शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

निसर्गानं मारलं, पाटबंधारेनं फसवलं!

By admin | Updated: July 10, 2014 00:40 IST

शाळगाव परिसराची अवस्था : खरीप हंगाम धोक्यात

शाळगाव : निसर्गानं मारलं... पाटबंधाऱ्यानं फसवलं आणि महावितरणने पळवलं... अशा विचित्र अवस्थेत सध्या शाळगाव (ता. कडेगाव) परिसरातील शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.शाळगाव परिसर कडेगाव तालुक्यातील उत्तरेकडील शेवटचे टोक. या परिसरात शाळगाव, रायगाव, बोंबाळेवाडी, विहापूर, शिवाजीनगर, येडे, उपाळे, हिंगणगाव बुद्रुक अशी गावे येतात. खरीप व रब्बी पिकांसाठी पूर्वी प्रसिध्द, परंतु शाळगाव, करांडेवाडी, शिवाजीनगर आणि हिंगणगाव बुद्रुक येथे तलाव झाल्याने नंतर बागायत पिकांनी जोर धरला. पूर्वी या भागात पानमळे होते. आता कारखाने झाल्याने ऊसपीक घेतले जात आहे.आज मात्र या भागाची अवस्था विचित्र झाली आहे. हिंगणगाव व शिवाजीनगर तलावात टेंभूचे पाणी सोडले आहे. त्यामुळे या दोन गावातील परिस्थिती बऱ्यापैकी आहे. परंतु शाळगाव, करांडेवाडी या दोन तलावात पाणी नाही. त्यामुळे या भागातील परिस्थिती अवघड बनली आहे. गेले अनेक दिवस पावसाची अवकृपा आहे. साहजिकच खरीप हंगाम धोक्यात आला आहे. तलाव आहे, परंतु पाटबंधारे खात्याच्या मनमानी कारभारामुळे या तलावात टेंभूचे पाणी कायमस्वरूपी येऊ शकत नाही. अशा परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांनी बागायत पिके घेतली आहेत. ऊसपीक मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु महावितरणची वीज कधी येते कधी जाते याचा पत्ताच नसतो. बटण दाबून दाऱ्यावर जाईपर्यंत वीज गुल होते. त्यामुळे शेतकऱ्यांना विजेसाठी पळापळ करावी लागते. त्यामुळे शेकडो एकर ऊसपीक धोक्यात आले आहे. साहजिकच निसर्गानं मारलं, पाटबंधाऱ्यानं फसवलं आणि महावितरणनं पळवलं, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. (वार्ताहर)