शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प आले पैसे घेऊन गेले!

By admin | Updated: December 10, 2014 23:56 IST

महापालिकेतील प्रकार : सल्ला फीपोटी कोट्यवधी रुपये वाया

अविनाश कोळी - सांगली -पांढऱ्या शुभ्र पडद्यावर प्रोजेक्टरच्या माध्यमातून उतरणारे प्रकल्पांचे रंग महापालिकेला नेहमीच भुलविणारे ठरले. सांगलीत चांगल्या प्रकल्पाचे स्वप्न प्रत्येकालाच पडते. पण जेव्हा जाग येते, तेव्हा कमिशनपोटी गेलेल्या रकमेचे वास्तव शिल्लक राहते आणि प्रकल्पाचा स्वप्नभंग होतो. आजवर मोडलेल्या या स्वप्नांची किंमत जवळपास साडेपाच कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. तत्कालीन आयुक्त अश्विनीकुमार यांच्या कालावधित २00१ मध्ये पहिली कंपनी महापालिकेत अवतरली. आयएल अ‍ॅण्ड एफएस (इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अ‍ॅण्ड फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड) या कंपनीला पाणीपुरवठ्याच्या खासगीकरणासाठी आणण्यात आले होते. कोट्यवधी रुपयांच्या या प्रकल्पात सुरुवातीला प्रकल्प अहवालापासून सर्वेक्षण व अन्य बाबींसाठी लाखो रुपये खर्ची पडले. २५ वर्षांकरिता हा प्रकल्प तीन टप्प्यात होणार होता. या योजनेतील पहिला टप्पा सर्वेक्षण आणि माहिती संकलनाचा होता. तो पूर्ण झाल्यानंतर महापालिकेने संबंधित कंपनीला सल्ला फी दिली होती. त्यानंतर प्रत्येक टप्प्यावर अशा सल्लागार कंपन्यांचे सत्र महापालिकेत सुरू झाले. कचऱ्यापासून वीजनिर्मिती व खत प्रकल्पासाठीही गतवेळी सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला होता. त्यासाठीही लाखो रुपये खर्ची पडले. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी महापालिकेने स्थानिक दोन संस्थांसह पुण्यातील एका कंपनीला सल्लागार म्हणून नियुक्त केले. वास्तविक स्थानिक सल्लागार संस्थांनी अहवाल तयार करण्याचे काम रितसर सुरू केले असताना, केवळ राजकीय लागेबांधे असल्यामुळे आणखी एक सल्लागार संस्था नेमण्यात आली. या एका प्रकल्पासाठी महापालिकेने सल्ला फी म्हणून जवळपास दीड कोटी रुपये खर्च केले. नियोजन चांगल्या पद्धतीने केले असते, तर हा खर्च निम्म्यावर आला असता. तरीही महापालिकेने उत्साहाच्या भरात एकाच कामासाठी अनेक संस्थांना सल्लागार म्हणून नेमले. त्यानंतर पुन्हा महापालिकेने घनकचऱ्याच्या प्रकल्पासाठी ‘रॅमके’ या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली. हा प्रकल्प ऐनवेळी रद्द झाला. तोपर्यंत कंपनीला फीपोटी जवळपास १0 लाख रुपये खर्च झाले. २00१ ते २0१४ या कालावधित जवळपास ७ सल्लागार कंपन्यांवर महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले. ७0 कोटी रुपयांच्या इको सिटीसाठीही महापालिकेने सल्लागार कंपनी नियुक्त केली. सर्वेक्षण, माहिती संकलन आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पुन्हा पैसे देण्यात आले. एकही प्रकल्प नाहीसल्लागार कंपन्यांनी सल्ला फी घेतली, मात्र नंतर प्रकल्पांचे घोडे कायमचे अडले. काही प्रकल्प पूर्णपणे गुंडाळण्यात आले. काही तसेच कागदावर राहिले. झोपडपट्टी पुनर्वसनासारख्या प्रकल्पांची विघ्नमालिका अजूनही सुरूच आहे. सल्लागार कंपन्या बदलत राहिल्या, पण प्रकल्प एकही झाला नाही. त्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सल्लागार कंपन्या न नेमण्याचा ठराव करण्यात आला. याच ठरावाचा धागा पकडून व पूर्वानुभव कथन करून सदस्यांनी कचऱ्यापासून इंधनाच्या प्रकल्पाविषयी शंका उपस्थित केल्या आहेत.