शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

धरणग्रस्तांचे प्रश्न जलदगतीने सोडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:15 IST

शिराळा : चांदोली अभयारण्य व धरणग्रस्तांची अवस्था पाहून डोळ्यात पाणी येते. मूळचे तेथील २०-२० एकरचे मालक इकडे रोजगाराला ...

शिराळा : चांदोली अभयारण्य व धरणग्रस्तांची अवस्था पाहून डोळ्यात पाणी येते. मूळचे तेथील २०-२० एकरचे मालक इकडे रोजगाराला जातात हे पाहूणच वेदना होतात; पण आपल्या मनाजोगे सरकार सत्तेत आले तर आपल्या हिताचे निर्णय किती वेगाने होतात याची अनुभूती आम्ही दिली आहे, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

चिखली (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायतीमार्फत बांधण्यात येणाऱ्या ग्रामसचिवालय इमारत बांधकाम उद्घाटनावेळी ते बोलत होते. आमदार मानसिंगराव नाईक, सरपंच राजेंद्र नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री पाटील म्हणाले, बऱ्याच दिवसांपासून धरण व अभयारण्यग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याची माझी इच्छा होती. मला पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे या लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. आम्ही त्यासाठी दोन महिने धडक मोहीम राबवली. यामध्ये ज्या कामांना १० ते १२ वर्षे लागली असती, ती कामे आम्ही दोन महिन्यांत मार्गी लावली. त्यामुळे प्रशासनातील अडथळे दूर होऊन लोकांचे मिरजेला पुनर्वसन खात्याकडे असणारे हेलपाटे वाचले.

ते म्हणाले, मोठ्या गतीने काम केले नसते तर अजून १५ वर्षे काम चालले असते. ते दोन महिन्यांत पूर्ण केले. जिल्ह्यातील प्रशासन अधिक गतिमान करून सर्वसामान्य व गोरगरीब लोकांचे हेलपाटे कमी करून त्यांना सहजगत्या व्यवस्था मिळवून देण्याचा प्रयत्न केला. चांदोलीत पर्यटन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात संधी आहे.