शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

सांगलीसाठी तत्परता, मिरजेबाबत उदासीनता

By admin | Updated: November 30, 2014 00:54 IST

सुधारित नळपाणी योजना : लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा फटका

 सदानंद औंधे / मिरज सांगलीसाठी सुधारित नळपाणी योजना मंजूर झाली. मात्र मिरजेतील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मिरज शहरासाठी सुधारित नळपाणी योजना रखडली आहे. जुन्या व जीर्ण झालेल्या पाणीपुरवठा यंत्रणेवर पाणीपुरवठ्याचा मोठा ताण असल्याने दूषित पाण्याच्या समस्यांने गंभीर स्वरूप धारण केले आहे. गॅस्ट्रोने अनेक बळी गेल्यानंतर शहरातील जुन्या जलवाहिन्यांची तत्पुरती मलमपट्टी सुरू आहे. मात्र सुधारित नळपाणीपुरवठा योजना सुरू झाल्याशिवाय दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न संपणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मिरजेच्या नळपाणी योजनेचा ४५ कोटींचा खर्च ७० कोटींवर पोहोचला आहे, तर महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत आणखी काही वर्षे मिरजेतील नागरिकांना दूषित पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. मिरज शहरासाठी ५० हजार लोकसंख्येला नळ पाणी पुरवठा करणारी ५० वर्षांपूर्वीची जुनी यंत्रणा शहरातील सुमारे अडीच लाख लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यास अपुरी ठरली आहे. मिरजेत सुमारे २० हजार नळ ग्राहकांना दररोज २७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची आवश्यकता असताना, २३ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मिरजेतून दरमहा ३० लाख पाणी बिलाचे उत्पन्न मिळते. सतरा वर्षांपूर्वी मिरज नगरपालिका असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत मिरज शहरासाठी सुधारित नळपाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. कर्जाऊ निधी मिळण्यासाठी आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. मात्र केंद्राकडून योजना मंजूर झाली नसल्याने राज्य शासनामार्फत योजनेस मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. महापालिकेने केवळ दहा टक्के तरतूद केल्यास उर्वरित रक्कम राज्य शासनाकडून कर्जाऊ मिळते. मात्र योजनेसाठी आर्थिक तरतूद नसल्याने जुन्या नळपाणीपुरवठा योजनेतून दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरसेवकांचे मौन महाआघाडीच्या काळात तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत मिरजेतील कारभाऱ्यांचे वर्चस्व असतानाही सांगली शहरासाठी सुधारित नळपाणी पुरवठा योजना पूर्ण झाली व मिरजेची योजना रखडली. आता महापालिकेत काँग्रेस सत्तेवर असताना मिरजेतील २४ नगरसेवकांचे सुधारित नळपाणीपुरवठा योजनेकडे दुर्लक्ष आहे. कृष्णाघाट ते मिरज मुख्य जलवाहिनीच्या कामाला शासनाची मंजुरी मिळविण्यासाठी महापालिका कार्यालयावर मोर्चा काढून दगडफेक करणारे नगरसेवक आता दूषित पाणीपुरवठ्यामुळे शहरात १३ बळी गेल्यानंतरही मौन धारण करून असल्याने नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया आहेत.