शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

खासगी ट्रॅव्हल्सचालकांनाही कोराेनाची धास्ती! मास्क, सॅनिटायझरचा वापर केला बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:26 IST

सांगली : संपूर्ण देशातच कोरोनाचा कहर वाढत असल्याने दैनंदिन व्यवहार थांबले आहेत. त्यानुसार राज्यातील प्रमुख शहरांसह देशातही काही ठिकाणी ...

सांगली : संपूर्ण देशातच कोरोनाचा कहर वाढत असल्याने दैनंदिन व्यवहार थांबले आहेत. त्यानुसार राज्यातील प्रमुख शहरांसह देशातही काही ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्सव्दारे होणाऱ्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. ट्रॅव्हल्सचालकांनीही कोरोनाचा धसका घेतला असून, पूर्ण वाहन सॅनिटाईझ करून केवळ ५० टक्के क्षमतेने वाहतूक सुरू आहे. आरटीपीसीआर चाचणी असलेल्या व्यक्तींनाच प्रवासास परवानगी दिली जात आहे.

सांगलीतून मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जालना, अमरावती, नागपूर, नांदेड, लातूर, बेंगलोर, सुरत, अहमदाबाद, इंदोर आदी ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्सव्दारे प्रवासाची सोय आहे. मात्र, कोरोनामुळे संपूर्ण वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे केवळ चारच ठिकाणी सध्या वाहतूक सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबतचे आरटीओंना सूचना दिल्याने नियमांचे पालन करूनच प्रवासी वाहतूक सुरू आहे. प्रवासातच संक्रमणाचा धोका अधिक असल्याने प्रवाशांनीही पाठ फिरवल्याचे चित्र आहे. तरीही शनिवार व रविवारी ५० टक्के क्षमतेनेच प्रवासी वाहतूक केली जात आहे. अनेकवेळा काही मार्गावरील फेऱ्या रद्दही कराव्या लागत आहेत. सध्या प्रवाशांची संख्या कमी असली तरी जून महिन्यापासून पुन्हा प्रवासी वाढतील, अशी शक्यता आहे.

चौकट

क्वारंटाईन शिक्क्यांची जबाबदारी

परजिल्ह्यातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्याची जबाबदारी ट्रॅव्हल्सचालकांना देण्यात आली आहे. सांगलीत येणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्याच रोडावल्याने चालकही प्रत्येक प्रवाशांची आपल्याकडे नोंद घेऊन त्यांच्या हातावर शिक्का मारून त्याची माहिती प्रशासनाला कळवत आहेत.

चौकट

आरटीपीसीआर नसेल, तर नो एंट्री!

सध्या सुरू असलेल्या चार मार्गांवर प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणी असलेल्या प्रवाशालाच प्रवेश दिला जात आहे. ट्रॅव्हल्समध्येही सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. लक्षणे असलेल्या प्रवाशांना प्रवासास नकार दिला जात आहे.

चाैकट

सध्या सांगलीतून सुरू असलेल्या बहुतांश ट्रॅव्हल्स या ‘स्लिपर कोच’ असल्याने यात पूर्ण क्षमता ३० प्रवाशांची असते. आता नियमानुसार १५ प्रवाशांना घेऊन ‘रूट’ केला जातो. अनेकवेळा प्रवाशांअभावी असतील त्या प्रवाशांनाच घेऊनच प्रवास केला जात आहे. यामुळे प्रवाशांची संख्या खूपच कमी असेल तर अनेकवेळा फेरी रद्द करावी लागत आहेत.

चौकट

अशी आहे आकडेवारी

राेज शहरातून जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ४

रोज शहरात येणाऱ्या ट्रॅव्हल्स ५

प्रवाशांची सरासरी संख्या ७५