शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

सध्याची शिक्षण व्यवस्था जाती, धर्मामध्ये गुरफटली-श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:25 IST

शिराळा : सध्या शिक्षण व्यवस्था जाती, धर्म यामध्ये गुरफटली जात आहे. त्यामुळे भावी पिढी भ्रष्ट होणार आहे

ठळक मुद्देभावी युवा पिढी भ्रष्ट होण्याचा धोकाशिराळा येथे वसंतराव नाईक जयंतीनिमित्त ‘स्मृतिग्रंथा’चे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : सध्या शिक्षण व्यवस्था जाती, धर्म यामध्ये गुरफटली जात आहे. त्यामुळे भावी पिढी भ्रष्ट होणार आहे. हे देशाला परवडणारे नाही. यासाठी माजी आमदार वसंतराव नाईक यांनी त्याकाळात रुजविलेले विचार अंमलात आणले, तरच शिक्षण व समाजव्यवस्था टिकेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.शिराळा येथे शिवछत्रपती विद्यालयाच्या पटांगणावर वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘स्मृतिग्रंथ’ प्रकाशन स्पर्धांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमप्रसंगी डॉ. सबनीस बोलत होते. आमदार जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते, तर माजी आ. मानसिंगराव नाईक, अ‍ॅड. भगतसिंग नाईक, डॉ. विजयमाला चव्हाण, राजाक्का पाटील, लताताई पाटील, उदयसिंगराव नाईक, रणजितसिंह नाईक, विश्वप्रतापसिंह नाईक यांची उपस्थिती होती.डॉ. सबनीस म्हणाले, वसंतराव नाईक यांनी संस्थेत शिकणाºया विद्यार्थ्यांपासून ते संस्थेत काम करणाºया कर्मचाºयांपर्यंत सर्वांना जातीभेद न मानता सन्मानाची वागणूक दिली. आज शिक्षण व्यवस्थेमध्ये भगवेकरणाची लाट येऊ पाहत आहे. शिक्षणात जुना इतिहास काढून हिंदुत्ववादाचे धडे घालून जाती-धर्माचे विष पेरण्याचे काम सध्या सुरु आहे. महात्मा गांधींपेक्षा नथुरामाला देशभक्त म्हणण्याचे काम सुरु आहे. महात्मा गांधींचे मोठेपण ओबामा, नेल्सन मंडेला आदींनी जपले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास माहिती करून न घेता, वेगळाच इतिहास काही लोक मांडू लागले आहेत.आ. जयंत पाटील म्हणाले, आज लोकांनी निवडून दिलेले सरकार विकासाच्या गप्पा मारत आहे. नोटाबंदी केली की काळा पैसा बाद झाला, असे वाटत होते. परंतु काळा पैसा हा बदलून देण्याचे काम सत्तारुढ सरकारने मागच्या दाराने केले व काळा पैसा पांढरा केला.मानसिंगराव नाईक म्हणाले, राजारामबापू व वसंतराव नाईक यांनी वाळवा, शिराळा तालुक्यात विकासात्मक दृष्टिकोन ठेवून दोन्ही तालुक्यांचा विकास घडविला. जयंत पाटील यांनी मतदार संघाच्या विकासासाठी मोठी मदत केली आहे.अ‍ॅड. भगतसिंग नाईक, ‘स्मृतिग्रंथा’चे संपादक डॉ. तानाजी हवालदार, प्रा. अजित काटे, प्रा. हुलेनवार, डॉ. सौ. विजयमाला चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले.अशोक कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्या डॉ. उज्ज्वला पाटील यांनी आभार मानले. अजिंक्य कुंभार, पी. व्ही. पाटील, नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, प्रमोद नाईक, सुनीतादेवी नाईक, मनीषा नाईक, अमरसिंह नाईक, उपसभापती सम्राटसिंह नाईक, पृथ्वीसिंग नाईक, नम्रता नाईक, शारदा नाईक, अ‍ॅड. करणसिंग चव्हाण, अ‍ॅड. दुर्गा नाईक आदी उपस्थित होते.इतिहासाची पाने बदललीशिक्षण व्यवस्थेत कोणत्याही एका महापुरुषाचे विचार नकोत, तर सर्व महापुरुषांच्या विचारांचा अर्क हवा आहे. काही इतिहासाची पाने फाडून, एकाच बाजूचा इतिहास शिकविला जात आहे. त्यामुळे महापुरुषांचे मूल्यमापन कसे होणार? अशी खंत डॉ. सबनीस यांनी व्यक्त केली. प्रत्येक सणामध्ये प्राण्यांचे महत्त्व आहे. प्राण्यांना वजा करुन सण होऊ शकत नाहीत, असे त्यांनी सांगितले.