शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ५२५५६ मुलांच्या पोषण आहारातून कडधान्य, डाळी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST

कोरोनामुळे मार्च २०२० आणि जानेवारी २०२१ पर्यंत जिल्हा परिषद, माध्यमिक शाळा बंदच होत्या. पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सध्या सुरू ...

कोरोनामुळे मार्च २०२० आणि जानेवारी २०२१ पर्यंत जिल्हा परिषद, माध्यमिक शाळा बंदच होत्या. पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सध्या सुरू झाल्या आहेत. यामुळे पोषण आहार घरपोच पालकांना दिला जात आहे. शाळा सुरू झाल्या असल्या तरी पोषण आहार शाळेत दिला जाणार नाही, असेही शिक्षण विभागाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरी भागातील मुलांना पोषण आहारात कडधान्य, डाळी मिळत नाहीत. केवळ तांदूळच दिला जात असल्यामुळे मुलांच्या पालकांमधून नाराजीचा सुर आहे. ग्रामीण भागात कडधान्य, डाळी दिल्या जात असतील तर शहरी मुलांनाच का नाही, अशाही पालकांच्या तक्रारी आहेत.

चौकट

असा मिळतोय आहार

पहिली ते पाचवीच्या मुलांना पाच किलो तांदूळ, मसूर डाळ एक किलो ४०० ग्रॅम, मटकी एक किलो, तर सहावी ते आठवीच्या मुलांना तांदूळ सात किलो ५०० ग्रॅम, मसूर डाळ दोन किलो आणि मटकी एक किलो ५०० ग्रॅम मिळत आहे.

चौकट

जिल्ह्यातील पोषण आहार लाभार्थी : ३३२५००

ग्रामीण लाभार्थी : २७९९४४

शहरी लाभार्थी : ५२५५६

चौकट

कोरोनामुळे घरपोच आहार

कोरोनाच्या संकटामुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना घरपोच शालेय पोषण आहार दिला जात आहे. ग्रामीण दोन लाख ७९ हजार ९४४ मुलांना घरपोच तांदूळ, डाळी, कडधान्य घरपोच मिळत आहे. उर्वरित शहरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृहांतर्गत समाविष्ट असणाऱ्या शाळांमधील मुलांना केवळ तांदूळच दिला होता. कडधान्य आणि डाळी मिळत नसल्यामुळे शहरी भागातील पालकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

कोट

शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील मुलांना तांदूळ, डाळी आणि कडधान्यासह शालेय पोषण आहाराचा पुरवठा होत आहे. यामध्ये कुठेही पालकांच्या तक्रारी नाहीत. शहरी भागामध्ये केंद्रीय स्वयंपाकगृहांतर्गत समाविष्ट असणाऱ्या शाळांना केवळ तांदूळच दिला जात आहे.

- एम. सखर मुल्ला, लेखाधिकारी, शालेय पोषण आहार, जिल्हा परिषद, सांगली.