शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
3
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
4
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
5
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
6
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
7
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
9
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
10
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
11
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
12
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
13
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
14
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
15
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
16
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
17
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
19
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
20
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

कडेगाव तालुक्यात पूर्ण क्षमतेने व अखंडित वीज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : कडेगाव तालुक्यातील खरीप पिके, ऊस, भाजीपाला-फळभाज्या आणि विविध फळबागा सध्या पाणी देण्याच्या अवस्थेत आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील खरीप पिके, ऊस, भाजीपाला-फळभाज्या आणि विविध फळबागा सध्या पाणी देण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र, पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वीजटंचाईने त्रस्त शेतकऱ्यांनी काही ठिकाणी आंदोलनेही केली आहेत. यावर आता तत्काळ उपाययोजना करा आणि आठ तास अखंडित वीजपुरवठा करा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना दिल्या.

‘महावितरण’च्या विटा विभागीय कार्यालयात देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह भेट देऊन कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांच्याशी शेतीपंपांच्या वीजप्रश्नी चर्चा केली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धनंजय देशमुख, संपतराव देशमुख मिल्क युनियनचे संचालक संदेश दंडवते, सुधाकर चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी संग्रामसिंह देशमुख म्हणाले राज्य सरकारने शेतीपंपासाठी सलग आठ तासही वीज मिळत नाही. रात्री-बेरात्री उठावे लागत आहे. तांत्रिक अडचणी असल्याचे कारण सांगत वीजपुरवठा खंडित केला जातो. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. कडेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी रोहित्र कमी क्षमतेचे आहेत. योग्य दाबाने वीज मिळत नाही. विजेच्या लपंडावाने विद्युत पंप जळण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर तत्काळ उपाययोजना होणे गरजेचे आहे, असे सांगितले.

यावेळी वसंतराव शिंदे, संभाजी रासकर, प्रकाश गायकवाड, अरुण हावलदार, बबन माळी, सुधाकर शेटे, हणमंत चव्हाण, मनोज माळी, प्रवीण सूर्यवंशी उपस्थित होते.

चौकट :

शेतीपंपाच्या वीजप्रश्नी पालकमंत्र्यांना भेटणार :

कडेगाव तालुक्यात वीज वितरण कंपनीची यंत्रणा सक्षमपणे उभा करण्याची गरज आहे. तालुक्यात वीज उपकेंद्रांची संख्या वाढवण्याची गरज आहे. वीज वितरण कंपनीने तालुक्याचा सर्वसाधारण आराखडा तयार करावा. प्रसंगी आम्ही स्वतः पालकमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मागणी करणार आहोत, असेही संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले.