शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दरवाढीने रंगला पानाचा विडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:26 IST

नरवाड (जि. सांगली) : कोरोनामुळे थंडावलेल्या खाऊच्या पानांचा व्यवसाय सध्या तेजीत आला आहे. सध्या तीन हजार पिवळ्या पानांना बाजारपेठेत ...

नरवाड (जि. सांगली) : कोरोनामुळे थंडावलेल्या खाऊच्या पानांचा व्यवसाय सध्या तेजीत आला आहे. सध्या तीन हजार पिवळ्या पानांना बाजारपेठेत ४०० ते १९०० रुपये दर मिळत आहे. यामुळे मिरज पूर्वभागातील उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुळे गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून पान व्यवसायाला मरगळ आली होती. कोरोना काळात १० कवळी (एक कवळी ३०० पानांची) पानांचा दर १५० ते २५० रुपयांपर्यंत होता. दरम्यानच्या काळात पानांचे सौदे बंद होते. मात्र ‌पानांचे सौदे सुरू होताच खाऊच्या पानांना चांगला भाव मिळत आहे. विशेषतः पिवळ्या पानांचा भाव जादा वधारला आहे. बाजारपेठेत अशा तीन हजार पानांना सध्या ४०० ते १९०० रुपये दर मिळत आहे.

यंदा कोरोना आणि अतिवृष्टीमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. पान उत्पादक कोलमडून पडला आहे. अशावेळी दरवाढीने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे.

कोट

गेल्या १५ दिवसांपासून आवक घटल्याने मागणी वाढून पान उत्पादकांना दर मिळू लागला आहे. परिणामी स्थानिक बाजारपेठांबरोबरच सांगोला, पंढरपूर, रत्नागिरी, मालवण, फोंडा, कोल्हापूर आदी बाजारपेठा पुन्हा बहरल्या आहेत.

- शशिकांत नलवडे, पान वखारदार, बेडग

कोट

आजवर कधीही नुकसान झाले नाही, इतके कोरोनामुळे झाले आहे. सध्याचा दर किती दिवस टिकतो, यावरच शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

- बाळासाहेब लिंबीकाई, शेतकरी, नरवाड

चाैकट

शेवटच्या टप्प्यात दर

''''हत्ती गेला अन् शेपूट राहिले'''' अशी पान उत्पादकांची स्थिती आहे. कारण पाने खुडण्याचा हंगाम जून ते डिसेंबरअखेर चालतो. पानांची खुडणी केवळ १० टक्के उरली असताना, आता दर वाढला आहे.