शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

खुंदलापूर वसाहतीमधील समस्यांचा जागीच निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:41 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील खुंदलापूर-बोरगाव या धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त वसाहतीमध्ये महसूल, पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाऊन, धरणग्रस्त बांधवांचे प्रलंबित प्रश्न ...

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील खुंदलापूर-बोरगाव या धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त वसाहतीमध्ये महसूल, पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाऊन, धरणग्रस्त बांधवांचे प्रलंबित प्रश्न समजून घेतले. त्यातील अनेक प्रश्नांचा जागेवरच निपटारा केल्याने धरणग्रस्तांनी समाधान व्यक्त केले.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे विशेष अभियान राबविले जात आहे. या कामासाठी महिन्याचा कालावधी निश्चित केलेला आहे. उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अरविंद लाटकर, प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, शिराळा व वाळवा विभागाचे वनक्षेत्रपाल एस. आर. काळे, सहायक अभियंता डी. डी. परळे, तालुका पुनर्वसन अधिकारी तेजस्विनी पाटील, नायब तहसीलदार श्रीमती सोनवणे, मंडल अधिकारी कैलास कोळेकर, तलाठी प्रकाश पाटील, ग्रामसेवक बादशहा नदाफ यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

या अभियानात घरासाठी प्लॉट, शेतजमीन मिळणे, शेतजमीन मिळाली आहे, मात्र कब्जा मिळाला नाही, तसेच वसाहतीमधील गटारीसह विविध नागरी सुविधांबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. राज्यस्तरावरील प्रश्न जयंत पाटील मार्गी लावणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

‘राजारामबापू’चे संचालक कार्तिक पाटील, बॅँकेचे संचालक माणिक पाटील, ‘कृष्णा’चे माजी संचालक उदय शिंदे, मोहन शिंदे यांच्यासह धरणग्रस्त बांधव उपस्थित होते.

फोटो : १५१२२०२०-आयएसएलएम-बोरगाव न्यूज

ओळी :

खुंदलापूर (बोरगाव) येथे धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांचे प्रश्न उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अरविंद लाटकर यांनी समजून घेतले. यावेळी नागेश पाटील, रवींद्र सबनीस, तेजस्विनी पाटील, एस. आर. काळे, डी. डी.परळे उपस्थित होते.