शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
4
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
5
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
6
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
7
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
8
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
9
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
10
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
12
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
13
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
14
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
15
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
16
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
17
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
18
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
19
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
20
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
Daily Top 2Weekly Top 5

दीड एकरात ढबू मिरचीचे १२ लाखांचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:04 IST

संजय माने ।लोकमत न्यूज नेटवर्कटाकळी : पिकाचे योग्य नियोजन व वेळेत औषध फवारणी करून अस्मानी संकटातही चांगले उत्पन्न मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे टाकळी (ता. मिरज) येथील शेतकरी सुधीर जनगोंडा पाटील. केवळ दीड एकरामध्ये पाटील यांनी ढबू मिरची चे १२ लाखांचे उत्पादन घेतले आहे.मिरज पूर्वभाग ढबू उत्पादनात अग्रेसर म्हणून ...

संजय माने ।लोकमत न्यूज नेटवर्कटाकळी : पिकाचे योग्य नियोजन व वेळेत औषध फवारणी करून अस्मानी संकटातही चांगले उत्पन्न मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे टाकळी (ता. मिरज) येथील शेतकरी सुधीर जनगोंडा पाटील. केवळ दीड एकरामध्ये पाटील यांनी ढबू मिरचीचे १२ लाखांचे उत्पादन घेतले आहे.मिरज पूर्वभाग ढबू उत्पादनात अग्रेसर म्हणून ओळखला जातो. येथून गतवर्षी दररोज दोनशे ते अडीचशे टन ढबूची मुंबई व दिल्ली येथे निर्यात होत होती. आवक वाढल्याने दहा ते पाच रुपयापर्यंत दर घसरले. ही घसरण पाहता यावर्षी अनेक शेतकºयांनी ढबू उत्पादनाकडे पाठ फिरवली. काही शेतकºयांनी ढबूची लागण केली, मात्र मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे रोगराई व मुळकुजव्यामुळे ढबू काढून टाकावा लागला. अशा अनेक संकटांवर मात करीत टाकळी येथील शेतकरी सुधीर पाटील यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे. मल्लेवाडी येथे दीड एकरामध्ये जूनमध्ये ढबूच्या रोपांची लागण केली. त्यांनी पहिल्यांदा नांगरट व रोटर मारून बेड तयार करून घेतला. रसायन व शेणखत घातले. त्याच्यावर परत मातीचा बेड तयार करून मल्चिंग पेपर टाकून जून महिन्यात सव्वा फुटावर एक छिद्र मारून ढबूचे रोप लावले. पाण्याच्या नियोजनासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. दीड एकरामध्ये १४ हजार रोपांची लागवड केली. रोपांची लागवड केल्यापासून ४८ दिवसांत पहिली तोड आली. साडेचार महिन्यांमध्ये त्यांनी ५२ टन ढबूचे उत्पादन घेऊन १२ लाखांचे उत्पन्न घेतले आहे. अजून दोन महिन्यांपर्यंत ढबूची तोड चालू राहणार आहे. त्यामुळे उत्पादनात आणखी वाढ होणार आहे. आवक कमी झाल्याने किलोस २५ रुपये दर मिळत आहे. मुंबई, दिल्लीसह अन्य भागात पाटील यांच्या ढबूची विक्री होत आहे.देशांतर्गत निर्यात घटलीपूर्वभागात द्राक्षबागा तोट्यात असल्याने बरेच शेतकरी ढबू उत्पादनाकडे वळले होते; मात्र गतवर्षी दर घसरल्याने यावर्षी मोजक्याच शेतकºयांनी ढबू उत्पादन घेतले आहे. पावसामुळे शेकडो एकर ढबूचे फड काढून टाकावे लागले. पूर्वभागात दरवर्षी सुमारे पाचशे एकरामधून दररोज दोनशे ते अडीचशे टन ढबूची निर्यात देशभरात होत होती. मात्र आता आठवड्यास केवळ २० ते २५ टन ढबूची निर्यात होत आहे.

टॅग्स :agricultureशेती