शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जत शहरात पावसाची हजेरी

By admin | Updated: April 5, 2016 00:50 IST

वादळी वारे : सांगली, कवठेमहांकाळमध्येही पाऊस

जत : जत शहर व बिळूर परिसरात सोमवारी सायंकाळी चार वाजता वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह तुरळक पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे आंबा, द्राक्षे, बेदाणा, शेवगा, आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने चारा व पाणीटंचाई कमी होणार नसल्याने आणखी मोठ्या पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे. रात्री दहानंतर सांगली शहरातही पाऊस झाला. जत तालुक्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. उष्णता अधिक असल्यामुळे उकाडा वाढला होता. सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान आकाशात काळे ढग जमा झाले. त्यानंतर वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह सुमारे पंधरा-वीस मिनिटे तुरळक पाऊस झाला. वादळी वारे आणि पावसामुळे आंबा व शेवगा पिकांचा मोहर गळून पडला आहे, तर द्राक्षांच्या तयार घडात पाणी साचून रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेडमधील तयार होत असलेल्या बेदाण्यात पावसाचे पाणी जाऊन तो काळा पडण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. दोन गाई, म्हैस ठार रामपूर येथील मासाळ वस्तीवर चंदर गोविंद मासाळ या शेतकऱ्याच्या घरासमोरील बाभळीच्या झाडावर वीज कोसळून तीन जनावरे ठार झाली आहेत. यामध्ये दोन देशी गाई व म्हैस यांचा समावेश आहे. ही घटना सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडली. यामध्ये एक लाखाचे नुकसान झाले आहे. मंडल अधिकारी ए. व्ही. शेटे, तलाठी आर. एच. कोरवार, कोतवाल सुभाष कोळी यांनी पंचनामा करून मदतीसाठी शासनाला अहवाल सादर केला आहे. घटनेची माहिती रामपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच मारुती पवार यांनी शासनाला कळवली आहे.