शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क परत मिळण्यासाठी जनहित याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST

राज्यात दरवर्षी लाखो विद्यार्थी दहावी-बारावी परीक्षा देत असल्याने बोर्डास कोट्यवधी रुपये जमा होतात. बोर्ड परीक्षेसाठी शाळांकडून सुमारे ५०० रुपये ...

राज्यात दरवर्षी लाखो विद्यार्थी दहावी-बारावी परीक्षा देत असल्याने बोर्डास कोट्यवधी रुपये जमा होतात. बोर्ड परीक्षेसाठी शाळांकडून सुमारे ५०० रुपये शुल्क घेतले जाते. त्यातील चारशे पंधरा रुपये बोर्डाकडे परीक्षा शुल्क म्हणून जमा होतात. उरलेली रक्कम विद्यार्थ्यांचा फोटो काढणे, ओळखपत्र तयार करणे, संगणकावर ऑनलाइन फॉर्म भरणे किंवा शाळेचे संलग्नता शुल्क यासाठी आकारण्यात येते. तांत्रिक शाखेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांकडून शंभर रुपये परीक्षा शुल्क घेतली जाते. बारावीच्या विद्यार्थ्यांकडून पाचशे वीस रुपये बोर्ड परीक्षा शुल्क घेतली जाते. आयटी परीक्षेसाठी दोनशे रुपये जादा घेतले जातात.

विद्यार्थी हा ग्राहक असून त्याला परीक्षेची सेवा मिळाली नसेल तर त्याला त्याचे संपूर्ण शुल्क परत मिळाले पाहिजे. मात्र बोर्डाकडे प्रश्नपत्रिका छापून तयार आहेत. परीक्षेसाठी स्टेशनरी विविध केंद्रावर गेली आहे. निकाल लावण्यासाठी होणारा खर्च केला आहे. सुपरव्हिजन व पेपर तपासणीचे काम झाले नसल्याने हा खर्च मात्र वाचला आहे.

ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकाला संबंधित सेवा मिळाली नसल्याने बोर्डाने पूर्ण शुल्क परत देणे आवश्यक आहे. बोर्डाने परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय घेतल्यास प्रत्येक विद्यार्थ्याच्या परीक्षा फॉर्मवर बँक अकाउंट नंबर नोंद असल्याने विद्यार्थ्यांना पैसे परत करणे सोपे आहे. मात्र बोर्डाने परीक्षा शुल्क परत देण्याच्या मागणीची दखल घेतली नसल्याने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे फडके यांनी सांगितले.