच्या ३६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात आली आहे. पाणी शुद्ध व स्वच्छ देण्यासाठी काही उपांगामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. शिवाय काही नवीन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. दोन क्लेरिप्लोक्युलेटर्सची क्षमता वाढविल्याने पाणी शुद्ध होण्याचे प्रमाण वाढणार आहे. या प्रकल्पातून सांगली व कुपवाड या दोन शहरांना शुद्ध पाणी मिळणार आहे. त्याचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिलपासून करीत आहोत, असेही शिकलगार यांनी सांगितले. माळबंगला येथील दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रांचे काम पूर्ण झाल्यानंतर हिराबाग वॉटर वर्क्स येथील जलशुद्धीकरण केंद्र बंद करावे, असा प्रस्ताव होता. पण आम्ही हिराबागचे केंद्र बंद करणार नाही. माळबंगला येथील काम पूर्ण झाल्यानंतर हिराबाग जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे कामही हाती घेणार आहोत. भविष्यात सांगली शहर अंकली, धामणीपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे या केंद्राची गरज भासणार आहे. त्यामुळे हिराबाग वॉटर वर्क्स बंद करण्याचा प्रश्नच उद््भवत नाही, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)