शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

ऊस उत्पादन वाढीसाठी ठिबक सिंचन सुविधा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:21 IST

इस्लामपूर : ज्या शेतकऱ्यांचे उसाचे उत्पादन कमी आहे, त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी त्यांना ठिबक सिंचनचे साधन उपलब्ध करून देत आहोत. ...

इस्लामपूर : ज्या शेतकऱ्यांचे उसाचे उत्पादन कमी आहे, त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी त्यांना ठिबक सिंचनचे साधन उपलब्ध करून देत आहोत. यावर्षी ५०० एकर, तर पुढील ५-६ वर्षांत कार्यक्षेत्रातील बहुतेक सर्व क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन युवा नेते प्रतीक पाटील यांनी केले. ही योजना जास्तीत-जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यक्षेत्रातील २५ गावांत प्रबोधन सभा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राजारामबापू साखर कारखान्याच्या राजारामबापू पाटील अद्ययावत गट शेती व ठिबक सिंचन योजनेचा प्रारंभ पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ज्ञ डॉ. भरत रासकर, व्हीएसआयचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शिंदे, आर. बी. भोईटे, राजारामबापू ग्रुप ऑफ कंपनीजचे उपाध्यक्ष सुभाषराव जमदाडे उपस्थित होते.

पी. आर. पाटील म्हणाले, जयंत पाटील यांनी ३०-३२ वर्षांपूर्वी शेतकत्यांच्या शिवारात पाणी आणून आर्थिक क्रांती घडवून आणली. आता प्रतीक पाटील शेतकऱ्यांच्या जमिनीमधील उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही दुसरी क्रांती ठरेल.

सुभाषराव जमदाडे यांनी प्रास्ताविक केले. शेती समितीचे अध्यक्ष श्रेणिक पाटील, इरिगेशन समितीचे अध्यक्ष एल. बी. माळी, संचालक पै. भगवान पाटील, कार्तिक पाटील, प्रदीपकुमार पाटील, बाळासाहेब पवार, जालिंदर कांबळे, सुवर्णा पाटील, मेघा पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, डी. एम. पाटील, गणेश यादव उपस्थित होते. मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी आभार मानले. विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो-०८इस्लामपुर१

फोटो ओळी- राजारामनगर येथे अद्यावत गट शेती व ठिबक सिंचन योजनेच्या प्रारंभप्रसंगी प्रतीक पाटील यांनी मार्गदर्शन केले.