शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

पुरोगामी कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावे

By admin | Updated: March 16, 2015 00:04 IST

परिसंवादातील सूर : मूलनिवासी संघाच्यावतीने ‘सांस्कृतिक दहशतवाद व लोकशाही’ विषयावर मंथन

सांगली : सांस्कृतिक दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आपण सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे. त्याचबरोबरीने पुरोगामी कार्यकर्त्यांनी स्वत:ला समाजापासून वेगळे न मानता त्यांच्याशी एकरूप होऊन आत्मपरीक्षण करण्याची खरी गरज असल्याचे मत मूलनिवासी संघाच्यावतीने आयोजित परिसंवादात आज, रविवारी विविध वक्त्यांनी व्यक्त केले. रोटरी सभागृहात ‘सांस्कृतिक दहशतवाद आणि लोकशाही - आव्हाने आणि जबाबदारी’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना ‘अंनिस’चे अ. रा. आर्डे म्हणाले की, दहशतवाद हा एक विचार आहे. याच्या हल्ल्यात सर्वच जाती-धर्माचे लोक बळी पडले आहेत. त्यामुळे विशिष्ट जातींवर टीका करण्यात वेळ वाया घालवू नये. दहशतवाद हा पिसाळलेल्या कुत्र्यासारखा असतो. युध्दामध्ये जेवढी माणसे मृत्युमुखी पडली नाहीत, त्यापेक्षा अधिक माणसे धार्मिक दहशतवादाची बळी ठरली आहेत, हे नेहमी लक्षात ठेवावे. याचा मुकाबला एकजुटीने केला पाहिजे. पुरोगामी संघटनेतील सर्वांनीच विचारांनी एकरुप होऊन कार्य केले पाहिजे. विद्रोही संघटनेचे कार्याध्यक्ष धनाजी गुरव म्हणाले, आपण सर्वांनीच विवेकाचा आग्रह धरला पाहिजे. विनाकारण दुसऱ्या जातीबद्दल तिरस्कार करुन उपयोग नाही. त्यामुळेच आपण समाजापासून अलग पडतो आहोत. आपले शत्रू कोण आहेत याची विभागणी प्रत्येकाला विचारांच्या आधारावर करता आली पाहिजे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, सध्या पुरोगामी कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारच्या पराभूत मानसिकतेचे वातावरण आहे. हुकूमशाहीचा डंका वाजला पाहिजे म्हणून काही शक्ती प्रयत्नशील असल्या तरीही, कार्यकर्त्यांनी समाजव्यवस्थेचा अभ्यास करुन त्यानुसारच चळवळीला दिशा दिली पाहिजे. अ‍ॅड. अमित शिंदे म्हणाले, कार्यकर्त्यांची विखुरलेली ताकद एकत्र आणून चळवळ आधुनिक करण्याची गरज आहे. तसेच सध्या आपण कोठे आहोत याचाही विचार करावा. शाहीन शेख यांनी, चळवळीतील प्रत्येकाने आशावादी दृष्टिकोन ठेवावा व वाचनाचा व्यासंग वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी हुमायूम मुरसल, रुपेश तामगावकर, नगरसेवक संतोष पाटील आदींनीही या परिसंवादामध्ये आपले विचार व्यक्त केले. (प्रतिनिधी)