शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

प्रकाश हॉस्पिटलच्या आराेग्य शिबिरांमुळे डोंगरी भागातील लाेकांना दिलासा : शिवाजीराव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:28 IST

कोकरुड : प्रकाश हॉस्पिटल, इस्लामपूर यांनी शिराळा तालुक्यातील डोंगरी विभागामध्ये आरोग्य शिबिरांचा उपक्रम घेऊन सामान्य लोकांना दिलासा दिला आहे. ...

कोकरुड : प्रकाश हॉस्पिटल, इस्लामपूर यांनी शिराळा तालुक्यातील डोंगरी विभागामध्ये आरोग्य शिबिरांचा उपक्रम घेऊन सामान्य लोकांना दिलासा दिला आहे. गोरगरीब जनतेसाठी या आरोग्य शिबिरामुळे पहिल्या टप्प्यात होणारे प्राथमिक आजारपण निदर्शनास येत आहे. यासाठी प्रकाश हॉस्पिटलने उचललेले हे पाऊल अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.

ते शेडगेवाडी (ता. शिराळा) येथे प्रकाश हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन समारंभावेळी बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, विश्वास संचालक रणजीतसिंह नाईक, माजी सभापती हणमंतराव पाटील, सांगली जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष रोहित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

नाईक म्हणाले, कोरोनाच्या महामारीच्या काळात सांगली जिल्ह्यातील महत्त्वाच्या हॉस्पिटलच्या बरोबरीने प्रकाश हॉस्पिटलने सामान्य नागरिकांना आरोग्याचा लाभ देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. कोरोनाच्या महाभयंकर संकटकाळात रक्तदानाची मोठी समस्या लक्षात घेऊन येथील युवकांनी रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम राबवून लोकांमध्ये नवसंजीवनी निर्माण करण्याचे काम केले आहे. या शिबिराच्या निमित्ताने पश्चिम भागामध्ये जनसेवेच्या दृष्टीने उचललेले महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. यावेळी सरपंच विनोद पन्हाळकर, माजी सरपंच विजय पाटील, बाजीराव सपकाळ, बाजीराव शेडगे, रंगराव शेडगे, प्रताप घाटगे, मनोज चिंचोलकर, कुमार कडोले, सुरेश चिंचोलकर, शिवाजी लाड, संदीप चोरगे, शिवाजी वाघमारे, विकास शिरसट, धनाजी सावंत, प्रमोद पाटील उपस्थित होते.