शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

भरतीत मानधन, बदली कामगारांना प्राधान्य

By admin | Updated: June 12, 2017 01:04 IST

हारुण शिकलगार : पदोन्नतीचा प्रश्नही सोडविणार; महापालिका कामगारांचा सांगलीत मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळेच किमान वेतनाचा लढा यशस्वी ठरला आहे. आता कर्मचाऱ्यांची पदोन्नती व बदली महिला कर्मचाऱ्यांना किमान पंधरा दिवस काम देण्याबाबत प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. भविष्यात नोकरभरतीमध्ये मानधन व बदली कर्मचाऱ्यांना प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन महापौर हारूण शिकलगार यांनी रविवारी केले. सांगलीतील तरूण भारत क्रीडांगणाच्या सभागृहात महापालिका कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, पुणे महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष उदय भट्ट, मुंबई कचरा वाहतूक श्रमिक संघाचे विजय दळवी, कामगार सभेचे अध्यक्ष तानाजी पाटील, उपाध्यक्ष अमित ठाकर, सचिव दिलीप शिंदे, सहसचिव विजय तांबडे उपस्थित होते. शिकलगार म्हणाले की, किमान वेतनप्रश्नी कामगारांनी एकी दाखविली. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्याशी आम्ही चर्चा केली. काहीजणांचा विरोध असतानाही किमान वेतनाचा ठराव मंजूर केला. बदली महिला कर्मचाऱ्यांना महिनाभर काम मिळत नाही, हे शरमेची बाब आहे. त्यांना किमान पंधरा दिवस काम मिळावे, यासाठी प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. कचरा वाहतुकीवरील खर्च कमी करण्यासाठी चार प्रभागात वर्गीकरणाचा विचार सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्नही लवकरच निकाली निघेल. पालिकेचे क्षेत्रफळ पाहता, साडेचार हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. सध्या २३०० कर्मचाऱ्यांवर काम सुरू आहे. गेल्या पंधरा वर्षात नोकरभरती झालेली नाही. या नव्या भरतीत मानधन व बदली कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. विजय दळवी म्हणाले की, मुंबई, ठाणे, नाशिक व नागपूरनंतर किमान वेतन मिळणारी सांगली ही पाचवी महापालिका आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये किमान वेतनाचा अध्यादेश जारी झाला आहे. त्यामुळे आता त्यातील फरकासाठी लढा उभा करावा. नियमित कामाचा ठेका देऊ नये, अशी कायद्यात तरतूद आहे. तरीही सफाई, रुग्णालयातील कामासाठी कंत्राटी कामगार नियुक्त केले जातात. याविरूद्ध रस्त्यावरच्या व कायद्याच्या लढाईसाठी तयार व्हा, असे आवाहन त्यांनी केले. उदय भट्ट यांनी भाजप सरकारच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार अनेक कायदे बदलत आहे. त्यामुळे कामगारांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांना गोळ्या घातल्या जात आहेत. या प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्याऐवजी, कोणी काय खायचे, कपडे कोणते घालायचे, यावरच चर्चा होते, असा टोलाही त्यांनी लगाविला. यावेळी शेडजी मोहिते, विजय तांबडे यांचीही भाषणे झाली. मेळाव्यास सलीम मुजावर, एकनाथ माळी, सूर्यकांत सूर्यवंशी गौतम कांबळे, चंद्रकांत बाणदार, सुशिला भोरे, मनीषा पाटील, सविता कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.