शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

कृषी उत्पन्न बाजार समित्या सक्षम करण्यास प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळवून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या उभारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळवून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या उभारी देण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत आहेत. त्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कारभार अत्यंत पारदर्शक झाला पाहिजे, असे सांगून कृषी उत्पन्न बाजार समिती आगामी काळात अधिक सक्षम करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.

विटा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कमळापूर (ता. खानापूर) येथील राहुल साळुंखे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा मंत्री डॉ. कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी युवानेते डॉ. जितेश कदम, गजानन सुतार उपस्थित होते.

मंत्री डॉ. कदम म्हणाले, दुष्काळी समजल्या जाणाऱ्या खानापूर, कडेगाव व आटपाडी तालुक्यात आता टेंभू, ताकारी, आरफळ योजनांचे पाणी आले आहे. त्यामुळे हा सर्व परिसर आता ओलहताखाली आल्याने हरितक्रांतीचे नवे पर्व सुरू झाले आहे. पर्यायाने या तालुक्यात शेती उत्पन्नात भरीव वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत खानापूर व कडेगाव या दोन तालुक्याेचे कार्यक्षेत्र असलेली विटा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सक्षम झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काम करावे.

यावेळी नूतन सभापती राहुल साळुंखे यांनी विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून शेतीमालाला योग्य भाव देण्याबरोबरच बाजार समितीच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी प्रकाश इनामदार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.