शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

राज्यकर्त्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळेच विकासात अडचण

By admin | Updated: April 12, 2016 00:35 IST

नानासाहेब पाटील : शहरांच्या मूलभूत सुधारणांकडे लक्ष देण्याची गरज--नेमगोंडा पाटील व्याख्यानमाला

सांगली : शहरांचा विकास व्हावा आणि त्या विकासातून राज्याच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी राज्यकर्त्यांनी भूमिका घेणे आवश्यक आहे. आगामी काही वर्षांचा विचार केला, तर देशाच्या विकासात शहरांचे महत्त्व अधोरेखित होणार असल्याने, राज्यकर्त्यांनी शहरांच्या विकासासाठी योगदान देणे आवश्यक असले तरी, दुर्दैवाने त्यांची भूमिकाच शहरांच्या विकासात अडचण ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी अप्पर मुख्य सचिव नानासाहेब पाटील यांनी सोमवारी केले. नेमगोंडा दादा पाटील स्मृती व्याख्यानमालेत ‘स्मार्ट सिटी खरोखरच अस्तित्वात येईल काय?’ या विषयावर पाटील बोलत होते. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, सुरेश पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले की, राज्याचा विचार करता, ५२ टक्के उत्पन्न हे केवळ मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या शहरांतून मिळत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रगत राज्य असणाऱ्या महाराष्ट्रातील शहरांचा विकास व्हावयाचा असेल, तर शहरांतील महानगरपालिका सक्षम झाल्या पाहिजेत. विद्यमान सरकारने जकात हटविण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असून महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत यामुळे हटणार आहे. विदेशात कर गोळा करण्यासाठी वेगवेगळे स्रोत वापरण्यात येतात. त्याचा अवलंब करण्यात आला पाहिजे. नागरिकांचा शहरांकडे ओढा वाढत असून, त्यांना सुविधा पुरविण्याची कसरत महापालिकांना करावी लागणार आहे. देशाचे उत्पन्न ४०० टक्क्यांपर्यंत वाढविण्याची क्षमता शहरांत असल्याने राज्यकर्त्यांनी मानसिकता बदलत शहरांचा विकास साधला, तर स्मार्ट सिटीची संकल्पना प्रभावी ठरणार आहे. (प्रतिनिधी)