शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अचानक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:26 IST

सांगली : महापुरातील नुकसानीबद्दल शासनाने जाहीर केलेली मदत अद्याप मिळालेली नाही. त्यातच अचानक व्यापाऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे बंद केले आहेत. ...

सांगली : महापुरातील नुकसानीबद्दल शासनाने जाहीर केलेली मदत अद्याप मिळालेली नाही. त्यातच अचानक व्यापाऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे बंद केले आहेत. चौकशी केल्यानंतर शासकीय उत्तरे दिली जात आहेत, अशी माहिती व्यापारी एकता असोसिएशनचे प्रमुख समीर शहा यांनी दिली.

त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, लॉकडाऊन असतानाच महापूर आला. पूर ओसरून महिना झाला, पण अद्याप तातडीची मदत मिळालेली नाही. अद्याप बऱ्याच व्यापारी बांधवांचे पंचनामे झालेले नसताना अचानक प्रशासनाने पंचनामे बंद केले आहेत. त्याबाबत चौकशी केल्यानंतर मिरजेच्या तहसीलदारांशी संपर्क साधा किंवा पत्र पाठवा, असे उत्तर मिळत आहे. प्रशासनाला व शासनाला नक्की व्यापाऱ्यांना मदत करायची आहे की त्रास द्यायचा आहे, हे प्रशासनाने स्पष्ट करावे.

प्रलंबित असलेले पंचनामे होऊन नक्की मदत कधी मिळणार आहे का, गरज असताना मदत मिळाली, तर ती तोकडी का असेना कामाला येत असते, पण काहीच दिलासादायक चित्र नाही. महापालिका, जिल्हा प्रशासन, राज्य शासन यांच्याकडून व्यापाऱ्यांना कवडीची मदत मिळालेली नाही.

सांगलीची बाजारपेठ स्थलांतर, पुनर्वसन अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. आम्ही विस्तारीकरणावर जोर द्यावा व तातडीने यावर चर्चा सुरू व्हावी, अशी मागणी केली होती, पण यावर कोणतेही आणि कसलेही भाष्य कोणीही करत नाही. पुढील महापुराच्या उंबरठ्यावर असतानाच पुन्हा चर्चा सुरू होईल. ‘रात गयी बात गयी’ याचा अनुभव नवीन नाही.

जिल्हा बँकेमार्फत व्यापाऱ्यांना ५ ते ६ टक्क्यांनी कर्जवाटप करणार असे शासनाने जाहीर केले होते, पण कधी व किती कर्ज मिळणार, कुणाला मिळणार, याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट नाही. नक्कीच या ठिकाणची बाजारपेठ विस्तारित, विकसित व उर्जितावस्थेला येण्यासाठी नक्की कोण आणि काय ठोस प्रयत्न करणार, कोणती उपाययोजना करणार आहात, याबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शहा यांनी केली आहे.