शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
2
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
3
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
4
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
5
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
6
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
8
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
9
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
10
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
11
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
12
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
13
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
14
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
15
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
16
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
17
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
18
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
19
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
20
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज

निसर्गानं मारलं, पाटबंधारेनं फसवलं!

By admin | Updated: July 10, 2014 00:40 IST

शाळगाव परिसराची अवस्था : खरीप हंगाम धोक्यात

शाळगाव : निसर्गानं मारलं... पाटबंधाऱ्यानं फसवलं आणि महावितरणने पळवलं... अशा विचित्र अवस्थेत सध्या शाळगाव (ता. कडेगाव) परिसरातील शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.शाळगाव परिसर कडेगाव तालुक्यातील उत्तरेकडील शेवटचे टोक. या परिसरात शाळगाव, रायगाव, बोंबाळेवाडी, विहापूर, शिवाजीनगर, येडे, उपाळे, हिंगणगाव बुद्रुक अशी गावे येतात. खरीप व रब्बी पिकांसाठी पूर्वी प्रसिध्द, परंतु शाळगाव, करांडेवाडी, शिवाजीनगर आणि हिंगणगाव बुद्रुक येथे तलाव झाल्याने नंतर बागायत पिकांनी जोर धरला. पूर्वी या भागात पानमळे होते. आता कारखाने झाल्याने ऊसपीक घेतले जात आहे.आज मात्र या भागाची अवस्था विचित्र झाली आहे. हिंगणगाव व शिवाजीनगर तलावात टेंभूचे पाणी सोडले आहे. त्यामुळे या दोन गावातील परिस्थिती बऱ्यापैकी आहे. परंतु शाळगाव, करांडेवाडी या दोन तलावात पाणी नाही. त्यामुळे या भागातील परिस्थिती अवघड बनली आहे. गेले अनेक दिवस पावसाची अवकृपा आहे. साहजिकच खरीप हंगाम धोक्यात आला आहे. तलाव आहे, परंतु पाटबंधारे खात्याच्या मनमानी कारभारामुळे या तलावात टेंभूचे पाणी कायमस्वरूपी येऊ शकत नाही. अशा परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांनी बागायत पिके घेतली आहेत. ऊसपीक मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु महावितरणची वीज कधी येते कधी जाते याचा पत्ताच नसतो. बटण दाबून दाऱ्यावर जाईपर्यंत वीज गुल होते. त्यामुळे शेतकऱ्यांना विजेसाठी पळापळ करावी लागते. त्यामुळे शेकडो एकर ऊसपीक धोक्यात आले आहे. साहजिकच निसर्गानं मारलं, पाटबंधाऱ्यानं फसवलं आणि महावितरणनं पळवलं, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. (वार्ताहर)