शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

प्रगतीच्या पंखांना बळ मिळालेच नाही!

By admin | Updated: May 1, 2015 00:15 IST

सांगली शहराच्या प्रगतीला पंख देणाऱ्या पायाभूत सुविधांबाबतच

सांगली जिल्ह्यात आजवर राजकीय, प्रशासकीय स्तरावर उदासीनता दिसून आली. त्यामुळेच सांगलीच्या स्थापनेनंतर मागील ५५ वर्षांत पायाभूत सुविधांबाबत अजूनही मागासलेपण दूर झाले नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीचा वेग कासवगतीने सुरू आहे. कोणत्याही शहराची, जिल्ह्याची प्रगती ही पायाभूत सुविधांवर अवलंबून असते. महामार्ग, रेल व्यवस्था, हवाई वाहतूक, जलवाहतूक अशा गोष्टींवर अवलंबून असते. पायाभूत सुविधा असतील, तर औद्योगिकीकरण झपाट्याने वाढते, औद्योगिकीकरण वाढले की रोजगार उपलब्ध होतो आणि रोजगार उपलब्ध झाला की त्या शहराची आपोआपच आर्थिक प्रगती होते. हे सूत्र सांगलीला अजून तरी लाभलेले नाही. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे ९२ हजार ८५१ किलोमीटर इतके आहे. एकूण महामार्गांच्या किलोमीटरशी तुलना करता जिल्ह्यात असणारे राष्ट्रीय महामार्गाचे २९.५७ किलोमीटरचे जाळे हे अत्यंत कमी म्हणजे केवळ ०.०३ टक्के इतके आहे. यावरूनच सांगली जिल्ह्याच्या प्रगतीत राष्ट्रीय महामार्गाची किती मोठी उणीव आहे, याची कल्पना कोणालाही येऊ शकते. राष्ट्रीय महामार्ग हा सर्वांगीण विकासाचा महामार्ग मानला जातो. तरीही याबाबतची उदासीनता दिसून येते. राष्ट्रीय महामार्गांमुळे सांगली जिल्ह्यालगत असणाऱ्या कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना प्रगतीचे पंख लाभले. महामार्गाची उपलब्धता असल्याने याठिकाणी औद्योगिकरण, व्यापारीकरण, रोजगार अशा गोष्टींना चालना मिळाली. दुसरीकडे याच कमतरतेमुळे सांगली जिल्ह्यातील उद्योग, व्यापार व रोजगार यांची घुसमट सुरू झाली आहे. व्यापार, उद्योग वाढीला पोषक वातावरण असूनही केवळ दळणवळणाच्या साधनांअभावी जिल्ह्याच्या प्रगतीला खीळ बसली आहे. राज्य महामार्गांची अवस्थाही फारशी चांगली नाही. राज्य महामार्गही अरुंद असल्यामुळे त्याच्या रुंदीकरणासाठी इतक्या वर्षातून आता प्रयत्न सुरू झाले आहेत. तरीही बऱ्याच राज्य मार्गांच्या रुंदीकरणाचे प्रस्तावसुद्धा शासनदरबारी चर्चेला येत नाहीत. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांचा विकास, रुंदीकरण आणि विमानतळ उभारणी या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. त्यासाठी राजकीय पातळीवर काही प्रयत्न झालेसुद्धा, परंतु आणखी ताकद लावण्याची गरज आहे. भूसंपादनाचा प्रश्न आल्यानंतर बऱ्याचदा स्थानिक लोकांकडून विरोध होतो. अशावेळी मतदारांची नाराजी स्वीकारण्याची तयारी नसल्याने राजकीय नेते अशा ठिकाणी खचतात. नुकसानभरपाई तातडीने देऊन अशा गोष्टींना विरोध करणारे आणि शासन यामध्ये सुवर्णमध्य काढून विकासाच्या योजना मार्गी लावण्याची आवश्यकता आहे. - अविनाश कोळी