शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

१०५ जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव

By admin | Updated: March 1, 2017 23:38 IST

नांगरे-पाटील; फरार आरोपींची मालमत्ता जप्त करणार

सातारा : ‘जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. १०५ जणांच्या तडीपारीचे प्रस्तावही आले आहेत. मात्र, पोलिसांच्या यादीवरील अनेक आरोपी अद्याप फरार आहेत. सुरुवातीला सार्वजनिक ठिकाणी या आरोपींचे पोस्टर्स लावले जातील, त्यानंतरही ते जर सापडले नाहीत, तर त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल,’ असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.जिल्हा पोलिस दलातील वार्षिक तपासणी आणि आढावा घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून नांगरे-पाटील साताऱ्यात तळ ठोकून आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवतेज हॉलमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव धरणे, पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट उपस्थित होते.नांगरे-पाटील म्हणाले, ‘कऱ्हाड, पाटण, उंब्रज, शिरवळ, महाबळेश्वर, वाई आणि पोलिस मुख्यालय या ठिकाणी पोलिसांशी सुसंवाद साधता आला. पोलिसांच्या अडीअडचणी, गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यासह अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली. सातारा पोलिसांचा फिटनेस चांगला असल्याचे निदर्शनास आले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सन्मवय चांगला आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही अत्यंत चांगले आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.नांगरे-पाटील म्हणाले, ‘हेडक्वॉर्टरला पोलिसांची वाहने अडकून पडत होती. ती बाहेर काढल्यामुळे (पेट्रोलिंगमध्ये वाढ) महामार्गावरील दरोड्याच्या केसेस घटल्या आहेत. २०१५ मध्ये ५ हजार १९५ घटना घडल्या होत्या. त्या २०१७ मध्ये ५ हजार १२ घडल्या. म्हणजे १८५ ने क्राईम रेट घटला आहे.’ पोलिसांच्या वसाहती आणि मुलांसाठी लवकरच सुसज्ज शाळा सुरू करण्याचा मनोदयही यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)वाहतुकीसाठी पंधरा दिवसांची मुदत !सातारा शहरातील वाहतुकीबाबत मी फार समाधानी नाही, अशी कबुली देत आयजी नांगरे-पाटील यांनी वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक घाडगे यांना येत्या पंधरा दिवसांत वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी मुदत दिली असल्याचे सांगितले.मटकेवाल्यांची ‘मैफल’सातारा जिल्ह्यात आतापर्यंत नऊजणांना तडीपार करण्यात आले असून, १०५ जणांचे तडीपारीचे प्रस्ताव आले आहेत. यात अवैध धंदे करणाऱ्यांचा समावेश आहे. मटकेवाल्यांनाही आता तडीपार केले जाणार आहे. सुरुवातीला त्यांना इशारावजा समजावून सांगण्यासाठी शुक्रवारी मटकेवाल्यांची मैफल (बैठक) बोलविल्याचाही त्यांनी टोमणा मारला.निर्भया पथकाला ७० लाखांचा निधीनिर्भया पथकाने उत्कृष्ट काम केले असून, साताऱ्यात पावणेपाच हजार कारवाया झाल्या आहेत. तसेच या पथकाने २५० हून अधिक जनजागृतीचे कार्यक्रम घेतलेले आहेत. हे चांगले काम पाहता शासनाने ७० लाखांचा निधी मंजूर केला असल्याचेही आयजी नांगरे-पाटील यांनी यावेळी सांगितले.