शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

वाळवा तालुक्यातील पूरस्थिती निवळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:25 IST

इस्लामपूर : अवघ्या ४८ तासांत होत्याचे नव्हते करून सोडल्यानंतर कृष्णा नदीकाठावरील पूरस्थिती निवळत जाऊन ती आता सामान्य होऊ लागली ...

इस्लामपूर : अवघ्या ४८ तासांत होत्याचे नव्हते करून सोडल्यानंतर कृष्णा नदीकाठावरील पूरस्थिती निवळत जाऊन ती आता सामान्य होऊ लागली आहे. मात्र, वारणाकाठी पुराची स्थिती अद्याप कायम आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या लांबीच्या बहे पुलावरील पाणी ओसरले असून पुलाची मोठी पडझड झाल्याने तो धोकादायक बनला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पाण्याखाली असणारा कृष्णा नदीवरील बहे पूल रविवारी सकाळी पाण्याच्या प्रवाहातून मोकळा झाला. मनात धडकी भरविणारे अक्राळविक्राळ रूप घेत कृष्णा नदीचे पाणी या परिसरात ठाण मांडून बसले होते. पाण्याचा जोराचा दाब आणि प्रवाहाबरोबर वाहत येणारा कचरा पुलाच्या कठड्यामध्ये अडकला होता. पूल सकाळी खुला झाल्यानंतर हे भयावह चित्र समोर आले. काही ठिकाणी पूल खचला आहे तर बाजूचे संरक्षक कठडे, लोखंडी रेलिंग पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक बनला आहे. सध्या येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पुलावरून कोणालाही जाऊ दिले जात नव्हते. येथे धोका पातळीपेक्षा ५ फूट खाली पातळी गेली होती.

ताकारी पूल अद्याप पाण्याखाली आहे. रात्री ते पहाटेपर्यंत हा पूल पाण्यातून मोकळा होण्याची शक्यता आहे. अद्याप या पुलावर धोका पातळीपेक्षा ९ फूट उंच पाणी आहे. वारणा धरणातील पाण्याचा विसर्ग कमी केला असला तरी वारणा नदीचे पात्र अरुंद असल्याने या काठची पूरपरिस्थिती ओसरण्यास वेळ लागण्याची चिन्हे आहेत. वाळवा तालुक्यात शनिवार आणि रविवार अशा दोन्ही दिवशी पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

फोटो : २५ इस्लामपुर ६

ओळ : बहे (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीवरील पुलाचे सुरक्षा कठडे वाहून गेले आहेत.