शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

व्यापाऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अचानक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:26 IST

सांगली : महापुरातील नुकसानीबद्दल शासनाने जाहीर केलेली मदत अद्याप मिळालेली नाही. त्यातच अचानक व्यापाऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे बंद केले आहेत. ...

सांगली : महापुरातील नुकसानीबद्दल शासनाने जाहीर केलेली मदत अद्याप मिळालेली नाही. त्यातच अचानक व्यापाऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे बंद केले आहेत. चौकशी केल्यानंतर शासकीय उत्तरे दिली जात आहेत, अशी माहिती व्यापारी एकता असोसिएशनचे प्रमुख समीर शहा यांनी दिली.

त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, लॉकडाऊन असतानाच महापूर आला. पूर ओसरून महिना झाला, पण अद्याप तातडीची मदत मिळालेली नाही. अद्याप बऱ्याच व्यापारी बांधवांचे पंचनामे झालेले नसताना अचानक प्रशासनाने पंचनामे बंद केले आहेत. त्याबाबत चौकशी केल्यानंतर मिरजेच्या तहसीलदारांशी संपर्क साधा किंवा पत्र पाठवा, असे उत्तर मिळत आहे. प्रशासनाला व शासनाला नक्की व्यापाऱ्यांना मदत करायची आहे की त्रास द्यायचा आहे, हे प्रशासनाने स्पष्ट करावे.

प्रलंबित असलेले पंचनामे होऊन नक्की मदत कधी मिळणार आहे का, गरज असताना मदत मिळाली, तर ती तोकडी का असेना कामाला येत असते, पण काहीच दिलासादायक चित्र नाही. महापालिका, जिल्हा प्रशासन, राज्य शासन यांच्याकडून व्यापाऱ्यांना कवडीची मदत मिळालेली नाही.

सांगलीची बाजारपेठ स्थलांतर, पुनर्वसन अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. आम्ही विस्तारीकरणावर जोर द्यावा व तातडीने यावर चर्चा सुरू व्हावी, अशी मागणी केली होती, पण यावर कोणतेही आणि कसलेही भाष्य कोणीही करत नाही. पुढील महापुराच्या उंबरठ्यावर असतानाच पुन्हा चर्चा सुरू होईल. ‘रात गयी बात गयी’ याचा अनुभव नवीन नाही.

जिल्हा बँकेमार्फत व्यापाऱ्यांना ५ ते ६ टक्क्यांनी कर्जवाटप करणार असे शासनाने जाहीर केले होते, पण कधी व किती कर्ज मिळणार, कुणाला मिळणार, याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट नाही. नक्कीच या ठिकाणची बाजारपेठ विस्तारित, विकसित व उर्जितावस्थेला येण्यासाठी नक्की कोण आणि काय ठोस प्रयत्न करणार, कोणती उपाययोजना करणार आहात, याबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शहा यांनी केली आहे.