शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
2
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
3
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
4
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
5
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
6
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
7
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
8
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
9
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
10
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
11
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
12
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
13
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
14
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
15
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
16
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
17
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
18
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
19
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?

भरतीत मानधन, बदली कामगारांना प्राधान्य

By admin | Updated: June 12, 2017 01:04 IST

हारुण शिकलगार : पदोन्नतीचा प्रश्नही सोडविणार; महापालिका कामगारांचा सांगलीत मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळेच किमान वेतनाचा लढा यशस्वी ठरला आहे. आता कर्मचाऱ्यांची पदोन्नती व बदली महिला कर्मचाऱ्यांना किमान पंधरा दिवस काम देण्याबाबत प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. भविष्यात नोकरभरतीमध्ये मानधन व बदली कर्मचाऱ्यांना प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन महापौर हारूण शिकलगार यांनी रविवारी केले. सांगलीतील तरूण भारत क्रीडांगणाच्या सभागृहात महापालिका कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, पुणे महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष उदय भट्ट, मुंबई कचरा वाहतूक श्रमिक संघाचे विजय दळवी, कामगार सभेचे अध्यक्ष तानाजी पाटील, उपाध्यक्ष अमित ठाकर, सचिव दिलीप शिंदे, सहसचिव विजय तांबडे उपस्थित होते. शिकलगार म्हणाले की, किमान वेतनप्रश्नी कामगारांनी एकी दाखविली. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्याशी आम्ही चर्चा केली. काहीजणांचा विरोध असतानाही किमान वेतनाचा ठराव मंजूर केला. बदली महिला कर्मचाऱ्यांना महिनाभर काम मिळत नाही, हे शरमेची बाब आहे. त्यांना किमान पंधरा दिवस काम मिळावे, यासाठी प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. कचरा वाहतुकीवरील खर्च कमी करण्यासाठी चार प्रभागात वर्गीकरणाचा विचार सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्नही लवकरच निकाली निघेल. पालिकेचे क्षेत्रफळ पाहता, साडेचार हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. सध्या २३०० कर्मचाऱ्यांवर काम सुरू आहे. गेल्या पंधरा वर्षात नोकरभरती झालेली नाही. या नव्या भरतीत मानधन व बदली कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. विजय दळवी म्हणाले की, मुंबई, ठाणे, नाशिक व नागपूरनंतर किमान वेतन मिळणारी सांगली ही पाचवी महापालिका आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये किमान वेतनाचा अध्यादेश जारी झाला आहे. त्यामुळे आता त्यातील फरकासाठी लढा उभा करावा. नियमित कामाचा ठेका देऊ नये, अशी कायद्यात तरतूद आहे. तरीही सफाई, रुग्णालयातील कामासाठी कंत्राटी कामगार नियुक्त केले जातात. याविरूद्ध रस्त्यावरच्या व कायद्याच्या लढाईसाठी तयार व्हा, असे आवाहन त्यांनी केले. उदय भट्ट यांनी भाजप सरकारच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार अनेक कायदे बदलत आहे. त्यामुळे कामगारांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांना गोळ्या घातल्या जात आहेत. या प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्याऐवजी, कोणी काय खायचे, कपडे कोणते घालायचे, यावरच चर्चा होते, असा टोलाही त्यांनी लगाविला. यावेळी शेडजी मोहिते, विजय तांबडे यांचीही भाषणे झाली. मेळाव्यास सलीम मुजावर, एकनाथ माळी, सूर्यकांत सूर्यवंशी गौतम कांबळे, चंद्रकांत बाणदार, सुशिला भोरे, मनीषा पाटील, सविता कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.