शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांचे प्रश्न जलदगतीने सोडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:15 IST

शिराळा : चांदोली अभयारण्य व धरणग्रस्तांची अवस्था पाहून डोळ्यात पाणी येते. मूळचे तेथील २०-२० एकरचे मालक इकडे रोजगाराला ...

शिराळा : चांदोली अभयारण्य व धरणग्रस्तांची अवस्था पाहून डोळ्यात पाणी येते. मूळचे तेथील २०-२० एकरचे मालक इकडे रोजगाराला जातात हे पाहूणच वेदना होतात; पण आपल्या मनाजोगे सरकार सत्तेत आले तर आपल्या हिताचे निर्णय किती वेगाने होतात याची अनुभूती आम्ही दिली आहे, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

चिखली (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायतीमार्फत बांधण्यात येणाऱ्या ग्रामसचिवालय इमारत बांधकाम उद्घाटनावेळी ते बोलत होते. आमदार मानसिंगराव नाईक, सरपंच राजेंद्र नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री पाटील म्हणाले, बऱ्याच दिवसांपासून धरण व अभयारण्यग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याची माझी इच्छा होती. मला पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे या लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. आम्ही त्यासाठी दोन महिने धडक मोहीम राबवली. यामध्ये ज्या कामांना १० ते १२ वर्षे लागली असती, ती कामे आम्ही दोन महिन्यांत मार्गी लावली. त्यामुळे प्रशासनातील अडथळे दूर होऊन लोकांचे मिरजेला पुनर्वसन खात्याकडे असणारे हेलपाटे वाचले.

ते म्हणाले, मोठ्या गतीने काम केले नसते तर अजून १५ वर्षे काम चालले असते. ते दोन महिन्यांत पूर्ण केले. जिल्ह्यातील प्रशासन अधिक गतिमान करून सर्वसामान्य व गोरगरीब लोकांचे हेलपाटे कमी करून त्यांना सहजगत्या व्यवस्था मिळवून देण्याचा प्रयत्न केला. चांदोलीत पर्यटन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात संधी आहे.