शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

दरवाढीने रंगला पानाचा विडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:26 IST

नरवाड (जि. सांगली) : कोरोनामुळे थंडावलेल्या खाऊच्या पानांचा व्यवसाय सध्या तेजीत आला आहे. सध्या तीन हजार पिवळ्या पानांना बाजारपेठेत ...

नरवाड (जि. सांगली) : कोरोनामुळे थंडावलेल्या खाऊच्या पानांचा व्यवसाय सध्या तेजीत आला आहे. सध्या तीन हजार पिवळ्या पानांना बाजारपेठेत ४०० ते १९०० रुपये दर मिळत आहे. यामुळे मिरज पूर्वभागातील उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुळे गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून पान व्यवसायाला मरगळ आली होती. कोरोना काळात १० कवळी (एक कवळी ३०० पानांची) पानांचा दर १५० ते २५० रुपयांपर्यंत होता. दरम्यानच्या काळात पानांचे सौदे बंद होते. मात्र ‌पानांचे सौदे सुरू होताच खाऊच्या पानांना चांगला भाव मिळत आहे. विशेषतः पिवळ्या पानांचा भाव जादा वधारला आहे. बाजारपेठेत अशा तीन हजार पानांना सध्या ४०० ते १९०० रुपये दर मिळत आहे.

यंदा कोरोना आणि अतिवृष्टीमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. पान उत्पादक कोलमडून पडला आहे. अशावेळी दरवाढीने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे.

कोट

गेल्या १५ दिवसांपासून आवक घटल्याने मागणी वाढून पान उत्पादकांना दर मिळू लागला आहे. परिणामी स्थानिक बाजारपेठांबरोबरच सांगोला, पंढरपूर, रत्नागिरी, मालवण, फोंडा, कोल्हापूर आदी बाजारपेठा पुन्हा बहरल्या आहेत.

- शशिकांत नलवडे, पान वखारदार, बेडग

कोट

आजवर कधीही नुकसान झाले नाही, इतके कोरोनामुळे झाले आहे. सध्याचा दर किती दिवस टिकतो, यावरच शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

- बाळासाहेब लिंबीकाई, शेतकरी, नरवाड

चाैकट

शेवटच्या टप्प्यात दर

''''हत्ती गेला अन् शेपूट राहिले'''' अशी पान उत्पादकांची स्थिती आहे. कारण पाने खुडण्याचा हंगाम जून ते डिसेंबरअखेर चालतो. पानांची खुडणी केवळ १० टक्के उरली असताना, आता दर वाढला आहे.