शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आधारभूत किमतीलाच धान्याची खरेदी करावी

By admin | Updated: November 28, 2014 23:48 IST

..अन्यथा कारवाई : प्रशासकांचा इशारा

तासगाव : शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीलाच शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्यात यावे, अन्यथा बाजार समिती कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा तासगाव बाजार समितीचे नवनियुक्त प्रशासक शंकर पाटील यांनी व्यापाऱ्यांना दिला.बाजार समिती आवारातील व्यापारी, शेतकऱ्यांच्या दराबाबत आयोजित केलेल्या बैठकीत शंकर पाटील बोलत होते. पाटील म्हणाले, बाजार समिती शेतकऱ्यांच्या हिताची आहे. शेतकऱ्यांचे हित हेच बाजार समितीचे हित असते. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होईल असे कृत्य करू नये. तसे आढळून आल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून शेतकरी बाजार समितीत माल घेऊन येतो. शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा कमी दराने कोणत्याही व्यापाऱ्याने माल खरेदी करू नये, यावर बाजार समितीचे बारकाईने लक्ष राहणार असल्याचेही शंकर पाटील म्हणाले. यावेळी तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे उपस्थित होते. (वार्ताहर)शेतकऱ्यांनी संपर्क साधावा!बाजार समिती आवारात काही अडचणी निर्माण झाल्या, तर शेतकऱ्यांनी थेट बाजार समितीशी संपर्क साधावा, शेतकऱ्यांची कोणत्याही बाबतीत फसवणूक तसेच पिळवणूक होणार नाही, याकडे बाजार समिती विशेष लक्ष देणार आहे, असेही शंकर पाटील यांनी सांगितले.