शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

ऊस उत्पादन वाढीसाठी ठिबक सिंचन सुविधा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:21 IST

इस्लामपूर : ज्या शेतकऱ्यांचे उसाचे उत्पादन कमी आहे, त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी त्यांना ठिबक सिंचनचे साधन उपलब्ध करून देत आहोत. ...

इस्लामपूर : ज्या शेतकऱ्यांचे उसाचे उत्पादन कमी आहे, त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी त्यांना ठिबक सिंचनचे साधन उपलब्ध करून देत आहोत. यावर्षी ५०० एकर, तर पुढील ५-६ वर्षांत कार्यक्षेत्रातील बहुतेक सर्व क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन युवा नेते प्रतीक पाटील यांनी केले. ही योजना जास्तीत-जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यक्षेत्रातील २५ गावांत प्रबोधन सभा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राजारामबापू साखर कारखान्याच्या राजारामबापू पाटील अद्ययावत गट शेती व ठिबक सिंचन योजनेचा प्रारंभ पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ज्ञ डॉ. भरत रासकर, व्हीएसआयचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शिंदे, आर. बी. भोईटे, राजारामबापू ग्रुप ऑफ कंपनीजचे उपाध्यक्ष सुभाषराव जमदाडे उपस्थित होते.

पी. आर. पाटील म्हणाले, जयंत पाटील यांनी ३०-३२ वर्षांपूर्वी शेतकत्यांच्या शिवारात पाणी आणून आर्थिक क्रांती घडवून आणली. आता प्रतीक पाटील शेतकऱ्यांच्या जमिनीमधील उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही दुसरी क्रांती ठरेल.

सुभाषराव जमदाडे यांनी प्रास्ताविक केले. शेती समितीचे अध्यक्ष श्रेणिक पाटील, इरिगेशन समितीचे अध्यक्ष एल. बी. माळी, संचालक पै. भगवान पाटील, कार्तिक पाटील, प्रदीपकुमार पाटील, बाळासाहेब पवार, जालिंदर कांबळे, सुवर्णा पाटील, मेघा पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, डी. एम. पाटील, गणेश यादव उपस्थित होते. मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी आभार मानले. विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो-०८इस्लामपुर१

फोटो ओळी- राजारामनगर येथे अद्यावत गट शेती व ठिबक सिंचन योजनेच्या प्रारंभप्रसंगी प्रतीक पाटील यांनी मार्गदर्शन केले.