शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

कारागृह, आरटीओ कार्यालयाचा प्रस्ताव सादर

By admin | Updated: December 28, 2015 00:28 IST

कवलापुरातील जागेचा ताबा : राज्य शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा; चार वर्षात इमारत पूर्ण होणार

सचिन लाड - सांगली -जिल्हा मध्यवर्ती कारागृह व उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळावर स्थलांतरित करण्यासाठी या जागेचा ताबा घेण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला सादर केला आहे. यावर येत्या काही दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारागृह व आरटीओ कार्यालय कवलापुरातच होण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. येत्या चार वर्षात या दोन्ही कार्यालयांच्या इमारती पूर्णत्वास येतील. सांगली व आटपाडी याठिकाणी दोन कारागृहे आहेत. सांगलीच्या कारागृहात कच्च्या कैद्यांना ठेवले जाते. आटपाडीतील स्वतंत्रपूर येथे खुले कारागृह आहे. तिथे शिक्षा लागलेल्या कैद्यांना कुटुंबासह राहण्याची सोय आहे. सांगलीचे कारागृह सव्वादोनशे क्षमतेचे आहे. गेल्या काही वर्षात कारागृह परिसरात लोकवस्ती वाढल्याने सुरक्षा धोक्यात आली आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षापासून कारागृह स्थलांतर करण्याची चर्चा सुरू होती. यासाठी दोन महिन्यांपूर्वी कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी कारागृहास भेट देऊन पाहणी केली व सुरक्षेचा आढावा घेतला. त्याचवेळी त्यांनी कारागृह स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याशी त्यांनी चर्चा करून जागा देण्याची विनंती केली होती. जागेच्या विषयावर चर्चाही झाली. या चर्चेतून कवलापूर येथील नियोजित विमानतळाची जागा पडून असल्याने, ती घेण्याचे ठरले होते. त्यानुसार कारागृहाचे अधीक्षक एम. एस. पवार यांनी महिन्यापूर्वी कवलापूर येथे जाऊन त्या जागेची पाहणी केली होती. त्यानंतर जागा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना प्रस्ताव सादर केला होता. आरटीओंचे प्रशासकीय काम सांगलीत आणि वाहनांचे नूतनीकरण, वाहन चालविण्याचा परवाना (लायसेन्स) काढण्याची परीक्षा सावळी (ता. मिरज) येथे घेतली जाते. सध्याचे कार्यालय भाडेतत्त्वावर आहे. एकाच छताखाली कार्यालय नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. दहा वर्षांपूर्वी सावळीला कार्यालय नेण्याच्या हालचाली सुरू होत्या. पण या जागेवर तेथील एका शेतकऱ्याने हक्क सांगितला. त्यामुळे हा वादाचा मुद्दा बनला. सध्या या जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ट बनले आहे. मुंबई उच्च न्यायालयात याची सुनावणी सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी जागेचा शोध सुरू ठेवला होता. जागेचा हा शोध कवलापूर येथे थांबला. नियोजित विमानतळाची दीडशे एकर जागा पडून आहे. यातील तीस एकर जागेची त्यांनी मागणी केली असून, तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी हे दोन्ही प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाला सादर केला आहे.प्रश्न सुरक्षेचा : नव्या जागेमुळे सुटणार!आरोपींना ने-आण करण्यासाठी सुरक्षिततेच्यादृष्टीने कवलापुरात कारागृहासाठी प्रशासनाने २५ एकर जागा देण्याची मागणी केली आहे. यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान, तसेच कारागृहाची इमारत बांधली जाणार आहे. कवलापूर आणि बुधगाव या दोन्ही गावांच्या मध्यभागी ही जागा आहे. कवलापूरच्या ग्रामस्थांनी येथे कारागृह बांधण्यास विरोध केला आहे. जिल्हा कारागृहात दिवसेंदिवस कच्च्या कैद्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाढीव क्षमतेने बांधकाम होणारसध्याच्या स्थितीला पावणेचारशे कैदी आहेत. क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी झाले असल्याने कारागृह अपुरे पडू लागले आहे. आजूबाजूला लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे कवलापूरच्या जागेत तातडीने कारागृह स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. जागा मंजूर झाल्यास पुढील कामाला गती येणार आहे. नव्या जागेत कैद्यांच्या वाढीव क्षमतेचे कारागृह बांधण्याचा विचार सुरू आहे.