शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

दुष्काळी तालुक्यांना प्राधान्याने कर्जपुरवठा करा

By admin | Updated: December 30, 2015 00:38 IST

जयंत पाटील : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने रूपे डेबिट कार्ड योजनेस सुरूवात

सांगली : जिल्ह्याचा निम्मा भाग कायम दुष्काळी आहे. शिराळ्यासारख्या भागात कधी दुष्काळ पडेल, असे कोणाला वाटलेही नव्हते. पण यंदा त्याठिकाणीही दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्जपुरवठा करावा, असे आवाहन माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी येथे केले. जिल्हा बँकेच्या रूपे डेबिट कार्ड योजनेचा प्रारंभ आणि वितरण जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, रुपे डेबिट कार्डच्या माध्यमातून आधुनिक बँकिंगच्या क्षेत्रात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने दमदार पाऊल टाकले आहे. बँकिंग क्षेत्रात ग्राहकांना अपेक्षित गोष्टी असाव्यात. सध्याचे बँकिंग खूपच सुलभ आणि ग्राहकाभिमुख झाले आहे. मोबाईलच्या एका ‘क्लिक’वर सर्व व्यवहार करता येऊ लागले आहेत. त्यामुळे बँकिंग क्षेत्राला ज्या गोष्टी अपेक्षित आहेत, त्या आत्मसात करून जिल्हा बँकेने आणखी चांगल्या योजना राबवाव्यात. त्यासाठी त्यांनी कार्यकारी संचालकांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करावी. या समितीच्या माध्यमातून राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँकांच्या योजनांचा, सेवांचा अभ्यास करून, ज्या योजना जिल्हा बँकेला देता येणे शक्य आहे, त्या द्याव्यात. सांगलीची जिल्हा बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम बँक आहे. सातारा जिल्हा बँकेशी स्पर्धा करून त्या बँकेसारखी प्रगतीची पावले टाकावीत. त्यानंतर आणखी चांगल्या जिल्हा बँकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. सरकारचे धोरण सध्या कोणत्याही क्षेत्राला मदत न करण्याचेच आहे. त्यामुळेच विदर्भातील तीन जिल्हा बँका प्रचंड आर्थिक अडचणीत असतानाही, त्यांना शासनाने कोणतीही मदत केलेली नाही. सुदैवाने पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा बँकांची स्थिती अत्यंत चांगली आहे. आहे त्या परिस्थितीत जिल्हा बँकेने अधिक सक्षम होऊन प्रगती साधावी, असे ते म्हणाले. बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील म्हणाले की, सध्या २0 हजार डेबिट कार्डांचे वाटप होणार आहे. भविष्यात एक लाख कार्डे वाटण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. बँकेचे संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून ग्राहकाभिमुख अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांची संख्या वाढतानाच बँकेच्या नफ्यातही वाढ होत आहे. स्वागत बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. रामदुर्ग यांनी केले, तर बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी आभार मानले. यावेळी माजी आमदार विलासराव शिंदे, मानसिंगराव नाईक, प्रा. शिकंदर जमादार, बी. के. पाटील, विक्रम सावंत आदी संचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रेमाने सांगितले आणि अपहारातील पैसे मिळाले!बँकेच्या कारभाराचा आढावा घेताना दिलीपतात्या पाटील यांनी, मणेराजुरीतील अपहाराच्या घटनेचा उल्लेख केला. माझ्या कालावधित मणेराजुरीची ही एकच घटना घडली. तरीही ज्याने अपहार केला, त्याला माझ्या केबिनमध्ये बोलावले आणि त्याला प्रेमाने पैसे भरण्यास सांगितले. माझी प्रेमाची भाषा त्याला कळाली आणि त्याने ९ लाख २0 हजार रुपयांऐवजी ९ लाख ८५ हजार रुपये भरले. दिलीपतात्यांच्या या वाक्यावर उपस्थितांत हशा पिकला. बँकिंग क्षेत्रात कर्मचाऱ्यांची तत्परता अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे सध्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे. नवी भरती करताना बँकिंग क्षेत्रातील ज्ञान, कार्यतत्परता आणि कार्यक्षमता या कसोटीवर उतरणारेच कर्मचारी घ्यावेत, अशी सूचना पाटील यांनी यावेळी केली.