शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

तासगावात भुयारी गटारीचा काँग्रेसकडून पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:28 IST

तासगाव : येथील पागा गल्लीत नगरपालिकेच्या वतीने भुयारी गटार योजना अंतर्गत करण्यात आलेल्या चेंबरचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे काँग्रेसने ...

तासगाव : येथील पागा गल्लीत नगरपालिकेच्या वतीने भुयारी गटार योजना अंतर्गत करण्यात आलेल्या चेंबरचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे काँग्रेसने उघड केले. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित ठिकाणांची पाहणी केल्यानंतर हे चेंबर पूर्णपणे चिरल्याचे दिसून आले. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याचा पंचनामा करीत जेसीबीच्या साहाय्याने चेंबर तोडून टाकले.

अपवाद वगळता नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा विरोध सत्ताधारी गटाला होताना दिसत नाही. शहरातील सुरू असलेल्या कामांच्या दर्जाबाबत ठेकेदार कोणतीही काळजी घेताना दिसत नाहीत. हितसंबंध अडकलेले सत्ताधारी नगरसेवक ठेकेदाराला पाठीशी घालतात. तेरी भी चूप मेरी भी चूप, अशी सर्व अवस्था आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने तासगाव शहरासाठी भुयारी गटार योजना मंजूर करण्यात आली आहे. दाेन टप्प्यांमध्ये या याेजनेसाठी जवळपास शंभर कोटींचा निधी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात या कामासाठी शासनाने पैसा उपलब्ध करून देऊनही तत्कालीन पदाधिकारी, कारभारी यांच्यामुळे योजनेचे काम रखडले होते. जाफर मुजावर पक्षप्रतोद झाल्यापासून भुयारी गटारीच्या कामाने चांगली गती घेतली.

निम्म्या शहराचे ड्रेनेजचे पाणी गोळा होऊन पागा गल्लीतून ओढ्याकडे जाते. त्या ठिकाणी चेंबरचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांच्याकडे केली. पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. चेंबर व पाइपलाइनचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्याकडे तक्रार केली. पाटील यांनी नगरपालिका कर्मचारी प्रताप घाडगे व संबंधित कामाचे निरीक्षक सूरज जाधव, प्रमोद नलगे यांना त्याठिकाणी पाठवले. संबंधित चेंबरचा पंचनामा करण्यात आला. यावेळी चेंबर आतून चिरले असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर सिमेंटचे प्रमाण व अन्य बाबीही नियमाप्रमाणे नसल्याचे लक्षात आले. यावेळी हे चेंबर पाडण्याची आक्रमक भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर स्थानिक नागरिकांनी घेतली. त्यामुळे हे चेंबर जेसीबीने उद्ध्वस्त करण्यात आले.

भुयारी गटारच्या तासगाव शहरातील सगळ्या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी यावेळी केली. यावेळी शरद शेळके, रवींद्र साळुंखे, डॉ. विवेक गुरव, राहुल कांबळे, राम जमादार, रितेश रणखांबे, सागर गायकवाड उपस्थित होते.

कोट्स :

तासगाव नगरपालिका ठेकेदारांचा अड्डा बनली आहे. ठेकेदारांच्या सोयीसाठी कामे सुरू आहेत. बहुतांश नगरसेवक ठेकेदार आहेत किंवा अन्य ठेकेदाराकडून कामे करून नगरसेवकांना पैसे दिले जात आहेत. त्यामुळे कामाचा दर्जा राहिलेला नाही. भुयारी गटार योजनेचा आम्ही केलेला पंचनामा एक हिमनगाचे टोक आहे. सगळेच काम बोगस सुरू आहे. या कामाची राज्य सरकारकडून विशेष चौकशी लावावी, अशी मागणी आम्ही शासनाकडे करीत आहोत.

- महादेव पाटील

अध्यक्ष, तासगाव तालुका काँग्रेस