शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

अवकाळीच्या नुकसानीची भरपाई द्यावी

By admin | Updated: December 15, 2014 00:00 IST

जयंत पाटील : अधिवेशनात याप्रश्नी आवाज उठविणार

इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी तासगाव तालुक्यातील विसापूर गावाला भेट देऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्षबागा, शाळू, हरभरा, मका व ऊस पिकांची पाहणी केली़ शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून द्राक्ष बागायत शेतक-यांना एकरी २ लाख तसेच शाळू, हरभरा, मका व ऊस पीक उत्पादक शेतकऱ्यांनाही भरीव नुकसानभरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली़ आम्ही हा विषय अधिवेशनात प्रभावीपणे मांडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़ यावेळी शेतकऱ्यांनी गावाची आणेवारी चुकीची झाल्याचे आ़ पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून फेरआणेवारी तातडीने करावी, अशी सूचना केली.आ़ पाटील यांनी रविवारी दुपारी विसापूर येथील बापूसाहेब माने, शिवाजी माळी, अनिल माने यांच्या द्राक्षबागा, बाळासाहेब माने, भीमराव मंडले यांचे शाळू पीक, तर संपतराव माने यांच्या ऊस पिकाची पाहणी केली़ यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीच्या सभागृहात शेतकरी व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली़ प्रारंभी माजी सभापती सुनील पाटील म्हणाले, १२ डिसेंबरला आमच्या गावात वादळी वारा, गारासह अवकळी ८६ मिलिमीटर पाऊस झाला़ या पावसामध्ये आमच्या अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांसह शाळू, हरभरा, मका व ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे़ शासनाने आमच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून आम्हास नुकसानभरपाई द्यावी. एका शेतकऱ्याने माझी बाग निर्यातीसाठी २0 लाख रुपयांना दिली आहे़ ती १४ तारखेस तोडली जाणार होती; मात्र १२ तारखेलाच पाऊस होऊन बागेचे नुकसान झाल्याचे सांगितले़ कृषी अधिकारी शिंदे म्हणाले, आता उभ्या असलेल्या द्राक्ष बागातील द्राक्षे चिरली असून, दावण्या अळीने ८ ते १0 दिवसात द्राक्षांचे घड गळून पडू शकतात़आ़ पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे़ आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये या नुकसानीची तीव्रता शासनाच्या निदर्शनास आणून देऊ़ शासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देऊ़ याप्रसंगी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष शंकरदादा पाटील, माजी सभापती पतंगबापू माने, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, माजी सभापती शैलेंद्र सूर्यवंशी, सरपंच सौ़ मंगल शिवणकर, उपसरपंच चव्हाण, तलाठी तसेच शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)