शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

नारळ फुटण्याअगोदरच सांगलीत प्रचाराचा धुरळा

By admin | Updated: September 30, 2014 00:16 IST

विधानसभा निवडणूक : प्रचार प्रारंभाची केवळ औपचारिकता

सांगली : पक्षीय प्रचाराचा नारळ फुटण्यापूर्वीच अधिकृत उमेदवारांनी प्रचाराचे रान उठविले आहे. सुरुवातीला महापालिका क्षेत्र वगळून अन्य १२ गावांमध्ये प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. मतदारांच्या गाठी-भेटीवर अधिक भर देण्यात येत आहे. येत्या आठवडाभरात स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्षाची प्रचार प्रारंभ सभा होणार असून, ती केवळ एक औपचारिकता ठरणार आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात सध्या महापालिका क्षेत्रासह चारही बाजूच्या छोट्या गावांचा समावेश आहे. यामध्ये नांद्रे, बिसूर, माधवनगर, बुधगाव, कर्नाळ, पद्माळे, खोतवाडी, वाजेगाव, बामणोली, इनाम धामणी, अंकली, हरिपूर या गावांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्र मोठे असल्याने याठिकाणी शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा धडाका दिसणार आहे. कॉँग्रेसचे मदन पाटील, राष्ट्रवादीचे सुरेश पाटील, शिवसेनेचे पृथ्वीराज पवार, भाजपचे सुधीर गाडगीळ यांनी ग्रामीण भागात प्रचार सुरू केला आहे. या गावांमध्ये जाऊन लोकांच्या भेटी-गाठीचा कार्यक्रम सुरू आहे. प्रत्येक पक्षामार्फत आता प्रचार प्रारंभाच्या सभेचे नियोजन सुरू आहे. राष्ट्रवादीने सभेचे नियोजन केले आहे. कॉँग्रेसच्याही सभेचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. भाजप, शिवसेनेचीही त्याबाबतची तयारी पूर्ण झाली आहे. स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत या सभा येत्या आठवडाभरात होणार आहेत. प्रचाराचा नारळ फुटण्याआधीच प्रचाराचा धुरळा उठल्याने आता सभांची केवळ औपचारिकता बाकी आहे. यंदाच्या सांगली विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे प्रचारावरही त्याचा परिणाम होत आहे. संभाजी पवार, पृथ्वीराज पवार व गौतम पवार यांनी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे कमळाऐवजी धनुष्यबाणाचा प्रचार करताना त्यांना अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत. म्हणूनच पवार समर्थकांनी सध्या ग्रामीण भागात प्रचाराचा जोर लावला आहे. राष्ट्रवादी प्रथमच या मतदारसंघात मैदानात उतरली आहे. त्यामुळे त्यांनाही या सर्व भागात नव्याने प्रचाराची यंत्रणा राबवावी लागणार आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांना महापालिकेच्या निवडणुकीचा अनुभव होता. आता आमदारकीची निवडणूक लढविताना त्यांना मोठी यंत्रणा लावावी लागणार आहे. महापालिका क्षेत्रात या गोष्टी नंतर करता येतील, या विचाराने सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी मतदारसंघातील ग्रामीण भागाला सध्या प्राधान्य दिले आहे. (प्रतिनिधी)