शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

लोकसेवा आयोगाने उमेदीची वर्षे वाचविली, मर्यादित सहा-नऊ संधीच्या निर्णयाचे स्वागत?????????????????????

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:27 IST

सांगली : लोकसेवा आयोगाच्या परीक्षा वारंवार देणे आता शक्य होणार नाही. खुल्या प्रवर्गासाठी सहावेळा तर आरक्षित प्रवर्गातील तरुणांना नऊवेळाच ...

सांगली : लोकसेवा आयोगाच्या परीक्षा वारंवार देणे आता शक्य होणार नाही. खुल्या प्रवर्गासाठी सहावेळा तर आरक्षित प्रवर्गातील तरुणांना नऊवेळाच देता येईल. या निर्णयाचे परीक्षार्थींनी स्वागत केले आहे. तो यापूर्वीच व्हायला हवा होता अशा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या.

परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी सांगितले की, अनेक तरुण उत्तीर्ण होईपर्यंत दरवेळी परीक्षा देतात. तोपर्यंत वयाची चाळीशी उलटते. त्यानंतरही यश मिळाले नाही तर, पुढे अन्य कोणती नोकरी करण्याची मानसिकता राहत नाही. त्यामुळे ते नैराश्याच्या गर्तेत जातात. नव्या निर्णयामुळे आता विचारपूर्वक परीक्षा देतील.

आयोगाने निर्णय उशिरा घेतल्याचेही तरुणांचे म्हणणे आहे. सध्या भरमसाठ परीक्षार्थींमुळे नाहक स्पर्धा निर्माण होते. पूर्वपरीक्षेला गर्दी करणारे अंतिम परीक्षेला बसतही नाहीत, त्याचा फटका प्रामाणिक अभ्यास करणाऱ्यांना बसतो. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनाही आता पूर्वपरीक्षा देताना विचार करावा लागेल असे परीक्षार्थींनी सांगितले.

अशाप्रकारे होईल संधीची गणना

एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.

उमेदीची वर्षे वाया जाणार नाहीत

नव्या निर्णयामुळे तरुणांच्या आयुष्यातील उमेदीची वर्षे वाचणार आहेत. एरवी अनेक तरुण वर्षानुवर्षे लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत राहतात. यश मिळेपर्यंत चाळीशी उलटते. त्यानंतरही अपयशी ठरल्यावर ते निराशेच्या गर्तेत जातात. नव्या निर्णयामुळे तसे होणार नाही.

सागर येलूरकर, बुधगाव

अनावश्यक स्पर्धा कमी होईल

जिल्ह्यात नव्या निर्णयामुळे परीक्षेतील स्पर्धा कमी होईल. यापूर्वी पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थीही परीक्षा द्यायचे. एकावेळी पाच-सहा लाख विद्यार्थी परीक्षा द्यायचे. त्यामुळे स्पर्धा अनावश्यक वाढायची. आता संधी कमी झाल्याने पदवी पूर्ण झालेलेच विद्यार्थी परीक्षे देतील. निर्णय चांगला आहे. - शैलेश नरुटे, ब्रम्हनाळ

कला, वाणिज्यच्या विद्यार्थ्यांना फायदा

अभियांत्रिकीचे विद्यार्थी पूर्वपरीक्षेत यशस्वी व्हायचे, पण अंतिमला अभ्यासाअभावी बसायचे नाहीत. आता मऱ्यादीत संधीमुळे ते परीक्षेला बसण्यापूर्वी विचार करतील. याचा फायदा कला, वाणिज्यच्या विद्यार्थ्यांना होईल. स्पर्धा कमी होऊन विद्यार्थी ताणविरहीत परीक्षा देऊ शकतील.

- स्वप्नील अवताडे, अकलूज

अशाप्रकारे होईल संधीची गणना

एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.

-----------