शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

प्राध्यापकांनो, पगाराला साजेसे काम करा!

By admin | Updated: October 28, 2015 00:02 IST

अरुण निगवेकर : पतंगराव कदम महाविद्यालयाचा तिसावा वर्धापनदिन उत्साहात

सांगली : केवळ दोन ते तीन तास महाविद्यालयात येऊन अभ्यासक्रम पूर्ण करायचा, या मानसिकतेतून प्राध्यापकांनी बाहेर येण्याची गरज आहे. शासनाकडून पगारही चांगला दिला जात असून प्राध्यापकांनी त्याला साजेसे काम करावे, असा सल्ला विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांनी मंगळवारी दिला. पाणी, संरक्षणाएवढेच महत्त्व शैक्षणिक धोरणालाही दिले पाहिजे. मात्र केंद्र आणि राज्य शासन शैक्षणिक धोरणाबाबत फारसे गंभीर दिसत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.सांगलीवाडी येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या तिसाव्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निगवेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठाचे कुलपती व माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम होते. निगवेकर म्हणाले की, तरुणांच्या ज्ञानाची भूक भागविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी प्राध्यापकांची आहे. पुस्तके वाचून त्याचे सादरीकरण करणे म्हणजे शिकवणे नव्हे, हे प्राध्यापकांनी लक्षात घेतले पाहिजे. सध्या शिक्षणाचे व्यावसायीकरण झाल्याचे सांगितले जाते, पण या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले पाहिजे की नाही? कला, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षणही दिले पाहिजे. यासाठीच प्राध्यापकांना शासनाने चांगला पगार दिला आहे. जेवढा पगार मिळतो, तेवढे परिपूर्ण ज्ञान विद्यार्थ्यांना द्यायला नको का? महाविद्यालय आणि प्राध्यापक तसे शिक्षण देत नसतील, तर त्यांना जाब विचारण्याचे धाडस विद्यार्थ्यांनी दाखविले पाहिजे. पतंगराव कदम म्हणाले की, भारती विद्यापीठ केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही. आम्ही चार संशोधन विभाग सुरू केले आहेत. तेथे प्राध्यापक व विद्यार्थ्यांना संशोधन करण्याची मोठी संधी आहे. भविष्यातही मोठी झेप घ्यायची आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले की, शांतिनिकेतन येथील महाविद्यालयाच्या आंदोलनामुळे शिवाजी विद्यापीठास वेगळी दिशा दिली आहे. तेच महाविद्यालय सध्या पतंगराव कदम यांच्या नावाने सुरू आहे. चांगली प्रगती केली आहे. परंतु, या महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना नोकरीच्यादृष्टीने शिक्षण दिले पाहिजे. भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले की, केंद्र शासन जानेवारी २०१६ मध्ये नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करणार आहे. प्रत्येक महाविद्यालयाबरोबरच आता प्राध्यापकांचे वार्षिक मूल्यांकन केले जाणार आहे. यामध्ये टिकण्यासाठी प्राध्यापकांनी खूप बदल करण्याची गरज आहे. यावेळी एच. एम. कदम, प्रा. डॉ. वसंतराव जुगळे, प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, प्रा. वैजनाथ महाजन, प्रा. डॉ. संजय ठिगळे, प्रा. डॉ. संतोष माने उपस्थित होते. प्रा. डॉ. श्रीकृष्ण मोहिते, प्रा. डॉ. बी. डी. पाटील, डॉ. प्रा. एम. एच. पाटील. वासंती बंडगर, डॉ. प्रा. जया कुरेकर, प्रा. प्रभा पाटील यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. बी. डी. पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)शिवाजीराव भरताप्रमाणे! मी भारती विद्यापीठाची स्थापना केली. त्यानंतरचा सर्व कारभार प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांच्याकडे सोपविला व मी राजकारणात सक्रिय झालो. संस्थेकडे पाहण्यास मला फारसा वेळ मिळाला नाही. ज्याप्रमाणे राम वनवासाला गेल्यानंतर भरताने त्याच्या पादुका प्रामाणिकपणे सांभाळल्या, त्या भरताप्रमाणेच शिवाजीरावांनी भारती विद्यापीठाचा कारभार प्रामाणिकपणे सांभाळला. त्यामुळेच आज आंतरराष्ट्रीय पातळीवर भारती विद्यापीठाच्या संस्था पोहोचल्या आहेत, असे भावनिक उद्गार पतंगराव कदम यांनी काढले.