शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

सांगलीसाठी तत्परता, मिरजेबाबत उदासीनता

By admin | Updated: November 30, 2014 00:54 IST

सुधारित नळपाणी योजना : लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा फटका

 सदानंद औंधे / मिरज सांगलीसाठी सुधारित नळपाणी योजना मंजूर झाली. मात्र मिरजेतील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मिरज शहरासाठी सुधारित नळपाणी योजना रखडली आहे. जुन्या व जीर्ण झालेल्या पाणीपुरवठा यंत्रणेवर पाणीपुरवठ्याचा मोठा ताण असल्याने दूषित पाण्याच्या समस्यांने गंभीर स्वरूप धारण केले आहे. गॅस्ट्रोने अनेक बळी गेल्यानंतर शहरातील जुन्या जलवाहिन्यांची तत्पुरती मलमपट्टी सुरू आहे. मात्र सुधारित नळपाणीपुरवठा योजना सुरू झाल्याशिवाय दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न संपणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मिरजेच्या नळपाणी योजनेचा ४५ कोटींचा खर्च ७० कोटींवर पोहोचला आहे, तर महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत आणखी काही वर्षे मिरजेतील नागरिकांना दूषित पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. मिरज शहरासाठी ५० हजार लोकसंख्येला नळ पाणी पुरवठा करणारी ५० वर्षांपूर्वीची जुनी यंत्रणा शहरातील सुमारे अडीच लाख लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यास अपुरी ठरली आहे. मिरजेत सुमारे २० हजार नळ ग्राहकांना दररोज २७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची आवश्यकता असताना, २३ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मिरजेतून दरमहा ३० लाख पाणी बिलाचे उत्पन्न मिळते. सतरा वर्षांपूर्वी मिरज नगरपालिका असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत मिरज शहरासाठी सुधारित नळपाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. कर्जाऊ निधी मिळण्यासाठी आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. मात्र केंद्राकडून योजना मंजूर झाली नसल्याने राज्य शासनामार्फत योजनेस मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. महापालिकेने केवळ दहा टक्के तरतूद केल्यास उर्वरित रक्कम राज्य शासनाकडून कर्जाऊ मिळते. मात्र योजनेसाठी आर्थिक तरतूद नसल्याने जुन्या नळपाणीपुरवठा योजनेतून दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरसेवकांचे मौन महाआघाडीच्या काळात तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत मिरजेतील कारभाऱ्यांचे वर्चस्व असतानाही सांगली शहरासाठी सुधारित नळपाणी पुरवठा योजना पूर्ण झाली व मिरजेची योजना रखडली. आता महापालिकेत काँग्रेस सत्तेवर असताना मिरजेतील २४ नगरसेवकांचे सुधारित नळपाणीपुरवठा योजनेकडे दुर्लक्ष आहे. कृष्णाघाट ते मिरज मुख्य जलवाहिनीच्या कामाला शासनाची मंजुरी मिळविण्यासाठी महापालिका कार्यालयावर मोर्चा काढून दगडफेक करणारे नगरसेवक आता दूषित पाणीपुरवठ्यामुळे शहरात १३ बळी गेल्यानंतरही मौन धारण करून असल्याने नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया आहेत.