शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मिरजेत पाणीटंचाईची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST

मिरजेत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग चारमधील भाजप नगरसेवकांना पाणीटंचाईमुळे येथील महिलांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. अमृत योजनेच्या माध्यमातून ...

मिरजेत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग चारमधील भाजप नगरसेवकांना पाणीटंचाईमुळे येथील महिलांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. अमृत योजनेच्या माध्यमातून मिरज शहराला २४ तास मुबलक पाणी मिळणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र कोट्यवधी रुपये खर्च केलेली अमृत योजना कार्यान्वित झाल्यापासून मिरजेतील नागरिकांना पाणीटंचाईची झळ बसत आहे.

स्थायी सभापतींच्या प्रभागात विद्यामंदिर, सावरकर चौक, भोकरे गल्ली, स्फूर्ती चौक परिसरात अमृत योजना सुरू होण्यापूर्वी पुरेशा दाबाने व नियमित पाणी मिळत होते. नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करण्याची वेळ आली नव्हती. नळाला पाणी येत नाही, ते केव्हाही व कमी दाबाने येते. यामुळे नागरिक हैराण आहेत. गेल्या चार महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. याबाबत पाणीपुरवठा विभाग व नगरसेवकांकडे तक्रार करूनही परिस्थितीत फरक पडलेला नाही. स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे यांच्या प्रभागातही महिलांना पाण्यासाठी आक्रोश सुरू आहे. मंगळवारी विद्यामंदिर परिसरात नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले.

यावेळी महिलांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारत संताप व्यक्त केला. कर्मचाऱ्यांना धारेवर धरत नळाला पुरेसे पाणी आले नाही तर महापालिका कार्यालयात व नगरसेवकांच्या घरापुढे घागरी घेऊन ठिय्या आंदोलनाचा इशारा येथील महिलांनी दिला. मिरज शहरात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती असून पाण्यासाठी नागरिकांसोबत नगरसेवक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असल्याचे चित्र आहे.