शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सध्याची शिक्षण व्यवस्था जाती, धर्मामध्ये गुरफटली-श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:25 IST

शिराळा : सध्या शिक्षण व्यवस्था जाती, धर्म यामध्ये गुरफटली जात आहे. त्यामुळे भावी पिढी भ्रष्ट होणार आहे

ठळक मुद्देभावी युवा पिढी भ्रष्ट होण्याचा धोकाशिराळा येथे वसंतराव नाईक जयंतीनिमित्त ‘स्मृतिग्रंथा’चे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : सध्या शिक्षण व्यवस्था जाती, धर्म यामध्ये गुरफटली जात आहे. त्यामुळे भावी पिढी भ्रष्ट होणार आहे. हे देशाला परवडणारे नाही. यासाठी माजी आमदार वसंतराव नाईक यांनी त्याकाळात रुजविलेले विचार अंमलात आणले, तरच शिक्षण व समाजव्यवस्था टिकेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.शिराळा येथे शिवछत्रपती विद्यालयाच्या पटांगणावर वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘स्मृतिग्रंथ’ प्रकाशन स्पर्धांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमप्रसंगी डॉ. सबनीस बोलत होते. आमदार जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते, तर माजी आ. मानसिंगराव नाईक, अ‍ॅड. भगतसिंग नाईक, डॉ. विजयमाला चव्हाण, राजाक्का पाटील, लताताई पाटील, उदयसिंगराव नाईक, रणजितसिंह नाईक, विश्वप्रतापसिंह नाईक यांची उपस्थिती होती.डॉ. सबनीस म्हणाले, वसंतराव नाईक यांनी संस्थेत शिकणाºया विद्यार्थ्यांपासून ते संस्थेत काम करणाºया कर्मचाºयांपर्यंत सर्वांना जातीभेद न मानता सन्मानाची वागणूक दिली. आज शिक्षण व्यवस्थेमध्ये भगवेकरणाची लाट येऊ पाहत आहे. शिक्षणात जुना इतिहास काढून हिंदुत्ववादाचे धडे घालून जाती-धर्माचे विष पेरण्याचे काम सध्या सुरु आहे. महात्मा गांधींपेक्षा नथुरामाला देशभक्त म्हणण्याचे काम सुरु आहे. महात्मा गांधींचे मोठेपण ओबामा, नेल्सन मंडेला आदींनी जपले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास माहिती करून न घेता, वेगळाच इतिहास काही लोक मांडू लागले आहेत.आ. जयंत पाटील म्हणाले, आज लोकांनी निवडून दिलेले सरकार विकासाच्या गप्पा मारत आहे. नोटाबंदी केली की काळा पैसा बाद झाला, असे वाटत होते. परंतु काळा पैसा हा बदलून देण्याचे काम सत्तारुढ सरकारने मागच्या दाराने केले व काळा पैसा पांढरा केला.मानसिंगराव नाईक म्हणाले, राजारामबापू व वसंतराव नाईक यांनी वाळवा, शिराळा तालुक्यात विकासात्मक दृष्टिकोन ठेवून दोन्ही तालुक्यांचा विकास घडविला. जयंत पाटील यांनी मतदार संघाच्या विकासासाठी मोठी मदत केली आहे.अ‍ॅड. भगतसिंग नाईक, ‘स्मृतिग्रंथा’चे संपादक डॉ. तानाजी हवालदार, प्रा. अजित काटे, प्रा. हुलेनवार, डॉ. सौ. विजयमाला चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले.अशोक कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्या डॉ. उज्ज्वला पाटील यांनी आभार मानले. अजिंक्य कुंभार, पी. व्ही. पाटील, नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, प्रमोद नाईक, सुनीतादेवी नाईक, मनीषा नाईक, अमरसिंह नाईक, उपसभापती सम्राटसिंह नाईक, पृथ्वीसिंग नाईक, नम्रता नाईक, शारदा नाईक, अ‍ॅड. करणसिंग चव्हाण, अ‍ॅड. दुर्गा नाईक आदी उपस्थित होते.इतिहासाची पाने बदललीशिक्षण व्यवस्थेत कोणत्याही एका महापुरुषाचे विचार नकोत, तर सर्व महापुरुषांच्या विचारांचा अर्क हवा आहे. काही इतिहासाची पाने फाडून, एकाच बाजूचा इतिहास शिकविला जात आहे. त्यामुळे महापुरुषांचे मूल्यमापन कसे होणार? अशी खंत डॉ. सबनीस यांनी व्यक्त केली. प्रत्येक सणामध्ये प्राण्यांचे महत्त्व आहे. प्राण्यांना वजा करुन सण होऊ शकत नाहीत, असे त्यांनी सांगितले.