शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

पृथ्वीराज पवारांनी एफआरपीची काळजी करू नये

By admin | Updated: October 13, 2015 00:08 IST

पी. आर. पाटील : उलटसुलट बोलून राजकीय अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न

इस्लामपूर : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याकडे ‘सर्वोदय’ आल्यापासून गेल्या ७ वर्षात आम्ही ‘सर्वोदय’च्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १९८ कोटी ४९ लाख रूपये एफआरपीपेक्षा जादा दिले आहेत. त्यामुळे पृथ्वीराज पवारांनी ‘सर्वोदय’च्या एफआरपीची काळजी करू नये, अशा शब्दात राजारामबापू सह़ साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.़ आऱ पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सडेतोड उत्तर दिले़ माजी मंत्री, आमदार जयंत पाटील व राजारामबापू साखर कारखान्याबद्दल उलटसुलट बोलून स्वत:चे राजकीय अस्तित्व दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न पवार करीत असल्याची चपराकही त्यांनी दिली़ पृथ्वीराज पवार यांनी सांगली येथे पत्रकार परिषद घेऊन, राजारामबापू साखर कारखान्याने केलेली कपात, ‘सर्वोदय’च्या एफआरपीबद्दल काही आक्षेपार्ह विधाने केली होती़ त्यास उत्तर देताना पाटील बोलत होते़ ‘सर्वोदय’च्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वी किती ऊसदर मिळाला आणि ‘सर्वोदय’ कारखाना ‘राजारामबापू’कडे आल्यानंतर किती दर मिळाला, याचा हिशेब मांडताना पाटील म्हणाले, २00२-0३ पासून २00७-0८ पर्यंत सर्वोदय चालविताना १२६२ रुपयांपर्यंत मजल मारू शकले़ मात्र आम्ही २00८-0९ पासून २0१४-१५ पर्यंत २७२७ रुपये इतका उच्चांकी ऊस दर दिला़ हा दर देताना १३ कोटी सहन केले आहेत़ सध्याचा दर देताना ६ कोटी ३२ लाख सहन केले आहेत. पाटील म्हणाले, सध्या साखर उद्योग अडचणीत आहे. को-जनरेशन, विस्तारवाढीसाठी १४७ रुपयांची कपात करीत असून ती ५ वर्षाची ‘ठेव’ आहे़ आम्ही ५ वर्षानंतर ती परत करणार असून १0 टक्के व्याज देणार आहे़ आम्ही कोणत्याही ऊस उत्पादकांकडून जबरदस्तीने ऊस नेणार नाही, अशी भीती दाखवून कपातीसाठी संमतीपत्र घेतलेले नाही. लोकांनी स्वखुशीने ठेव घेण्यास संमतीपत्रे दिली आहेत़ आमच्या साखर कारखान्याने गेल्या ४0-४५ वर्षात काय मिळविले? तर तो आहे ‘विश्वास’. आम्ही जत कारखाना घेतला तेव्हा १ गुंठाही उसाची नोंद नसताना त्यावर्षी शेतकऱ्यांनी आम्हाला आपला ऊस घातला़ आम्ही तेथे त्यावर्षी २ लाख ६८ हजार टन उसाचे गाळप केले़ त्यामुळे पृथ्वीराजने उलटसुलट बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी, लोक फसणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, संचालक विराज शिंदे, श्रेणिक कबाडे, दिलीपराव पाटील (येलूर), एल़ बी़ माळी, जे़ वाय़ पाटील, कार्यकारी संचालक आऱ डी़ माहुली, चिफ अकौंटंट अमोल पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)शेतकरी आमचेच : पाटीलजो ऊस दर आम्ही आमच्या सभासदांना दिला, तोच दर त्यांना दिला़ ‘सर्वोदय’चे ऊस उत्पादक आमचेच आहेत़ ते पूर्वीच्या कारकीर्दीपेक्षा निश्चितपणे समाधानी आहेत़ त्यांच्या या विश्वासावरच ही यशस्वी वाटचाल चालू आहे. त्यामुळे राजकीय फायद्यासाठी जर कोण शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असेल, तर त्याला शेतकरीच उत्तर देतील, या शब्दात पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.