शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

दरवाढीने रंगला पानाचा विडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:26 IST

नरवाड (जि. सांगली) : कोरोनामुळे थंडावलेल्या खाऊच्या पानांचा व्यवसाय सध्या तेजीत आला आहे. सध्या तीन हजार पिवळ्या पानांना बाजारपेठेत ...

नरवाड (जि. सांगली) : कोरोनामुळे थंडावलेल्या खाऊच्या पानांचा व्यवसाय सध्या तेजीत आला आहे. सध्या तीन हजार पिवळ्या पानांना बाजारपेठेत ४०० ते १९०० रुपये दर मिळत आहे. यामुळे मिरज पूर्वभागातील उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुळे गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून पान व्यवसायाला मरगळ आली होती. कोरोना काळात १० कवळी (एक कवळी ३०० पानांची) पानांचा दर १५० ते २५० रुपयांपर्यंत होता. दरम्यानच्या काळात पानांचे सौदे बंद होते. मात्र ‌पानांचे सौदे सुरू होताच खाऊच्या पानांना चांगला भाव मिळत आहे. विशेषतः पिवळ्या पानांचा भाव जादा वधारला आहे. बाजारपेठेत अशा तीन हजार पानांना सध्या ४०० ते १९०० रुपये दर मिळत आहे.

यंदा कोरोना आणि अतिवृष्टीमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. पान उत्पादक कोलमडून पडला आहे. अशावेळी दरवाढीने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे.

कोट

गेल्या १५ दिवसांपासून आवक घटल्याने मागणी वाढून पान उत्पादकांना दर मिळू लागला आहे. परिणामी स्थानिक बाजारपेठांबरोबरच सांगोला, पंढरपूर, रत्नागिरी, मालवण, फोंडा, कोल्हापूर आदी बाजारपेठा पुन्हा बहरल्या आहेत.

- शशिकांत नलवडे, पान वखारदार, बेडग

कोट

आजवर कधीही नुकसान झाले नाही, इतके कोरोनामुळे झाले आहे. सध्याचा दर किती दिवस टिकतो, यावरच शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

- बाळासाहेब लिंबीकाई, शेतकरी, नरवाड

चाैकट

शेवटच्या टप्प्यात दर

''''हत्ती गेला अन् शेपूट राहिले'''' अशी पान उत्पादकांची स्थिती आहे. कारण पाने खुडण्याचा हंगाम जून ते डिसेंबरअखेर चालतो. पानांची खुडणी केवळ १० टक्के उरली असताना, आता दर वाढला आहे.